शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

एसआयटीसाठी बंजारा समाज ‘पांढरे वादळ‘ महामोर्चात एकवटला

By स. सो. खंडाळकर | Updated: August 23, 2023 19:32 IST

एसआयटीसाठी आक्रमक झालेला बंजारा समाज पांढरे वादळ महामोर्चात एकवटलेला जाणवला.

छत्रपती संभाजीनगर : व्हीजेएनटी प्रवर्गात बोगस जात प्रमाणपत्र काढून फायदा घेणाऱ्यांची व बोगस प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याचे दिलेले आश्वासन शिंदे-फडणवीस व अजित पवार सरकारने पूर्ण करावे व एसआयटी नेमावी या व अन्य मागण्यांसाठी बुधवारी बंजारा, राजपूत भामटा, भटके विमुक्त समाज कृती समितीचा ‘पांढरे वादळ’ महामोर्चा आमखास मैदानावर धडकला. या महामोर्चाला बंजारा समाजाचा सहभाग लक्षणीय ठरला. पारंपरिक वेशभूषेतील बंजारा महिलांनी सहभाग नोंदवला. एसआयटीसाठी आक्रमक झालेला बंजारा समाज पांढरे वादळ महामोर्चात एकवटलेला जाणवला.

दुपारी एकच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. नेहमीचा मार्ग बदलून मोर्चा नूतन कॉलनी, माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज, खडकेश्वर, भडकलगेट मार्गे टाऊन हॉल उड्डाणपुलावरून आमखास मैदानावर आला. तेथे संत सेवालाल महाराज, महानायक वसंतराव नाईक व संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करून सभेला सुरुवात झाली. ‘आज मची है चुहाशाही, ‘बोगस भामटे भाजप भाई भाई’, अशा घोषणा मोर्चात निनादत होत्या. अवघा मोर्चा सेवालालमय होता. गैरमार्गाचा वापर करून सवलती लाटणाऱ्या लोकांपुढे लोटांगण घालून एसआयटी नेमण्याचा निर्णय मागे घेतला असल्याचा आरोप फडणवीस, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आदींवर करण्यात आला. नारायण कुचे, जयकुमार रावळ आदी आमदारांनी बंजारा समाजविरोधी भूमिका घेतल्याचा निषेधही नोंदवण्यात आला.

मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. आमखास मैदानावरील सभेचे संचालन राजपालसिंग राठोड यांनी केले. विधान परिषदेचे सदस्य राजेश राठोड, माजी खा. हरिभाऊ राठोड, गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड, आत्माराम जाधव, राजेंद्र साळुंके, डॉ. जगदीश राठोड, सुभाष राठोड, कांतीलाल राठोड, मोहन राठोड, दिगंबर राठोड, कैकाडी समाजाचे संजय मेडे, बुलढाण्याचे राजेश राठोड आदींनी जोरदार भाषणे केली. नंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना सादर केले.

रोहिदास पवार, रमेश पवार, प्रमोद राठोड, राकेश पवार, प्रा. फुलसिंग जाधव, प्रा. बी. यू. राठोड, मुरहारी पवार, अरुण चव्हाण, विलास राठोड, नंदू पवार, प्रा. सुभाष राठोड, प्राचार्य ग. ह. राठोड, कला राठोड, अमरसिंग चव्हाण, दत्ताभाऊ राठोड, अनिल चव्हाण, वैजनाथ राठोड, जय राठोड व कृती समितीच्या सदस्यांनी मोर्चासाठी परिश्रम घेतले. सर्व चैतन्य महाराज, पोहरादेवीचे रमेश महाराज, भरत चैतन्य व विठ्ठल महाराज सभेच्या वेळी उपस्थित होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMorchaमोर्चाreservationआरक्षण