शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

विद्यापीठातील संशोधकांना पेटंट मिळताहेत पण त्याचे पुढे काय होते?

By राम शिनगारे | Updated: March 6, 2024 18:26 IST

पेटंटचा उपयोग व्यवसाय, उद्योगांसाठी होत नसल्याचे सत्य समोर

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्राध्यापकांना मागील पाच वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल २५ पेक्षा अधिक पेटंट मिळाली असून, १५ प्रकाशित झाली आहेत. त्याशिवाय पेटंट मिळविणाऱ्यांमध्ये संलग्न महाविद्यालयातील संशोधक प्राध्यापकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. पेटंट मिळाल्यानंतर त्याचे काय होते? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. त्याचा शोध घेतला असता, मिळविलेल्या पेटंटचा वापर पुढील संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, संबंधित प्राध्यापकांना त्याचे व्यवसाय, उद्योग उभारणीसाठी संधीच उपलब्ध होत नसल्याचे 'लोकमत'च्या पाहणीत आढळून आले आहे.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात संशोधक प्राध्यापकांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून दाखल संशोधनास स्वामित्व हक्क (पेटंट) देण्यात आले आहेत. हे स्वामित्व हक्क दिल्यानंतर संबंधित संशोधनावर संपूर्णपणे हक्क संशाेधकांचा राहतो. संबंधित संशोधनाचा उपयोग समाज, उत्पादनाच्या निर्मितीसाठी झाला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक संशोधकांचे प्रयत्न असतात. मात्र, संशोधकांना पेटंट मिळाल्यानंतर त्याचे व्यावसायिकरण करण्यासाठी वेगवेगळे उद्योग, कंपन्यांचे सहकार्य आवश्यक आहे. मुंबई-पुण्यातील संशाेधकांना उद्योगांकडून मागण्या मोठ्या प्रमाणात असतात. त्या तुलनेत छत्रपती संभाजीनगरात व्यवसाय उद्योगाच्या उभारणीसाठी संधीच नाहीत, असे संशोधक प्राध्यापकांनी ''''लोकमत''''शी सांगितले.

संशोधकांचा वाढतो बायोडाटापेटंट मिळाल्यानंतर त्याचा उपयोग व्यवसाय, उद्योग उभारणीसाठी झाला नाही तरी संशोधक प्राध्यापकांचा बायोडाटा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा उपयोगही संशोधकांच्या वैयक्तिक प्रगतीसाठी, वेगवेगळ्या संधी मिळण्यामध्ये होत असल्याचेही आढळून आले आहे.

व्यवसाय किंवा उद्योगासाठी कुलगुरूंचे प्रयत्नब्रिद्री हस्तकलेच्या वस्तूंसाठी लागणाऱ्या बिदर किल्ल्यातील मातीला विद्यापीठातील तीन संशोधक प्राध्यापकांनी पर्याय शोधला आहे. त्यात डॉ. भास्कर साठे, डॉ. अभिजित शेळके आणि डॉ. कृष्णप्रिया रोला यांचा समावेश आहे. या संशोधनाला नुकतेच पेटंट जाहीर झाले. या पेटंटच्या प्राप्तीनंतर त्यावर उद्योग उभारणी किंवा व्यवसाय प्रारंभ व्हावा यासाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनात संशोधक वस्तू बनविणाऱ्या व्यवसायिकांची कार्यशाळा घेणार आहे. त्यातून ब्रिदी कलेविषयीचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी संशोधक मार्गदर्शन केले जाणार आहे.

स्टार्टअप सुरू करण्यास प्राधान्यविद्यापीठातील संशोधक प्राध्यापकांना पेटंट मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेटंटचा उपयोग व्यवसाय उभारणीसाठी उद्योग उभारणीसाठी विद्यापीठ प्रशासन संबंधितांना सर्वतोपरी सहकार्य करेल. सध्या विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्रात ६८ कोटी रुपयांचे स्टार्टअप सुरू आहेत. पेटंट मिळविलेल्या विषयांवरही स्टार्टअप सुरू करण्यासाठी आगामी काळात प्राधान्य असणार आहे.- डॉ. विजय फुलारी, कुलगुरू

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण