शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
2
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
3
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
4
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
5
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
6
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
7
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
8
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
9
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
10
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
11
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
12
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
13
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
14
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
15
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
16
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
18
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
19
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?

प्रयोगशील शेतीतून संपन्नता! बळीराजाची २०० क्विंटल अद्रक पोहोचली थेट दुबईच्या बाजारपेठेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 12:27 IST

लक्ष्मण काळे यांना खुलताबाद येथे म्हैसमाळ रोडवर १६ एकर जमीन असून ते मुख्य पीक हे अद्रकचे घेत असतात.

- सुनील घोडकेखुलताबाद (औरंगाबाद) : खुलताबाद शहर परिसरातील शेतीमधून काढण्यात आलेली अद्रक नुकतीच दुबईला पाठविण्यात आली असून तालुक्यातून पहिल्यादांच सातासमुद्रापार अद्रक गेल्याने उत्पादक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खुलताबाद शहरातील अद्रक उत्पादक शेतकरी लक्ष्मण काळे हे अद्रक पिकाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत असतात. त्यांची अद्रकची शेती बघण्यासाठी जिल्हाभरातून शेतकरी येतात. काळे यांनी नुकतीच सुलतानपूर येथील हरियाली फाउंडेशनच्या माध्यमातून २०० क्विंटल अद्रक नाशिक येथे कंटनेरने लोड करून १९ नोव्हेंबर रोजी ती दुबईला पाठविली आहे. दुबईला पाठविण्यात आलेल्या अद्रकला ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. त्यावेळेस खुलताबादच्या स्थानिक बाजारात ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव होता.

लक्ष्मण काळे यांना खुलताबाद येथे म्हैसमाळ रोडवर १६ एकर जमीन असून ते मुख्य पीक हे अद्रकचे घेत असतात. लक्ष्मण काळे यांची अद्रक दुबईकरांची पहिली पसंती ठरली आहे. दुबईमध्ये उच्च गुणवत्ता असलेल्या शेतमालाला चांगली मागणी असते. लक्ष्मण काळे यांच्या अद्रकाची उच्च क्वालिटी असल्यामुळे हरियाली फाउंडेशनने ही अद्रक दुबईला पाठवली आहे. तेथे देखील कॉलिटी चांगली असल्यामुळे दुबईकरांची भारतीय अद्रक ही पहिली पसंती ठरल्याचे हरियाली फाउंडेशनचे सतीश शुक्ला यांनी सांगितले. लक्ष्मण काळे हे तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे मायक्रोन्यूटरण, प्लांट ग्रोथ प्रमोटर व विद्राव्य खते असे ७८ प्रकारचे उच्च क्वालिटीचे प्रोडक्ट शेतकऱ्यांना पुरवून शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करतात. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अद्रक उत्पादनात वाढ होते.

अद्रकच्या कंदाची जाडी जास्तइतर अद्रकच्या तुलनेत लक्ष्मण काळे यांनी उत्पादन घेतलेल्या अद्रकच्या कंदाची जाडी आणि कंदाच्या कांडीची लांबी जास्त असून हे कंद चमकदार असल्याने अशा प्रकारच्या अद्रकची मागणी आहे. त्यामुळेच आपली अद्रक दुबईला जाण्यास पात्र ठरल्याचे लक्ष्मण काळे यांनी सांगितले.

दुबईला जाणाऱ्या अद्रकला ‘रेसिड्यू’ तपासणीतून वगळलेविदेशात रेसिड्यू फ्री’ अर्थात रासायनिक अवशेषमुक्त मालाची मागणी आहे. यासंदर्भात ‘रेसिड्यू’ ही तपासणी करण्यात येते. या तपासणीत संबंधित शेतीमाल पास झाला तरच तो इतर देशात निर्यात करता येतो. कारण विदेशातील नागरिकांकडून रसायन अंशमुक्त मालाची मागणी असतो. या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता दुबईला जाणाऱ्या अद्रकची कुठलीच ‘रेसिड्यू’ तपासणी होत नसल्याने समजले. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे अद्रक दुबईच्या बाजारपेठेत पाठविण्यास काहीच अडचण नसल्याचेही लक्ष्मण काळे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती