शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशील शेतीतून संपन्नता! बळीराजाची २०० क्विंटल अद्रक पोहोचली थेट दुबईच्या बाजारपेठेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 12:27 IST

लक्ष्मण काळे यांना खुलताबाद येथे म्हैसमाळ रोडवर १६ एकर जमीन असून ते मुख्य पीक हे अद्रकचे घेत असतात.

- सुनील घोडकेखुलताबाद (औरंगाबाद) : खुलताबाद शहर परिसरातील शेतीमधून काढण्यात आलेली अद्रक नुकतीच दुबईला पाठविण्यात आली असून तालुक्यातून पहिल्यादांच सातासमुद्रापार अद्रक गेल्याने उत्पादक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खुलताबाद शहरातील अद्रक उत्पादक शेतकरी लक्ष्मण काळे हे अद्रक पिकाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत असतात. त्यांची अद्रकची शेती बघण्यासाठी जिल्हाभरातून शेतकरी येतात. काळे यांनी नुकतीच सुलतानपूर येथील हरियाली फाउंडेशनच्या माध्यमातून २०० क्विंटल अद्रक नाशिक येथे कंटनेरने लोड करून १९ नोव्हेंबर रोजी ती दुबईला पाठविली आहे. दुबईला पाठविण्यात आलेल्या अद्रकला ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. त्यावेळेस खुलताबादच्या स्थानिक बाजारात ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव होता.

लक्ष्मण काळे यांना खुलताबाद येथे म्हैसमाळ रोडवर १६ एकर जमीन असून ते मुख्य पीक हे अद्रकचे घेत असतात. लक्ष्मण काळे यांची अद्रक दुबईकरांची पहिली पसंती ठरली आहे. दुबईमध्ये उच्च गुणवत्ता असलेल्या शेतमालाला चांगली मागणी असते. लक्ष्मण काळे यांच्या अद्रकाची उच्च क्वालिटी असल्यामुळे हरियाली फाउंडेशनने ही अद्रक दुबईला पाठवली आहे. तेथे देखील कॉलिटी चांगली असल्यामुळे दुबईकरांची भारतीय अद्रक ही पहिली पसंती ठरल्याचे हरियाली फाउंडेशनचे सतीश शुक्ला यांनी सांगितले. लक्ष्मण काळे हे तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे मायक्रोन्यूटरण, प्लांट ग्रोथ प्रमोटर व विद्राव्य खते असे ७८ प्रकारचे उच्च क्वालिटीचे प्रोडक्ट शेतकऱ्यांना पुरवून शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करतात. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अद्रक उत्पादनात वाढ होते.

अद्रकच्या कंदाची जाडी जास्तइतर अद्रकच्या तुलनेत लक्ष्मण काळे यांनी उत्पादन घेतलेल्या अद्रकच्या कंदाची जाडी आणि कंदाच्या कांडीची लांबी जास्त असून हे कंद चमकदार असल्याने अशा प्रकारच्या अद्रकची मागणी आहे. त्यामुळेच आपली अद्रक दुबईला जाण्यास पात्र ठरल्याचे लक्ष्मण काळे यांनी सांगितले.

दुबईला जाणाऱ्या अद्रकला ‘रेसिड्यू’ तपासणीतून वगळलेविदेशात रेसिड्यू फ्री’ अर्थात रासायनिक अवशेषमुक्त मालाची मागणी आहे. यासंदर्भात ‘रेसिड्यू’ ही तपासणी करण्यात येते. या तपासणीत संबंधित शेतीमाल पास झाला तरच तो इतर देशात निर्यात करता येतो. कारण विदेशातील नागरिकांकडून रसायन अंशमुक्त मालाची मागणी असतो. या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता दुबईला जाणाऱ्या अद्रकची कुठलीच ‘रेसिड्यू’ तपासणी होत नसल्याने समजले. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे अद्रक दुबईच्या बाजारपेठेत पाठविण्यास काहीच अडचण नसल्याचेही लक्ष्मण काळे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती