शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशील शेतीतून संपन्नता! बळीराजाची २०० क्विंटल अद्रक पोहोचली थेट दुबईच्या बाजारपेठेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 12:27 IST

लक्ष्मण काळे यांना खुलताबाद येथे म्हैसमाळ रोडवर १६ एकर जमीन असून ते मुख्य पीक हे अद्रकचे घेत असतात.

- सुनील घोडकेखुलताबाद (औरंगाबाद) : खुलताबाद शहर परिसरातील शेतीमधून काढण्यात आलेली अद्रक नुकतीच दुबईला पाठविण्यात आली असून तालुक्यातून पहिल्यादांच सातासमुद्रापार अद्रक गेल्याने उत्पादक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खुलताबाद शहरातील अद्रक उत्पादक शेतकरी लक्ष्मण काळे हे अद्रक पिकाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत असतात. त्यांची अद्रकची शेती बघण्यासाठी जिल्हाभरातून शेतकरी येतात. काळे यांनी नुकतीच सुलतानपूर येथील हरियाली फाउंडेशनच्या माध्यमातून २०० क्विंटल अद्रक नाशिक येथे कंटनेरने लोड करून १९ नोव्हेंबर रोजी ती दुबईला पाठविली आहे. दुबईला पाठविण्यात आलेल्या अद्रकला ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. त्यावेळेस खुलताबादच्या स्थानिक बाजारात ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव होता.

लक्ष्मण काळे यांना खुलताबाद येथे म्हैसमाळ रोडवर १६ एकर जमीन असून ते मुख्य पीक हे अद्रकचे घेत असतात. लक्ष्मण काळे यांची अद्रक दुबईकरांची पहिली पसंती ठरली आहे. दुबईमध्ये उच्च गुणवत्ता असलेल्या शेतमालाला चांगली मागणी असते. लक्ष्मण काळे यांच्या अद्रकाची उच्च क्वालिटी असल्यामुळे हरियाली फाउंडेशनने ही अद्रक दुबईला पाठवली आहे. तेथे देखील कॉलिटी चांगली असल्यामुळे दुबईकरांची भारतीय अद्रक ही पहिली पसंती ठरल्याचे हरियाली फाउंडेशनचे सतीश शुक्ला यांनी सांगितले. लक्ष्मण काळे हे तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे मायक्रोन्यूटरण, प्लांट ग्रोथ प्रमोटर व विद्राव्य खते असे ७८ प्रकारचे उच्च क्वालिटीचे प्रोडक्ट शेतकऱ्यांना पुरवून शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करतात. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अद्रक उत्पादनात वाढ होते.

अद्रकच्या कंदाची जाडी जास्तइतर अद्रकच्या तुलनेत लक्ष्मण काळे यांनी उत्पादन घेतलेल्या अद्रकच्या कंदाची जाडी आणि कंदाच्या कांडीची लांबी जास्त असून हे कंद चमकदार असल्याने अशा प्रकारच्या अद्रकची मागणी आहे. त्यामुळेच आपली अद्रक दुबईला जाण्यास पात्र ठरल्याचे लक्ष्मण काळे यांनी सांगितले.

दुबईला जाणाऱ्या अद्रकला ‘रेसिड्यू’ तपासणीतून वगळलेविदेशात रेसिड्यू फ्री’ अर्थात रासायनिक अवशेषमुक्त मालाची मागणी आहे. यासंदर्भात ‘रेसिड्यू’ ही तपासणी करण्यात येते. या तपासणीत संबंधित शेतीमाल पास झाला तरच तो इतर देशात निर्यात करता येतो. कारण विदेशातील नागरिकांकडून रसायन अंशमुक्त मालाची मागणी असतो. या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता दुबईला जाणाऱ्या अद्रकची कुठलीच ‘रेसिड्यू’ तपासणी होत नसल्याने समजले. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे अद्रक दुबईच्या बाजारपेठेत पाठविण्यास काहीच अडचण नसल्याचेही लक्ष्मण काळे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती