शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

बालभारती खडबडून जागी झाली; पाने वेगळी झालेली पुस्तके परत घेणार, नवीन देणार

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 20, 2023 14:13 IST

पुस्तकाला पिना मारलेल्या नाहीत फक्त ‘ग्लू’ वापरुन चिटकविण्यात आले आहे. यामुळे पुस्तक फाटणारच, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.

छत्रपती संभाजीनगर : बालभारतीची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची पुस्तके अनुदानित शाळांना मोफत वाटप करण्यात आली. पण ; पाठ्यपुस्तकाची बांधणी (बायंडिंग) व्यवस्थित न झाल्याने पुस्तकाची पाने वेगवेगळी निघत आहेत, अशी बातमी ‘लोकमत’ने उजेडात आणली. यानंतर बालभारती (पाठ्यपुस्तक मंडळ) खडबडून जागी झाली आहे. पुस्तके विद्यार्थ्यांकडून शाळांनी परत घ्यावीत व पाठ्यपुस्तक मंडळात आणून द्यावी, त्याबदलात नवीन पुस्तक देण्यात येतील, अशा सूचना पाठ्यपुस्तक मंडळाचे सहायक भांडार व्यवस्थापक सुभाष पवार यांनी केल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने यंदा ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ या पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून इयत्ता ‘पहिली ते सातवी’ ची पुस्तक शाळांना वाटप केली आहे. सर्व विषय समावेश असलेल्या या पुस्तकांची बांधणी व्यवस्थित झाली नाही. त्यातील अनेक पुस्तकांची पाने निघू लागली. याविषयावर सोमवारच्या (दि.१९) लोकमतच्या हॅलो संभाजीनगर अंकात ‘ पुस्तकांना सहन होईना पानांचे वजन’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल मंडळाच्या पुण्यातील संचालक कार्यालयाने घेतली. आणि शहरातील बालभारतीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पुस्तकांची तपासणी सुरु केली. भांडारामध्ये जे पुस्तक होते त्यात बांधणी अचृूक होती (बायंडिंग मिस्टेक) दिसून आली नाही. नंतर अधिकाऱ्यांनी शहरातील होलसेल व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन पुस्तकांची तपासणी केली.

अजून पालकांच्या तक्रारी आल्या नसल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले पण पुस्तकाला पिना मारलेल्या नाहीत फक्त ‘ग्लू’ वापरुन चिटकविण्यात आले आहे. यामुळे पुस्तक फाटणारच, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले. काही शाळेत विद्यार्थ्यांनी तक्रार केल्या पण अजून शाळांनी पाठ्यपुस्तक मंडळाकडे या संदर्भात माहिती दिली नसल्याचे आढळून आले आहे. पाठपुस्तक फाटले असेल तर विद्यार्थ्यांना घरीच चिटकवा असा, सल्ला शिक्षकांनी देऊ नये, ती सर्व पुस्तके जमा करुन रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील ‘बालभारती’च्या भांडारात आणून द्यावीत. ती बदलून देण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.

विकत घेतलेली पुस्तके दुकानदारांना परत कराबालभारतीच्या पुस्तक बांधणीत त्रुटी असतील (बायंडिंग मिस्टेक) झाली असेल व ही पुस्तके विक्रेत्यांकडून खरेदी केली असेल तर ती पुस्तके त्या संबंधित विक्रेत्याला परत करावी. विक्रेते पाठ्यपुस्तक मंडळाच्या भांडारात देतील व तिथे त्यांना नवीन पुस्तक दिले जाईल व विक्रेते ती नवीन पुस्तके ग्राहकांना देतील, अशी माहिती सहायक भांडार व्यवस्थापकाने दिली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण