शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

बालभारती खडबडून जागी झाली; पाने वेगळी झालेली पुस्तके परत घेणार, नवीन देणार

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 20, 2023 14:13 IST

पुस्तकाला पिना मारलेल्या नाहीत फक्त ‘ग्लू’ वापरुन चिटकविण्यात आले आहे. यामुळे पुस्तक फाटणारच, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.

छत्रपती संभाजीनगर : बालभारतीची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची पुस्तके अनुदानित शाळांना मोफत वाटप करण्यात आली. पण ; पाठ्यपुस्तकाची बांधणी (बायंडिंग) व्यवस्थित न झाल्याने पुस्तकाची पाने वेगवेगळी निघत आहेत, अशी बातमी ‘लोकमत’ने उजेडात आणली. यानंतर बालभारती (पाठ्यपुस्तक मंडळ) खडबडून जागी झाली आहे. पुस्तके विद्यार्थ्यांकडून शाळांनी परत घ्यावीत व पाठ्यपुस्तक मंडळात आणून द्यावी, त्याबदलात नवीन पुस्तक देण्यात येतील, अशा सूचना पाठ्यपुस्तक मंडळाचे सहायक भांडार व्यवस्थापक सुभाष पवार यांनी केल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने यंदा ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ या पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून इयत्ता ‘पहिली ते सातवी’ ची पुस्तक शाळांना वाटप केली आहे. सर्व विषय समावेश असलेल्या या पुस्तकांची बांधणी व्यवस्थित झाली नाही. त्यातील अनेक पुस्तकांची पाने निघू लागली. याविषयावर सोमवारच्या (दि.१९) लोकमतच्या हॅलो संभाजीनगर अंकात ‘ पुस्तकांना सहन होईना पानांचे वजन’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल मंडळाच्या पुण्यातील संचालक कार्यालयाने घेतली. आणि शहरातील बालभारतीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पुस्तकांची तपासणी सुरु केली. भांडारामध्ये जे पुस्तक होते त्यात बांधणी अचृूक होती (बायंडिंग मिस्टेक) दिसून आली नाही. नंतर अधिकाऱ्यांनी शहरातील होलसेल व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन पुस्तकांची तपासणी केली.

अजून पालकांच्या तक्रारी आल्या नसल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले पण पुस्तकाला पिना मारलेल्या नाहीत फक्त ‘ग्लू’ वापरुन चिटकविण्यात आले आहे. यामुळे पुस्तक फाटणारच, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले. काही शाळेत विद्यार्थ्यांनी तक्रार केल्या पण अजून शाळांनी पाठ्यपुस्तक मंडळाकडे या संदर्भात माहिती दिली नसल्याचे आढळून आले आहे. पाठपुस्तक फाटले असेल तर विद्यार्थ्यांना घरीच चिटकवा असा, सल्ला शिक्षकांनी देऊ नये, ती सर्व पुस्तके जमा करुन रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील ‘बालभारती’च्या भांडारात आणून द्यावीत. ती बदलून देण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.

विकत घेतलेली पुस्तके दुकानदारांना परत कराबालभारतीच्या पुस्तक बांधणीत त्रुटी असतील (बायंडिंग मिस्टेक) झाली असेल व ही पुस्तके विक्रेत्यांकडून खरेदी केली असेल तर ती पुस्तके त्या संबंधित विक्रेत्याला परत करावी. विक्रेते पाठ्यपुस्तक मंडळाच्या भांडारात देतील व तिथे त्यांना नवीन पुस्तक दिले जाईल व विक्रेते ती नवीन पुस्तके ग्राहकांना देतील, अशी माहिती सहायक भांडार व्यवस्थापकाने दिली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण