शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बालभारती खडबडून जागी झाली; पाने वेगळी झालेली पुस्तके परत घेणार, नवीन देणार

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 20, 2023 14:13 IST

पुस्तकाला पिना मारलेल्या नाहीत फक्त ‘ग्लू’ वापरुन चिटकविण्यात आले आहे. यामुळे पुस्तक फाटणारच, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.

छत्रपती संभाजीनगर : बालभारतीची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची पुस्तके अनुदानित शाळांना मोफत वाटप करण्यात आली. पण ; पाठ्यपुस्तकाची बांधणी (बायंडिंग) व्यवस्थित न झाल्याने पुस्तकाची पाने वेगवेगळी निघत आहेत, अशी बातमी ‘लोकमत’ने उजेडात आणली. यानंतर बालभारती (पाठ्यपुस्तक मंडळ) खडबडून जागी झाली आहे. पुस्तके विद्यार्थ्यांकडून शाळांनी परत घ्यावीत व पाठ्यपुस्तक मंडळात आणून द्यावी, त्याबदलात नवीन पुस्तक देण्यात येतील, अशा सूचना पाठ्यपुस्तक मंडळाचे सहायक भांडार व्यवस्थापक सुभाष पवार यांनी केल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने यंदा ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ या पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून इयत्ता ‘पहिली ते सातवी’ ची पुस्तक शाळांना वाटप केली आहे. सर्व विषय समावेश असलेल्या या पुस्तकांची बांधणी व्यवस्थित झाली नाही. त्यातील अनेक पुस्तकांची पाने निघू लागली. याविषयावर सोमवारच्या (दि.१९) लोकमतच्या हॅलो संभाजीनगर अंकात ‘ पुस्तकांना सहन होईना पानांचे वजन’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल मंडळाच्या पुण्यातील संचालक कार्यालयाने घेतली. आणि शहरातील बालभारतीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पुस्तकांची तपासणी सुरु केली. भांडारामध्ये जे पुस्तक होते त्यात बांधणी अचृूक होती (बायंडिंग मिस्टेक) दिसून आली नाही. नंतर अधिकाऱ्यांनी शहरातील होलसेल व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन पुस्तकांची तपासणी केली.

अजून पालकांच्या तक्रारी आल्या नसल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले पण पुस्तकाला पिना मारलेल्या नाहीत फक्त ‘ग्लू’ वापरुन चिटकविण्यात आले आहे. यामुळे पुस्तक फाटणारच, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले. काही शाळेत विद्यार्थ्यांनी तक्रार केल्या पण अजून शाळांनी पाठ्यपुस्तक मंडळाकडे या संदर्भात माहिती दिली नसल्याचे आढळून आले आहे. पाठपुस्तक फाटले असेल तर विद्यार्थ्यांना घरीच चिटकवा असा, सल्ला शिक्षकांनी देऊ नये, ती सर्व पुस्तके जमा करुन रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील ‘बालभारती’च्या भांडारात आणून द्यावीत. ती बदलून देण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.

विकत घेतलेली पुस्तके दुकानदारांना परत कराबालभारतीच्या पुस्तक बांधणीत त्रुटी असतील (बायंडिंग मिस्टेक) झाली असेल व ही पुस्तके विक्रेत्यांकडून खरेदी केली असेल तर ती पुस्तके त्या संबंधित विक्रेत्याला परत करावी. विक्रेते पाठ्यपुस्तक मंडळाच्या भांडारात देतील व तिथे त्यांना नवीन पुस्तक दिले जाईल व विक्रेते ती नवीन पुस्तके ग्राहकांना देतील, अशी माहिती सहायक भांडार व्यवस्थापकाने दिली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण