शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

‘बाळासाहेब पवार हे खरे सहकारव्रती; शिक्षणव्रती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:57 AM

बाळासाहेब पवार आध्यात्मिक, धार्मिक वृत्तीचे होते. मात्र, सनातनी नव्हते. त्यांनी संस्कृती-परंपरा जोपासली होती. अनेक साधू-संतांची पूजा केली; पण ते खरे ‘सेक्युलर’ होते. त्यांच्यात ढोंगीपणा नव्हता. ते जाती व धर्मभेद करणारे नव्हते. सहकारमहर्षी वा शिक्षणमहर्षी असणे वाईट नाही; परंतु बाळासाहेब पवार हे खरे सहकारव्रती होते व खरे शिक्षणव्रती होते. मराठवाड्याच्या न्याय्य हक्कांसाठी ते सतत निर्भीडपणे लढत राहिले. मराठवाड्याच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. नव्या पिढीला अशा या बाळासाहेब पवारांपासून सतत प्रेरणा मिळत राहील, असे उद्गार आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस :‘नीतिधुरंधर’चे थाटात प्रकाशन ; तुकाराम नाट्यगृह खचाखच भरले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बाळासाहेब पवार आध्यात्मिक, धार्मिक वृत्तीचे होते. मात्र, सनातनी नव्हते. त्यांनी संस्कृती-परंपरा जोपासली होती. अनेक साधू-संतांची पूजा केली; पण ते खरे ‘सेक्युलर’ होते. त्यांच्यात ढोंगीपणा नव्हता. ते जाती व धर्मभेद करणारे नव्हते. सहकारमहर्षी वा शिक्षणमहर्षी असणे वाईट नाही; परंतु बाळासाहेब पवार हे खरे सहकारव्रती होते व खरे शिक्षणव्रती होते. मराठवाड्याच्या न्याय्य हक्कांसाठी ते सतत निर्भीडपणे लढत राहिले. मराठवाड्याच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. नव्या पिढीला अशा या बाळासाहेब पवारांपासून सतत प्रेरणा मिळत राहील, असे उद्गार आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.जगद्गुरू तुकाराम महाराज नाट्यगृहात ते ‘ नीतिधुरंधर: बाळासाहेब पवार’ या महावीर जोंधळे लिखित चरित्रगं्रथाचे प्रकाशन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री जयंतराव पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, खा. चंद्रकांत खैरे, ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांची यावेळी भाषणे झाली. लेखक जोंधळे यांनी प्रास्ताविक केले.ते व्रतस्थ जीवन जगले....देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेब पवार यांचा माझा वैयक्तिक परिचय नव्हता; परंतु औरंगाबाद-जालना जिल्ह्यांत त्यांचा वारंवार उल्लेख ऐकायला मिळतो. हरिभाऊ बागडे यांच्या तोंडून तर बाळासाहेबांचे नाव मी सतत ऐकत असतो.पुस्तक वाचल्यानंतर या माणसाची उंची काय होती, याची कल्पना येते. अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती न सोडता, स्वत:साठी न जगता, बाळासाहेबांनी नेतृत्वाची एक फळी तयार केली. ते व्रतस्थ जीवन जगले. ते मुख्यमंत्री हटवण्याचे काम करीत होते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. ते मुख्यमंत्री कसा असावा, नवा मुख्यमंत्री कोण असावा हे ठरवीत होते व त्यासाठी संघर्ष करीत होते.संघर्षातही बाळासाहेब पवार यांचा संयम ढळत नव्हता, हा पैलूही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केला. बाळासाहेब पवार हे विलक्षण व अलौकिक लोकनेते होते. मराठवाड्यावर सातत्याने अन्याय झाला, ही खंत उराशी बाळगून ते त्याविरुद्ध लढत राहिले. अनेक सहकारी साखर कारखाने उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला, हे सुरेश प्रभू यांनी नमूद केले. रावसाहेब दानवे यांनी बाळासाहेबांचे माझ्यावर कसे प्रेम होते, हे सांगितले व मी काँग्रेसमध्ये यावा यासाठी कसे कसे प्रयत्न केले, यावरही प्रकाश टाकला. विश्वनाथ दाशरथे यांनी गायलेल्या वैष्णव जन तो तेणे कहिए या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली व शेवटी जे का रंजले गांजले या भजनाने शेवट झाला. मानसिंग पवार, अजय शहा, किशोर शितोळे, प्रफुल्ल मालानी, जगन्नाथ काळे, आदेशपालसिंह छाबडा, दयाराम बसैय्ये, सुरेश वाकडे, प्रमोद खैरनार व विवेक जैस्वाल आदींनी तुकोबाची पगडी देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. रूपेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले.जयंतराव पाटील हे मुख्यमंत्र्यांकडे बघत म्हणाले, बाळासाहेब पवार यांचा मुख्यमंत्री हटवण्यात हातखंडा होता. आज ते हयात नाहीत. ( हंशा)रावसाहेब दानवे यावर कोटी न करतील तर नवल! व्यासपीठावर बसलेले जयंत पाटील व विखे पाटील यांच्याकडे बघत ते म्हणाले, बाळासाहेब पवार यांच्यासारखे तुम्ही दोन दोन जण असून काहीही उपयोग नाही. फडणवीस उत्तम काम करीत आहेत.मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र यावर एवढे म्हटले की, बाळासाहेब पवार हे मुख्यमंत्री हटवणारे म्हणणे चुकीचे आहे, तर ते नवा मुख्यमंत्री कसा असावा, असा आग्रह धरणारे होते.