शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थांना मिळणार घरीच पौष्टिक भोजन; शालेय पोषण आहाराचा शिल्लक साठा वितरित करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 18:52 IST

वाटपावेळी कोरोनाबाबत आदेश व सुचनाचे करावे लागणार पालन 

- सुनील घोडके

खुलताबाद : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जि.प. व खाजगी शाळामध्ये शिल्लक असलेला तांदूळ व डाळी ( कडधान्य) विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश शालेय व क्रीडा विभागाने निर्गमित केले आहेत. 

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोरोनाचा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्यातील शाळांना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वयेे 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे व नुकतेच केंद्र सरकारनेही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व बंद असल्याने शालेय मुले पोषण आहारापासून वचिंत राहत आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना पोषण होण्याच्या दृष्टीने आहार देणे आवश्यक आहे.जि.प.व खाजगी शाळास्तरावर शिल्लक असलला तांदूळ व डाळी ( कडधान्ये) विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश प्रशासनाने निर्गमित केले आहेत. 

पोषण आहार वाटप करत असतांनी शाळेचे मुख्याध्यापक / या योजनेचे काम बघणारे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी पोषण आहार समप्रमाणात वाटप करायचेे नियोजन करून विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटपाबाबत शाळास्तरावरून प्रसिध्दी करण्यात यावी. पोषण आहार नेण्याबाबत विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येवून शाळास्तरावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी .शाळेतील विद्यार्थी त्यांचे पालक यांना टप्या टप्याने शाळेत बोलवावे व वाटप करावे .उपस्थित असलेले पालक व विद्यार्थी यांना एकमेकापासुन रांगेत एक मीटर अंतरावर उभे करण्यात यावे. विद्यार्थी जर आजारी असेल तर घरपोच वाटप करण्यात यावे. कोरोनाबाबत दिलेल्या आदेश व  सुचनाचे कुठलेही उल्लघंन होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच वाटपाची पुर्वसुचनाा पोलीस व महसुल प्रशासनास द्यावी असे आदेश निर्गमित झाले आहे. 

शालेय पोषण आहार वाटपात अनेक अडचणी..कोरोनामुळे मुलांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे शिल्लक धान्य साठा मुलांना वाटप करण्याबाबत शासनाचे आदेश आहे.परंतु तांदूळ वगळता डाळी , मीठ,मसाला, जिरे ,हळद, मोहरी यांचे वाटप कसे करावे ? कारण हे तर प्रत्येक विद्यार्थ्यांना 20 ते100 ग्रॅम वाटप करावे लागेल.

- कैलास गायकवाड, जिल्हा सरचिटणीस प्राथमिक शिक्षक संघ औरंगाबाद.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या