शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आसाममधील ४०० कोटींच्या रस्त्याच्या टेंडरचे आमिष, कंत्राटदाराचे १ कोटी घेऊन संपर्क केला बंद

By सुमित डोळे | Updated: March 5, 2024 14:05 IST

हैदराबादच्या सृष्टी कन्सटेकच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : आसाममधील श्रीरामपूर ते ढोबरी या रस्त्याचे ३९४ कोटींच्या कामात भागीदार बनण्याचे आमिष दाखवून शहरातील कंत्राटदाराची १.१५ कोटी रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी हैदराबादमधील बडे कंत्राटदार, सृष्टी कन्सटेक प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक जे. राजशेखर व अन्य संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंत्राटदार विवेक गवई यांची २०१९ मध्ये आरोपी राजशेखरसोबत ओळख झाली होती. मे, २०२२ मध्ये त्यांना राजशेखरने आसाममधील एका रस्त्याच्या कामात भागीदारी करण्यासाठी विचारणा केली. त्यासाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचे डिपॉझिट देण्याची अट घातली. विश्वास ठेवून गवई यांनी त्याच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली; परंतु काही दिवसांतच आरोपीच्या कर्मचाऱ्यांनी गवई यांना संपर्क करून टेंडर मिळाले नसल्याचे सांगितले. शिवाय, ७ ऑक्टोबर, २०२२ रोजी अनामत रकमेसाठी गॅरंटीसाठी दिलेले कागदपत्रे परत देण्याची विनंती केली. गवई यांनी विश्वासाने ती देखील परत केली.

राजशेखरच्या वागण्यात बदलमूळ कागदपत्रे प्राप्त होताच राजशेखरच्या वागण्यात बदल झाला. त्याने गवई यांच्या कॉल, मेसेजला प्रतिसाद देणे कमी केले. गवई यांनी वारंवार त्याच्या कार्यालयात भेटण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांना भेटू दिले गेले नाही. पैशांचा तगादा सुरूच राहिल्याने राजशेखरने २० लाख रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर पूर्णपणे संपर्क बंद केला. त्यानंतर गवई यांनी पोलिसांकडे धाव घेतली. उपनिरीक्षक विनोद आबूज तपास करत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी