शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

'त्या' नकोशा बाळाचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 12:43 IST

पाच मुलींनंतर जन्मलेल्या आणि मुलगी समजून आईनेच शेतात फेकलेल्या टणकी येथील बाळाचा सोमवारी सकाळी घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

औरंगाबाद : पाच मुलींनंतर जन्मलेल्या आणि मुलगी समजून आईनेच शेतात फेकलेल्या टणकी येथील बाळाचा सोमवारी सकाळी घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. केवळ १२०० ग्रॅम वजन असलेल्या त्या बाळाची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत होती.

पाच मुलींनंतर सहाव्यांदा परत मुलगीच झाली, असे समजून सुनीता साळुंके या मातेनेच नवजात बाळाला दि. ३० रोजी शेतात फेकून दिले होते. मात्र पुरूष जातीचे अर्भक सापडल्याची चर्चा गावात सुरू झाल्यानंतर हे बाळ माझेच असल्याचे मातेने सांगितले होते.

या बाळावर बुधवारपासून घाटीतील बालरोग विभागाच्या वार्ड क्रं. २५ येथे उपचार सुरू होते. बाळाला जंतुसंसर्ग झाला होता आणि त्याला वॉर्मरमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही बाळाचे प्राण वाचू शकले नाहीत.

दि. ३० सप्टेंबररोजी सुनीता यांना पोटात दुखत असल्याने त्या शेतात शौचास गेल्या. त्याचठिकाणी त्यांची प्रसूती झाली. पण भेदरलेल्या अवस्थेत आणि पुन्हा मुलगी झाली असे समजून त्या बाळाला तिथेच टाकून आल्या आणि चक्कर येत होती म्हणून घरी येऊन झोपल्या. गावात चर्चा सुरू झाली असता, तिने हे सत्य सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीvaijapur-acवैजापूरDeathमृत्यू