शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

औरंगाबादच्या पाणीटंचाईबद्दल आक्रोश, संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:18 IST

शहरातील पाणीटंचाईबद्दल बुधवारी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मागील तीन महिन्यांप्रमाणेच प्रचंड ओरड आणि आक्रोश केला. या कृत्रिम पाणीटंचाईला फक्त आणि फक्त महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. हताश मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहरवासीयांची माफी मागत या प्रश्नावर तामिळनाडू येथील तज्ज्ञांना लवकरच पाचारण करण्यात येणार असल्याचे नमूद केले.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभा : तामिळनाडूच्या तज्ज्ञांची मदत घेणार; पाणीटंचाईला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील पाणीटंचाईबद्दल बुधवारी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मागील तीन महिन्यांप्रमाणेच प्रचंड ओरड आणि आक्रोश केला. या कृत्रिम पाणीटंचाईला फक्त आणि फक्त महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. हताश मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहरवासीयांची माफी मागत या प्रश्नावर तामिळनाडू येथील तज्ज्ञांना लवकरच पाचारण करण्यात येणार असल्याचे नमूद केले.बुधवारी सकाळी ११.३० वाजता सर्वसाधारण सभा सुरू होताच नगरसेवकांनी अत्यंत जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर चर्चा सुरू केली. तब्बल साडेतीन तास नगरसेवकांनी घसा कोरडा केला. तीन दिवसाआड पाणी देण्याचा शब्द प्रशासनाने दिला होता. यानंतरही शहरातील विविध वसाहतींमध्ये पाच आणि सहा दिवसाआड पाणी देण्यात येत आहे.अफसर खान यांनी तीन दिवसाआड पाणी का देऊ शकत नाही, असा जाब विचारला. त्यानंतर राजू शिंदे, सचिन खैरे, विकास जैन, सीताराम सुरे, त्र्यंबक तुपे, मनीषा मुंडे, रेशमा कुरैशी, स्वाती नागरे, भगवान घडमोडे, शिवाजी दांडगे,राजू वैद्य,भाऊसाहेब जगताप, संगीता वाघुले, सुरेखा सानप यांनी चर्चेत सहभाग घेतला. पाण्यामुळे नगरसेवकपद सोडण्याची वेळ आल्याचे सुरे यांनी नमूद करताच माधुरी अदवंत यांनीही पाठिंबा दर्शविला.कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल नगरसेवकांत भांडणे लावत असल्याचा आरोपही करण्यात आला.प्रशासनाकडूनच भेदभावजुन्या शहरातील काही वसाहतींना तीन दिवसाआड पाणी येते. सिडको-हडकोला चार दिवसाआडही पाणी देण्यात येत आहे. प्रशासनाकडून असा भेदभाव का असा प्रश्न रामेश्वर भादवे यांनी केला. सिडकोवरच अन्याय का, असा संतप्त सवाल नितीन चित्ते यांनी केला.पाणी मनपाचे; भांडण सेना नगरसेवकांमध्येसलीम अली सरोवराच्या बाजूला महापालिकेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. या प्रकल्पात विंधन विहिरीला भरपूर पाणी आहे. हे पाणी टँकरद्वारे जाधववाडी येथील नागरिकांना सेना नगरसेवक सीताराम सुरेदेत आहेत. त्याला एन-१२ येथील सेनेचे नगरसेवक मोहन मेघावाले यांनी कडाडून विरोध दर्शविला.दोन्ही नगरसेवकांमध्ये सर्वसाधारण सभेतच शाब्दिक चकमक उडाली. सेनेच्या दोन वाघांमधील भांडण पाहून भाजपसह इतर राजकीय पक्षांच्या नगरसेवकांना चांगल्याच गुदगुल्या होत होत्या.सर्वसाधारण सभेत सेनेचे नगरसेवक ज्या पद्धतीने भांडत होते ते पाहून नगरसेवक राजू वैद्य यांनी मध्यस्थी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी हा वाद नंतर बसून सोडविण्याचे आश्वासन दिल्यावर सभेतील शाब्दिक धुमश्चक्री थांबली.सेना नगरसेवकांत वाद सुरू असताना भाजपचे सदस्य बाके वाजवत होते. काँग्रेस, एमआयएम नगरसेवकही या वादामुळे आनंदी होते.पैसे भरून पाणी घ्या...मनपाच्या विंधन विहिरीवरून अनेक टँकरचालक पैसे भरून पाणी नेत आहेत. नगरसेवक सुरेयांनीही पैसे भरून पाणी नेण्यास सुरुवात केली. मागील महिन्यात मोहन मेघवाले यांनी पाणी नेण्यास मनाई केली. टँकरमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतोय, असे कारण मेघावाले यांनी दिले. मागील तीन वर्षांपासून नागरिक या पाण्याचा वापर करीत आहेत. आताच त्याला विरोध करण्याचे कारण काय, असा सवालही सुरे यांनी केला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादwater shortageपाणीकपात