शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

औरंगाबादेत कचऱ्याचा ‘खेळ’ मांडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:45 IST

शहरातील कचरा समस्या पाच महिन्यांपासून सुटता सुटत नाही. परिणामी सगळ्या शहराचा उकिरडा झाला असून, ऐन पावसाळ्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या सगळ्या भयावह परिस्थितीवर उपाय शोधण्याऐवजी राजकारणी आणि प्रशासन एकमेकांवर चिकलफेक करण्यात गुंतले आहेत. दरम्यान कचºयाच्या समस्येचा लोकप्रशासन पातळीवर ‘खेळ’ मांडला आहे.

ठळक मुद्देतनातणी : पाच महिन्यांपासून ते नेते, तेच अधिकारी व त्याच विषयाच्या बैठका

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा समस्या पाच महिन्यांपासून सुटता सुटत नाही. परिणामी सगळ्या शहराचा उकिरडा झाला असून, ऐन पावसाळ्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या सगळ्या भयावह परिस्थितीवर उपाय शोधण्याऐवजी राजकारणी आणि प्रशासन एकमेकांवर चिकलफेक करण्यात गुंतले आहेत. दरम्यान कचºयाच्या समस्येचा लोकप्रशासन पातळीवर ‘खेळ’ मांडला आहे.सोमवारी विभागीय आयुक्तालयात घनकचरा संनियंत्रण समितीची २५ वी बैठक झाली. बैठकीत तेच नेते, तेच अधिकारी आणि तोच पाच महिन्यांपासून चघळला जात असलेला विषय होता. यामध्ये नावीन्य असे काहीही नव्हते; परंतु बैठकीच्या सुरुवातीला आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर आणि खा.चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात गरमागरम चर्चा झाली.शेवटी दोन्ही बाजूंनी ‘डिफेन्सिव्ह मूड’ ची भूमिका घेतल्यानंतर पुढे काय करायचे यावर मंथन झाले. बैठकीच्या सुरुवातीलाच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आक्रमकपणे मुद्दे मांडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग विभागीय आयुक्तांनी संनियंत्रण समितीची जबाबदारी आणि पालिकेची जबाबदारी काय आहे, याचा पर्दाफाश केला. कचरा उचलण्याची मूळ जबाबदारी पालिकेची आहे. महापौर, आयुक्त आणि पदाधिकाºयांनी नियोजन केले पाहिजे, समिती पाठपुरावा करण्यासाठी स्थापन केली आहे. पालिकेला याप्रकरणी जाब विचारण्याचे सोडून विभागीय आयुक्तांना जाब कशासाठी विचारला जात आहे.पालिका काहीच करणार नसेल तर त्याला मी काय करणार, माझ्यावर आरोप कशाला करता, मला माझे काम करू द्या, मला राजकारणात रस नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.मागील आठवड्यात खा.खैरे यांनी विभागीय आयुक्त आणि विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्यामुळे कचरा प्रश्न सुटत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सोमवारच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता होती.त्या अनुषंगानेच सामान्य प्रशासनाने पोलीस बंदोबस्ताची तयारी करून ठेवली होती. परंतु बैठकीत दोन्ही बाजूंनी झालेले वाद नंतर सामोपचाराने चर्चेला घेण्यात आल्याने पोलीस बोलावण्याची वेळ आली नाही....अन् संजय शिरसाट भडकलेमिटमिटा येथील जागेचे नाव काढले की, आ. शिरसाट जाम भडकले. शहरातील प्रत्येक ठिकाणी असे प्रकार होत असतील तर अनेक वर्षे हा प्रश्न सुटणारच नाही, असे मत आयुक्त डॉ.निपुण यांनी व्यक्त केले. जैस्वाल म्हणाले, एक ते दीड हजार लोकांसाठी १५ लाख लोकांना वेठीस धरणे योग्य नाही. पालिकेतील सत्ताधाºयांवर सामान्य जनतेतून रोष निर्माण होतो आहे.अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराखा.खैरे म्हणाले, कचºयाची समस्या पूर्ण देशात आहे. दिल्लीसारख्या शहरातही यावरून आंदोलने होत आहेत. आज प्रशासनाला शेवटचा दम दिला आहे. यापुढे आम्ही सहन करणार नाही. हर्सूल, पडेगाव येथे पोलीस बंदोबस्ताचा वापर केला जाईल. यासाठी आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त देण्यास सूचित केले आहे. साडेचार कोटी रुपयांच्या मशीन खरेदीसाठी ६७:३ मध्ये खरेदी करण्यास परवानगी देण्याचे बैठकीत ठरले आहे. मंगळवारपासून हर्सूल, पडेगाव परिसरात कचरा टाकण्यात येईल. सगळी जबाबदारी लोकप्रतिनिधींची नाही. अधिकारी झोपा घेतात का? आम्ही २४ तास काम करतो. आम्ही नोकर व अधिकारी मालक, अशी अवस्था झाली आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका