शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत कचऱ्याचा ‘खेळ’ मांडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:45 IST

शहरातील कचरा समस्या पाच महिन्यांपासून सुटता सुटत नाही. परिणामी सगळ्या शहराचा उकिरडा झाला असून, ऐन पावसाळ्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या सगळ्या भयावह परिस्थितीवर उपाय शोधण्याऐवजी राजकारणी आणि प्रशासन एकमेकांवर चिकलफेक करण्यात गुंतले आहेत. दरम्यान कचºयाच्या समस्येचा लोकप्रशासन पातळीवर ‘खेळ’ मांडला आहे.

ठळक मुद्देतनातणी : पाच महिन्यांपासून ते नेते, तेच अधिकारी व त्याच विषयाच्या बैठका

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा समस्या पाच महिन्यांपासून सुटता सुटत नाही. परिणामी सगळ्या शहराचा उकिरडा झाला असून, ऐन पावसाळ्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या सगळ्या भयावह परिस्थितीवर उपाय शोधण्याऐवजी राजकारणी आणि प्रशासन एकमेकांवर चिकलफेक करण्यात गुंतले आहेत. दरम्यान कचºयाच्या समस्येचा लोकप्रशासन पातळीवर ‘खेळ’ मांडला आहे.सोमवारी विभागीय आयुक्तालयात घनकचरा संनियंत्रण समितीची २५ वी बैठक झाली. बैठकीत तेच नेते, तेच अधिकारी आणि तोच पाच महिन्यांपासून चघळला जात असलेला विषय होता. यामध्ये नावीन्य असे काहीही नव्हते; परंतु बैठकीच्या सुरुवातीला आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर आणि खा.चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात गरमागरम चर्चा झाली.शेवटी दोन्ही बाजूंनी ‘डिफेन्सिव्ह मूड’ ची भूमिका घेतल्यानंतर पुढे काय करायचे यावर मंथन झाले. बैठकीच्या सुरुवातीलाच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आक्रमकपणे मुद्दे मांडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग विभागीय आयुक्तांनी संनियंत्रण समितीची जबाबदारी आणि पालिकेची जबाबदारी काय आहे, याचा पर्दाफाश केला. कचरा उचलण्याची मूळ जबाबदारी पालिकेची आहे. महापौर, आयुक्त आणि पदाधिकाºयांनी नियोजन केले पाहिजे, समिती पाठपुरावा करण्यासाठी स्थापन केली आहे. पालिकेला याप्रकरणी जाब विचारण्याचे सोडून विभागीय आयुक्तांना जाब कशासाठी विचारला जात आहे.पालिका काहीच करणार नसेल तर त्याला मी काय करणार, माझ्यावर आरोप कशाला करता, मला माझे काम करू द्या, मला राजकारणात रस नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.मागील आठवड्यात खा.खैरे यांनी विभागीय आयुक्त आणि विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्यामुळे कचरा प्रश्न सुटत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सोमवारच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता होती.त्या अनुषंगानेच सामान्य प्रशासनाने पोलीस बंदोबस्ताची तयारी करून ठेवली होती. परंतु बैठकीत दोन्ही बाजूंनी झालेले वाद नंतर सामोपचाराने चर्चेला घेण्यात आल्याने पोलीस बोलावण्याची वेळ आली नाही....अन् संजय शिरसाट भडकलेमिटमिटा येथील जागेचे नाव काढले की, आ. शिरसाट जाम भडकले. शहरातील प्रत्येक ठिकाणी असे प्रकार होत असतील तर अनेक वर्षे हा प्रश्न सुटणारच नाही, असे मत आयुक्त डॉ.निपुण यांनी व्यक्त केले. जैस्वाल म्हणाले, एक ते दीड हजार लोकांसाठी १५ लाख लोकांना वेठीस धरणे योग्य नाही. पालिकेतील सत्ताधाºयांवर सामान्य जनतेतून रोष निर्माण होतो आहे.अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराखा.खैरे म्हणाले, कचºयाची समस्या पूर्ण देशात आहे. दिल्लीसारख्या शहरातही यावरून आंदोलने होत आहेत. आज प्रशासनाला शेवटचा दम दिला आहे. यापुढे आम्ही सहन करणार नाही. हर्सूल, पडेगाव येथे पोलीस बंदोबस्ताचा वापर केला जाईल. यासाठी आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त देण्यास सूचित केले आहे. साडेचार कोटी रुपयांच्या मशीन खरेदीसाठी ६७:३ मध्ये खरेदी करण्यास परवानगी देण्याचे बैठकीत ठरले आहे. मंगळवारपासून हर्सूल, पडेगाव परिसरात कचरा टाकण्यात येईल. सगळी जबाबदारी लोकप्रतिनिधींची नाही. अधिकारी झोपा घेतात का? आम्ही २४ तास काम करतो. आम्ही नोकर व अधिकारी मालक, अशी अवस्था झाली आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका