शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

औरंगाबादेत कचऱ्याचा ‘खेळ’ मांडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:45 IST

शहरातील कचरा समस्या पाच महिन्यांपासून सुटता सुटत नाही. परिणामी सगळ्या शहराचा उकिरडा झाला असून, ऐन पावसाळ्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या सगळ्या भयावह परिस्थितीवर उपाय शोधण्याऐवजी राजकारणी आणि प्रशासन एकमेकांवर चिकलफेक करण्यात गुंतले आहेत. दरम्यान कचºयाच्या समस्येचा लोकप्रशासन पातळीवर ‘खेळ’ मांडला आहे.

ठळक मुद्देतनातणी : पाच महिन्यांपासून ते नेते, तेच अधिकारी व त्याच विषयाच्या बैठका

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा समस्या पाच महिन्यांपासून सुटता सुटत नाही. परिणामी सगळ्या शहराचा उकिरडा झाला असून, ऐन पावसाळ्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या सगळ्या भयावह परिस्थितीवर उपाय शोधण्याऐवजी राजकारणी आणि प्रशासन एकमेकांवर चिकलफेक करण्यात गुंतले आहेत. दरम्यान कचºयाच्या समस्येचा लोकप्रशासन पातळीवर ‘खेळ’ मांडला आहे.सोमवारी विभागीय आयुक्तालयात घनकचरा संनियंत्रण समितीची २५ वी बैठक झाली. बैठकीत तेच नेते, तेच अधिकारी आणि तोच पाच महिन्यांपासून चघळला जात असलेला विषय होता. यामध्ये नावीन्य असे काहीही नव्हते; परंतु बैठकीच्या सुरुवातीला आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर आणि खा.चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात गरमागरम चर्चा झाली.शेवटी दोन्ही बाजूंनी ‘डिफेन्सिव्ह मूड’ ची भूमिका घेतल्यानंतर पुढे काय करायचे यावर मंथन झाले. बैठकीच्या सुरुवातीलाच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आक्रमकपणे मुद्दे मांडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग विभागीय आयुक्तांनी संनियंत्रण समितीची जबाबदारी आणि पालिकेची जबाबदारी काय आहे, याचा पर्दाफाश केला. कचरा उचलण्याची मूळ जबाबदारी पालिकेची आहे. महापौर, आयुक्त आणि पदाधिकाºयांनी नियोजन केले पाहिजे, समिती पाठपुरावा करण्यासाठी स्थापन केली आहे. पालिकेला याप्रकरणी जाब विचारण्याचे सोडून विभागीय आयुक्तांना जाब कशासाठी विचारला जात आहे.पालिका काहीच करणार नसेल तर त्याला मी काय करणार, माझ्यावर आरोप कशाला करता, मला माझे काम करू द्या, मला राजकारणात रस नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.मागील आठवड्यात खा.खैरे यांनी विभागीय आयुक्त आणि विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्यामुळे कचरा प्रश्न सुटत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सोमवारच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता होती.त्या अनुषंगानेच सामान्य प्रशासनाने पोलीस बंदोबस्ताची तयारी करून ठेवली होती. परंतु बैठकीत दोन्ही बाजूंनी झालेले वाद नंतर सामोपचाराने चर्चेला घेण्यात आल्याने पोलीस बोलावण्याची वेळ आली नाही....अन् संजय शिरसाट भडकलेमिटमिटा येथील जागेचे नाव काढले की, आ. शिरसाट जाम भडकले. शहरातील प्रत्येक ठिकाणी असे प्रकार होत असतील तर अनेक वर्षे हा प्रश्न सुटणारच नाही, असे मत आयुक्त डॉ.निपुण यांनी व्यक्त केले. जैस्वाल म्हणाले, एक ते दीड हजार लोकांसाठी १५ लाख लोकांना वेठीस धरणे योग्य नाही. पालिकेतील सत्ताधाºयांवर सामान्य जनतेतून रोष निर्माण होतो आहे.अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराखा.खैरे म्हणाले, कचºयाची समस्या पूर्ण देशात आहे. दिल्लीसारख्या शहरातही यावरून आंदोलने होत आहेत. आज प्रशासनाला शेवटचा दम दिला आहे. यापुढे आम्ही सहन करणार नाही. हर्सूल, पडेगाव येथे पोलीस बंदोबस्ताचा वापर केला जाईल. यासाठी आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त देण्यास सूचित केले आहे. साडेचार कोटी रुपयांच्या मशीन खरेदीसाठी ६७:३ मध्ये खरेदी करण्यास परवानगी देण्याचे बैठकीत ठरले आहे. मंगळवारपासून हर्सूल, पडेगाव परिसरात कचरा टाकण्यात येईल. सगळी जबाबदारी लोकप्रतिनिधींची नाही. अधिकारी झोपा घेतात का? आम्ही २४ तास काम करतो. आम्ही नोकर व अधिकारी मालक, अशी अवस्था झाली आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका