शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

औरंगाबादेत कचऱ्याचा ‘खेळ’ मांडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:45 IST

शहरातील कचरा समस्या पाच महिन्यांपासून सुटता सुटत नाही. परिणामी सगळ्या शहराचा उकिरडा झाला असून, ऐन पावसाळ्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या सगळ्या भयावह परिस्थितीवर उपाय शोधण्याऐवजी राजकारणी आणि प्रशासन एकमेकांवर चिकलफेक करण्यात गुंतले आहेत. दरम्यान कचºयाच्या समस्येचा लोकप्रशासन पातळीवर ‘खेळ’ मांडला आहे.

ठळक मुद्देतनातणी : पाच महिन्यांपासून ते नेते, तेच अधिकारी व त्याच विषयाच्या बैठका

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा समस्या पाच महिन्यांपासून सुटता सुटत नाही. परिणामी सगळ्या शहराचा उकिरडा झाला असून, ऐन पावसाळ्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या सगळ्या भयावह परिस्थितीवर उपाय शोधण्याऐवजी राजकारणी आणि प्रशासन एकमेकांवर चिकलफेक करण्यात गुंतले आहेत. दरम्यान कचºयाच्या समस्येचा लोकप्रशासन पातळीवर ‘खेळ’ मांडला आहे.सोमवारी विभागीय आयुक्तालयात घनकचरा संनियंत्रण समितीची २५ वी बैठक झाली. बैठकीत तेच नेते, तेच अधिकारी आणि तोच पाच महिन्यांपासून चघळला जात असलेला विषय होता. यामध्ये नावीन्य असे काहीही नव्हते; परंतु बैठकीच्या सुरुवातीला आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर आणि खा.चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात गरमागरम चर्चा झाली.शेवटी दोन्ही बाजूंनी ‘डिफेन्सिव्ह मूड’ ची भूमिका घेतल्यानंतर पुढे काय करायचे यावर मंथन झाले. बैठकीच्या सुरुवातीलाच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आक्रमकपणे मुद्दे मांडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग विभागीय आयुक्तांनी संनियंत्रण समितीची जबाबदारी आणि पालिकेची जबाबदारी काय आहे, याचा पर्दाफाश केला. कचरा उचलण्याची मूळ जबाबदारी पालिकेची आहे. महापौर, आयुक्त आणि पदाधिकाºयांनी नियोजन केले पाहिजे, समिती पाठपुरावा करण्यासाठी स्थापन केली आहे. पालिकेला याप्रकरणी जाब विचारण्याचे सोडून विभागीय आयुक्तांना जाब कशासाठी विचारला जात आहे.पालिका काहीच करणार नसेल तर त्याला मी काय करणार, माझ्यावर आरोप कशाला करता, मला माझे काम करू द्या, मला राजकारणात रस नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.मागील आठवड्यात खा.खैरे यांनी विभागीय आयुक्त आणि विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्यामुळे कचरा प्रश्न सुटत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सोमवारच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता होती.त्या अनुषंगानेच सामान्य प्रशासनाने पोलीस बंदोबस्ताची तयारी करून ठेवली होती. परंतु बैठकीत दोन्ही बाजूंनी झालेले वाद नंतर सामोपचाराने चर्चेला घेण्यात आल्याने पोलीस बोलावण्याची वेळ आली नाही....अन् संजय शिरसाट भडकलेमिटमिटा येथील जागेचे नाव काढले की, आ. शिरसाट जाम भडकले. शहरातील प्रत्येक ठिकाणी असे प्रकार होत असतील तर अनेक वर्षे हा प्रश्न सुटणारच नाही, असे मत आयुक्त डॉ.निपुण यांनी व्यक्त केले. जैस्वाल म्हणाले, एक ते दीड हजार लोकांसाठी १५ लाख लोकांना वेठीस धरणे योग्य नाही. पालिकेतील सत्ताधाºयांवर सामान्य जनतेतून रोष निर्माण होतो आहे.अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराखा.खैरे म्हणाले, कचºयाची समस्या पूर्ण देशात आहे. दिल्लीसारख्या शहरातही यावरून आंदोलने होत आहेत. आज प्रशासनाला शेवटचा दम दिला आहे. यापुढे आम्ही सहन करणार नाही. हर्सूल, पडेगाव येथे पोलीस बंदोबस्ताचा वापर केला जाईल. यासाठी आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त देण्यास सूचित केले आहे. साडेचार कोटी रुपयांच्या मशीन खरेदीसाठी ६७:३ मध्ये खरेदी करण्यास परवानगी देण्याचे बैठकीत ठरले आहे. मंगळवारपासून हर्सूल, पडेगाव परिसरात कचरा टाकण्यात येईल. सगळी जबाबदारी लोकप्रतिनिधींची नाही. अधिकारी झोपा घेतात का? आम्ही २४ तास काम करतो. आम्ही नोकर व अधिकारी मालक, अशी अवस्था झाली आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका