शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादची कचराकोंडी फुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:42 IST

शहरात मागील पाच महिन्यांपासून साचलेला हजारो टन कचरा कुठे टाकायचा याबाबतची कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. महापालिका आणि कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्दे४० कि.मी.अंतर : हर्षवर्धन जाधव यांचा पुढाकार, मनपाकडून जागेची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात मागील पाच महिन्यांपासून साचलेला हजारो टन कचरा कुठे टाकायचा याबाबतची कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. महापालिका आणि कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद शहरातील सर्व कचरा ४० कि. मी. अंतरावर कन्नड तालुक्यात नेऊन प्रक्रिया करणार आहेत. या कचऱ्यापासून तयार होणारे खत शेतक-यांना मोफत देण्यात येईल. महापालिका अधिका-यांनीही ७० एकर जागेची पाहणी केली. रविवारपासून दररोज ५० ट्रक कचरा उचलून नेण्यात येणार आहे.शहरात दररोज ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. १६ फेबु्रवारीपासून नारेगाव येथे कचरा टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. मागील १४९ दिवसांपासून शहरात कचरा पडून आहे. आतापर्यंत २५ हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. मध्यवर्ती जकात नाका, हर्सूल, पडेगाव येथे कचºयाचे मोठमोठे डोंगर तयार झाले आहेत. कचरा टाकण्यास नागरिकांकडून होणाºया विरोधामुळे महापालिकेचीही कोंडी झाली आहे. या कोंडीतून मार्ग निघणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.तीन जागांची पाहणीऔरंगाबाद शहरातील कचरा टाकण्यासाठी शनिवारी एकूण तीन जागांची पाहणी करण्यात आली. पिशोर भागातील कोळंबी येथील १२५ एकर गायरान जागा पाहण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद शहरापासून थेट हायवेवर लागणारे हतनूरजवळील घुसूर येथील ७० एकर गायरान जागा कचरा टाकण्यासाठी संयुक्तिक वाटली. याशिवाय नागदजवळील वाघुळखेडा येथील ३० हेक्टर जागेची चाचपणी करण्यात आली.कचºयावर प्रक्रिया करणारऔरंगाबाद शहरातील कचरा भौैगोलिकदृष्ट्या कन्नड तालुक्यात नेण्यात येणार आहे. ज्याठिकाणी कचरा टाकण्यात येईल, तेथे महापालिका प्रक्रियाही करणार आहे. कचºयापासून तयार होणारा खत शेतकºयांना मोफत देण्याचा निर्णयही आ. जाधव यांनी घेतला.कोणी तरी पुढाकार घ्यावा...समर्थनगरसारख्या वॉर्डातील पन्नास टक्के नागरिक व्हायरल फिवरमुळे आजारी पडले आहेत. शहरात मागील पाच महिन्यांपासून कचरा साचला आहे. गंभीर रोगराई पसरण्याची भीती आहे. शहराच्या चांगल्यासाठी कोणाला तरी पुढाकार घेणे गरजेचे होते. मी कन्नड तालुक्यातील नागरिकांना विश्वासात घेऊन कचºयावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.ल्ल हर्षवर्धन जाधव, आमदार, कन्नड

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव