शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

औरंगाबादची कचराकोंडी फुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:42 IST

शहरात मागील पाच महिन्यांपासून साचलेला हजारो टन कचरा कुठे टाकायचा याबाबतची कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. महापालिका आणि कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्दे४० कि.मी.अंतर : हर्षवर्धन जाधव यांचा पुढाकार, मनपाकडून जागेची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात मागील पाच महिन्यांपासून साचलेला हजारो टन कचरा कुठे टाकायचा याबाबतची कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. महापालिका आणि कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद शहरातील सर्व कचरा ४० कि. मी. अंतरावर कन्नड तालुक्यात नेऊन प्रक्रिया करणार आहेत. या कचऱ्यापासून तयार होणारे खत शेतक-यांना मोफत देण्यात येईल. महापालिका अधिका-यांनीही ७० एकर जागेची पाहणी केली. रविवारपासून दररोज ५० ट्रक कचरा उचलून नेण्यात येणार आहे.शहरात दररोज ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. १६ फेबु्रवारीपासून नारेगाव येथे कचरा टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. मागील १४९ दिवसांपासून शहरात कचरा पडून आहे. आतापर्यंत २५ हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. मध्यवर्ती जकात नाका, हर्सूल, पडेगाव येथे कचºयाचे मोठमोठे डोंगर तयार झाले आहेत. कचरा टाकण्यास नागरिकांकडून होणाºया विरोधामुळे महापालिकेचीही कोंडी झाली आहे. या कोंडीतून मार्ग निघणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.तीन जागांची पाहणीऔरंगाबाद शहरातील कचरा टाकण्यासाठी शनिवारी एकूण तीन जागांची पाहणी करण्यात आली. पिशोर भागातील कोळंबी येथील १२५ एकर गायरान जागा पाहण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद शहरापासून थेट हायवेवर लागणारे हतनूरजवळील घुसूर येथील ७० एकर गायरान जागा कचरा टाकण्यासाठी संयुक्तिक वाटली. याशिवाय नागदजवळील वाघुळखेडा येथील ३० हेक्टर जागेची चाचपणी करण्यात आली.कचºयावर प्रक्रिया करणारऔरंगाबाद शहरातील कचरा भौैगोलिकदृष्ट्या कन्नड तालुक्यात नेण्यात येणार आहे. ज्याठिकाणी कचरा टाकण्यात येईल, तेथे महापालिका प्रक्रियाही करणार आहे. कचºयापासून तयार होणारा खत शेतकºयांना मोफत देण्याचा निर्णयही आ. जाधव यांनी घेतला.कोणी तरी पुढाकार घ्यावा...समर्थनगरसारख्या वॉर्डातील पन्नास टक्के नागरिक व्हायरल फिवरमुळे आजारी पडले आहेत. शहरात मागील पाच महिन्यांपासून कचरा साचला आहे. गंभीर रोगराई पसरण्याची भीती आहे. शहराच्या चांगल्यासाठी कोणाला तरी पुढाकार घेणे गरजेचे होते. मी कन्नड तालुक्यातील नागरिकांना विश्वासात घेऊन कचºयावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.ल्ल हर्षवर्धन जाधव, आमदार, कन्नड

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव