शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादची कचराकोंडी फुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:42 IST

शहरात मागील पाच महिन्यांपासून साचलेला हजारो टन कचरा कुठे टाकायचा याबाबतची कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. महापालिका आणि कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्दे४० कि.मी.अंतर : हर्षवर्धन जाधव यांचा पुढाकार, मनपाकडून जागेची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात मागील पाच महिन्यांपासून साचलेला हजारो टन कचरा कुठे टाकायचा याबाबतची कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. महापालिका आणि कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद शहरातील सर्व कचरा ४० कि. मी. अंतरावर कन्नड तालुक्यात नेऊन प्रक्रिया करणार आहेत. या कचऱ्यापासून तयार होणारे खत शेतक-यांना मोफत देण्यात येईल. महापालिका अधिका-यांनीही ७० एकर जागेची पाहणी केली. रविवारपासून दररोज ५० ट्रक कचरा उचलून नेण्यात येणार आहे.शहरात दररोज ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. १६ फेबु्रवारीपासून नारेगाव येथे कचरा टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. मागील १४९ दिवसांपासून शहरात कचरा पडून आहे. आतापर्यंत २५ हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. मध्यवर्ती जकात नाका, हर्सूल, पडेगाव येथे कचºयाचे मोठमोठे डोंगर तयार झाले आहेत. कचरा टाकण्यास नागरिकांकडून होणाºया विरोधामुळे महापालिकेचीही कोंडी झाली आहे. या कोंडीतून मार्ग निघणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.तीन जागांची पाहणीऔरंगाबाद शहरातील कचरा टाकण्यासाठी शनिवारी एकूण तीन जागांची पाहणी करण्यात आली. पिशोर भागातील कोळंबी येथील १२५ एकर गायरान जागा पाहण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद शहरापासून थेट हायवेवर लागणारे हतनूरजवळील घुसूर येथील ७० एकर गायरान जागा कचरा टाकण्यासाठी संयुक्तिक वाटली. याशिवाय नागदजवळील वाघुळखेडा येथील ३० हेक्टर जागेची चाचपणी करण्यात आली.कचºयावर प्रक्रिया करणारऔरंगाबाद शहरातील कचरा भौैगोलिकदृष्ट्या कन्नड तालुक्यात नेण्यात येणार आहे. ज्याठिकाणी कचरा टाकण्यात येईल, तेथे महापालिका प्रक्रियाही करणार आहे. कचºयापासून तयार होणारा खत शेतकºयांना मोफत देण्याचा निर्णयही आ. जाधव यांनी घेतला.कोणी तरी पुढाकार घ्यावा...समर्थनगरसारख्या वॉर्डातील पन्नास टक्के नागरिक व्हायरल फिवरमुळे आजारी पडले आहेत. शहरात मागील पाच महिन्यांपासून कचरा साचला आहे. गंभीर रोगराई पसरण्याची भीती आहे. शहराच्या चांगल्यासाठी कोणाला तरी पुढाकार घेणे गरजेचे होते. मी कन्नड तालुक्यातील नागरिकांना विश्वासात घेऊन कचºयावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.ल्ल हर्षवर्धन जाधव, आमदार, कन्नड

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव