शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांचा पुन्हा घडवला इतिहास; एकाच दिवशी शहरात १०१ इलेक्ट्रिक कार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 13:28 IST

समारंभपूर्वक वितरण : यात २५ महिला डॉक्टर्स, उद्योजक, प्राध्यापकांचा समावेश

औरंगाबाद : नोंदणी केलेल्या २५० पैकी सोमवारी एकाच दिवशी १०१ इलेक्ट्रिक कार शहरात दाखल झाल्या. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्री या कारचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, यामध्ये २५ महिला डॉक्टर्स, उद्योजक, प्राध्यापकांचा समावेश आहे. शहराला ईव्ही मॅपवर नेण्याच्या दिशेने पडलेले हे पाऊल म्हणावे लागेल. दोन महिन्यांपूर्वी मराठवाडा ऑटो क्लस्टरने औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी (एएमजीएम) या अभियानाची सुरुवात केली होती. या अभियानांतर्गत शहरातील उद्योजक, वकील, डॉक्टर, प्राध्यापक व काही नागरिकांनी २५० इलेक्ट्रिक कारची बुकिंग केली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात सोमवारी १०१ कारचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. औरंगाबाद शहर हे राज्यातील आघाडीचे औद्योगिक उत्पादन आणि ऑटोमोबाईल हब म्हणून नावारूपास आलेले आहे.

यावेळी बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले, ‘एएमजीएम’चे सदस्य केवळ वैयक्तिक योगदानकर्ता म्हणूनच नव्हे, तर औरंगाबाद शहर हरित, स्वच्छ आणि प्रदूषण विरहित करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या अभियानाचा इतर राज्यांसाठीही एक आदर्श निर्माण होईल.

उल्हास गवळी म्हणाले, औरंगाबाद शहराला मागील काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने वाढत्या प्रदूषणामुळे काही निर्बंध लावले होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने उपाययोजना करण्यासोबतच आपणही पुढाकार घ्यावा, असा विचार करून हे अभियान सुरू झाले. प्रदूषण न करणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने दोन महिन्यांपूर्वी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यास कमी वेळेत औरंगाबाद शहरवासीयांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या टप्प्यातील कारनंतर आता इलेक्ट्रिक तीन चाकी, दुचाकी, बस औरंगाबादच्या रस्त्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.

कार्यक्रमास मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता उपस्थित होते. मनपा प्रशासक पाण्डेय म्हणाले, स्मार्टसिटीवतीने ईव्ही पॉलिसीची अंमलबजावणी करण्यात येत असून लवकर शहरबसमध्ये नवीन ६० ईव्ही बस दाखल होतील. कर्मचाऱ्यांसाठी ईव्ही कार आणि शहरात २००हून अधिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रस्तावना राजलक्ष्मी लोढा आणि आभार प्रदर्शन सतीश लोढा यांनी केले. या वेळी ‘सीएमआयए’चे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, ‘सीआयआय’चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, ऋषी बागला, मुनिष शर्मा, गिरधर संगेरिया, आशिष गर्दे, प्रशांत देशपांडे, सचिन मुळे, अभय हंचनाळ, मनीष धूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका