शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांनी खूप दिलं,पण शिवसेनेनं शहराला काय दिलं?; पाणी प्रश्नावरून फडणवीसांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 19:18 IST

जनतेचा आक्रोश सरकारला खाक करेल, पाणी प्रश्नावरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल 

औरंगाबाद: मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात जनता पाण्यासाठी तरसत आहे. या शहराने शिवसेनेला खूप दिले पण शिवसनेने त्यांना काय दिले. हा मोर्चा व्यवस्था बदलण्यासाठी आहे. जनतेचा आक्रोश राज्य सरकारला खाक करेल, असा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जल आक्रोश मोर्चात बोलताना केला.

औरंगाबाद शहरात पाण्याच्या प्रश्न बिकट झाला आहे. आठ ते दहा दिवसांनी होणारा अपुरा, कमी दाबाने होणार पाणीपुरवठा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पाणी समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रयत्न करत असून शहराच्या वाढलेल्या विस्तारामुळे अनेक अडचणी येत आहेत. शहरात पाणी प्रश्न सुटावा यासाठी भाजपने आज जल आक्रोश मोर्चा काढला आहे. याचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. यावेळी विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लबोल केला. ते म्हणाले, शहरासाठी १६०० कोटी रुपयांची पाणी पाणी पुरवठा योजना आमच्या काळात मंजूर करण्यात आली मात्र, ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगित केली. आता या योजनेचे काम संथ गतीने सुरु आहे. या वेगाने काम होत राहिले तर २५ वर्ष लागतील. हा मोर्चा भाजपाचा नसून जनतेचा आहे. जनतेचा आक्रोश राज्य सरकारला खाक करेल. शिवसेनेला शहराने खूप दिले पण त्यांनी शहराला काय दिले असा सवालही फडणवीस यांनी यावेळी केला. 

हंडे घेऊन महिलांचा सहभाग मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. महिला रिकामे हंडे घेऊन मोर्चात सहभागी आहेत. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. शहराचे, उद्योगांचे मोठे नुकसान पाणी प्रश्नामुळे होत असल्याच्या भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.    

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस