शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

औरंगाबादकरांनी खूप दिलं,पण शिवसेनेनं शहराला काय दिलं?; पाणी प्रश्नावरून फडणवीसांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 19:18 IST

जनतेचा आक्रोश सरकारला खाक करेल, पाणी प्रश्नावरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल 

औरंगाबाद: मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात जनता पाण्यासाठी तरसत आहे. या शहराने शिवसेनेला खूप दिले पण शिवसनेने त्यांना काय दिले. हा मोर्चा व्यवस्था बदलण्यासाठी आहे. जनतेचा आक्रोश राज्य सरकारला खाक करेल, असा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जल आक्रोश मोर्चात बोलताना केला.

औरंगाबाद शहरात पाण्याच्या प्रश्न बिकट झाला आहे. आठ ते दहा दिवसांनी होणारा अपुरा, कमी दाबाने होणार पाणीपुरवठा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पाणी समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रयत्न करत असून शहराच्या वाढलेल्या विस्तारामुळे अनेक अडचणी येत आहेत. शहरात पाणी प्रश्न सुटावा यासाठी भाजपने आज जल आक्रोश मोर्चा काढला आहे. याचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. यावेळी विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लबोल केला. ते म्हणाले, शहरासाठी १६०० कोटी रुपयांची पाणी पाणी पुरवठा योजना आमच्या काळात मंजूर करण्यात आली मात्र, ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगित केली. आता या योजनेचे काम संथ गतीने सुरु आहे. या वेगाने काम होत राहिले तर २५ वर्ष लागतील. हा मोर्चा भाजपाचा नसून जनतेचा आहे. जनतेचा आक्रोश राज्य सरकारला खाक करेल. शिवसेनेला शहराने खूप दिले पण त्यांनी शहराला काय दिले असा सवालही फडणवीस यांनी यावेळी केला. 

हंडे घेऊन महिलांचा सहभाग मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. महिला रिकामे हंडे घेऊन मोर्चात सहभागी आहेत. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. शहराचे, उद्योगांचे मोठे नुकसान पाणी प्रश्नामुळे होत असल्याच्या भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.    

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस