शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

औरंगाबादकरांनी स्थापन केली ‘वाहनचोर त्रस्त आंदोलन समिती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 12:06 IST

शहरातील विविध समस्यांसाठी अनेक संघटना आणि समित्या कार्यरत आहेत. यामध्ये आणखी एका समितीची भर पडली आहे

ठळक मुद्देही समिती आहे वाहन चोरीने त्रस्त झालेल्या नागरिकांची.

औरंगाबाद : शहरातील विविध समस्यांसाठी अनेक संघटना आणि समित्या कार्यरत आहेत. यामध्ये आणखी एका समितीची भर पडली आहे; परंतु आतापर्यंतच्या सगळ्या समित्यांपेक्षा ही समिती काहीशी वेगळी आहे. ही समिती आहे वाहन चोरीने त्रस्त झालेल्या नागरिकांची. ‘वाहनचोर त्रस्त आंदोलन समिती’ असे तिचे नाव आहे. 

शहरात सध्या दुचाकी चोरांचा सुळसुळाट झाला आहे. दररोज किमान ३ ते ४ वाहने चोरीला जात आहेत. विविध पोलीस ठाण्यांत यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; परंतु वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसते. याविषयी वाहनमालकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. पोलीस प्रशासन कारवाईच्या नावाखाली केवळ वेळ काढूपणा करीत असून ‘वजनदार’ व्यक्तीचे वाहन तात्काळ सापडते आणि सर्वसामान्यांचे वाहन सापडत नाही, अशी ओरड होत आहे.

या सगळ्या विरोधात आता वाहन चोरीने त्रस्त झालेले नागरिक एकजूट झाले आहेत. चोरीला गेलेले वाहन परत मिळविण्यासाठी प्रशासनाविरोधात आवाज बुलंद केला जात आहे. शहरामध्ये दुचाकी सांभाळणे अवघड झाले आहे. दररोज दुचाकी चोरीला जात आहेत. चोरीला गेलेल्या दुचाकी सापडण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही ठिकाणी दुचाकी चोर दिसून येतात; परंतु ते पोलिसांच्या हाती लागत नाहीत.

आधी निवेदन, नंतर आंदोलनमाझी स्वत:ची बुलेट चोरीला गेली. संशयित, सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध असूनही वाहन शोधण्याकडे दुर्लक्ष होतेय. माझ्यासह अनेकांना हाच अनुभव येतो. त्यामुळे समिती स्थापन केली. यासंदर्भात आधी पोलिसांना निवेदन दिले जाईल. त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असे समितीचे अध्यक्ष राहुल देशमुख म्हणाले.

टॅग्स :theftचोरीtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस