शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

औरंगाबादने दिल्ली, हैद्राबादला मागे टाकत जिंकले 'स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 18:46 IST

देशभरातील ११३ शहरांमध्ये औरंगाबादने पहिल्या ११ मध्ये स्थान मिळवले

औरंगाबाद : केंद्र सरकारने आयोजित केलेल्या स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजमध्ये देशभरातील ११३ शहरांमध्ये औरंगाबादने पहिल्या ११ मध्ये स्थान मिळवून स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज जिंकले. स्मार्ट सिटीज मिशनने सोमवारी आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या यशाबद्दल शहराला ५० लाख रुपयांचे बक्षीसही मिळणार आहे.

रस्त्यांवर चालणे सर्वांसाठी अनुकूल, सुरक्षित आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत स्मार्ट सिटीज मिशनद्वारे स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज सुरू करण्यात आले होते. या मोहिमेचा एक भाग म्हणून क्रांती चौक आणि कॅनॉट परिसरात पायलट प्रकल्प राबविले.

स्ट्रीट्स फॉर पीपल अंतर्गत औरंगाबादने पैठण गेट, क्रांती चौक आणि कॅनॉट येथे ओपन स्ट्रीट कार्यक्रम आयोजित केले होते. नागरिकांना वाहनमुक्त रस्त्यांचा अनुभव देण्यासाठी रस्त्यांवर वाहतूक बंद करण्यात आली होती. स्मार्ट सिटीने ४ रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी डिझाइन तयार केले आहे. क्रांती चौक ते गोपाळ टी, पैठण गेट ते गुलमंडी, कॅनॉट आणि प्रियदर्शनी एमजीएम स्ट्रीट येथे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.

सोमवारी केंद्र शासनाने या प्रकल्पातील प्रमुख अकरा शहरांची घोषणा केली, त्यामध्ये औरंगाबादचा समावेश करण्यात आला. औरंगाबादने नवी दिल्ली, चंदीगड, हैदराबाद, सुरत, जयपूर, भोपाळ, नाशिक आणि ठाणे या मोठ्या शहरांना मागे टाकले. या यशाबद्दल स्मार्ट सिटीला ५० लाखांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

देशभरातील ११३ शहरांमध्ये औरंगाबाद शहराची प्रमुख अकरामध्ये निवड होणे ही फार मोठी बाब आहे. हे मोठे यश असून या शहराची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल. याचे श्रेय औरंगाबादचे नागरिक, स्मार्ट सिटी आणि महानगरपालिकेला जाते. निवडक रस्त्यांवर औरंगाबादला आधुनिक स्वरूप देण्यासाठी परिवर्तनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- अस्तिककुमार पाण्डेय, सीईओ, स्मार्ट सिटी औरंगाबाद.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी