शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

औरंगाबादने दिल्ली, हैद्राबादला मागे टाकत जिंकले 'स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 18:46 IST

देशभरातील ११३ शहरांमध्ये औरंगाबादने पहिल्या ११ मध्ये स्थान मिळवले

औरंगाबाद : केंद्र सरकारने आयोजित केलेल्या स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजमध्ये देशभरातील ११३ शहरांमध्ये औरंगाबादने पहिल्या ११ मध्ये स्थान मिळवून स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज जिंकले. स्मार्ट सिटीज मिशनने सोमवारी आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या यशाबद्दल शहराला ५० लाख रुपयांचे बक्षीसही मिळणार आहे.

रस्त्यांवर चालणे सर्वांसाठी अनुकूल, सुरक्षित आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत स्मार्ट सिटीज मिशनद्वारे स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज सुरू करण्यात आले होते. या मोहिमेचा एक भाग म्हणून क्रांती चौक आणि कॅनॉट परिसरात पायलट प्रकल्प राबविले.

स्ट्रीट्स फॉर पीपल अंतर्गत औरंगाबादने पैठण गेट, क्रांती चौक आणि कॅनॉट येथे ओपन स्ट्रीट कार्यक्रम आयोजित केले होते. नागरिकांना वाहनमुक्त रस्त्यांचा अनुभव देण्यासाठी रस्त्यांवर वाहतूक बंद करण्यात आली होती. स्मार्ट सिटीने ४ रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी डिझाइन तयार केले आहे. क्रांती चौक ते गोपाळ टी, पैठण गेट ते गुलमंडी, कॅनॉट आणि प्रियदर्शनी एमजीएम स्ट्रीट येथे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.

सोमवारी केंद्र शासनाने या प्रकल्पातील प्रमुख अकरा शहरांची घोषणा केली, त्यामध्ये औरंगाबादचा समावेश करण्यात आला. औरंगाबादने नवी दिल्ली, चंदीगड, हैदराबाद, सुरत, जयपूर, भोपाळ, नाशिक आणि ठाणे या मोठ्या शहरांना मागे टाकले. या यशाबद्दल स्मार्ट सिटीला ५० लाखांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

देशभरातील ११३ शहरांमध्ये औरंगाबाद शहराची प्रमुख अकरामध्ये निवड होणे ही फार मोठी बाब आहे. हे मोठे यश असून या शहराची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल. याचे श्रेय औरंगाबादचे नागरिक, स्मार्ट सिटी आणि महानगरपालिकेला जाते. निवडक रस्त्यांवर औरंगाबादला आधुनिक स्वरूप देण्यासाठी परिवर्तनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- अस्तिककुमार पाण्डेय, सीईओ, स्मार्ट सिटी औरंगाबाद.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी