शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

औरंगाबाद मनपा कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाचा तिढा लवकरच सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : दीड वर्षापूर्वी सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला कर्मचाºयांचा आकृतिबंध अद्याप शासनाकडे सादर करण्यात आलेला नाही. ...

ठळक मुद्देमहापौर : मंजुरीच्या कामासाठी स्वतंत्र अधिकाºयाची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दीड वर्षापूर्वी सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला कर्मचाºयांचा आकृतिबंध अद्याप शासनाकडे सादर करण्यात आलेला नाही. आकृतिबंधामधील तांत्रिक दोष बाजूला करून तो लवकरात लवकर शासनाकडून मंजूर कसा होईल, यादृष्टीने स्वतंत्र अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी दिली.नगर परिषदेनंतर महापालिकेची स्थापना होत असताना एका रात्रीतून मनपात मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करण्यात आली होती. मनपाचे प्रशासक सतीश त्रिपाठी यांनीही कर्मचारी भरतीवर अधिक भर दिला होता. त्यांच्या काळातील सर्व अधिकारी व कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अनेक जण निवृत्तही झाले आहेत. या रिक्त पदांवर मनपाने मागील काही वर्षांमध्ये भरतीच केली नाही. सध्या एका अधिकाºयाकडे तब्बल चार ते पाच विभागांचा अतिरिक्त कार्यभार आहे. कामाच्या बोझ्याने अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले आहेत. १८०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणाºया महापालिकेला कर्मचारी किती लागतात याचा विचारच झालेला नाही. सध्या मनपाच्या आस्थापनेवरील किमान ५५० मंजूर पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यात प्रशासनाला कोणतीही अडचण नाही. कर्मचारी भरतीत कितीही पारदर्शकता ठेवली तर आरोप होतच असतात. त्यामुळे आतापर्यंत एकाही आयुक्ताने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.मंजुरी मिळताच भरती प्रक्रियादीड वर्षापूर्वी कर्मचारी भरतीसंदर्भात मंजूर आकृतिबंधामधील त्रुटी काढण्यासाठी खास डी. पी. कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे महापौर घोडेले यांनी नमूद केले. येणाºया काही दिवसांमध्ये आकृतिबंध शासनाकडे सादर होईल. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.शासनाने काही खाजगी कंपन्यांना कर्मचारी भरती करण्याचे धोरण स्वीकारले आहे. या कामात प्रचंड पारदर्शकता असते. मुलाखती, परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. मेरीटनुसार ते कर्मचारी भरती करून देतात. येणाºया काही दिवसांमध्ये याच पद्धतीने काम करण्यात येणार असल्याचे महापौरांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEmployeeकर्मचारी