शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

स्वच्छ हवेसाठी शहराला मिळणार ८७ कोटी; केंद्र शासनाच्या उपक्रमात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 15:59 IST

महानगरपालिकेने कार्यशाळेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारसोबत एक करार केला. या करारांतर्गत शहरात स्वच्छ हवा मिळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पावले उचलण्यात येतील.

औरंगाबाद : केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय स्वच्छ वायू’ योजना सुरू केली असून, या योजनेत ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा समावेश करण्यात आला आहे. वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने ८७ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यासंबंधीच्या करारावर मंगळवारी प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सही केली.

मुंबई येथे केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे मंगळवारी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेस गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि राज्यातील मोठ्या शहरांच्या मनपा आयुक्तांनी भाग घेतला. पाण्डेय यांनी औरंगाबादने आतापर्यंत राबविलेल्या विविध पर्यावरणीय उपक्रमांची माहिती दिली. शहरातील वायूप्रदूषण कमी करण्यासाठी राबविण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गंत कचऱ्यावर कशा पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते, हे सांगितले. सार्वजनिक शहर बसद्वारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशा पद्धतीने मजबूत केली, वैयक्तिक वाहनांद्वारे होणारे प्रदूषण टाळणे, सायकल ट्रॅकची निर्मिती, करणे, व्हर्टिकल गार्डन उभारणे, रस्त्यावरील धूळ साफ करण्यासाठी स्वीपिंग मशीन, खाम नदीचे पुनरुज्जीवन इ. उपक्रमांची माहिती दिली.

महानगरपालिकेने कार्यशाळेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारसोबत एक करार केला. या करारांतर्गत शहरात स्वच्छ हवा मिळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पावले उचलण्यात येतील. १५ व्या वित्त आयोगअंतर्गत हा करार आहे. या करारानुसार महानगरपालिकेला पाच वर्षात ८७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पाच वर्षात हा निधी महापालिकेला मिळेल. कार्यशाळेस पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयाचे प्रमुख मंत्रालयाचे प्रमुख भूपेंदर यादव, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र शासनाचे संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCentral Governmentकेंद्र सरकार