शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

स्वच्छ हवेसाठी शहराला मिळणार ८७ कोटी; केंद्र शासनाच्या उपक्रमात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 15:59 IST

महानगरपालिकेने कार्यशाळेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारसोबत एक करार केला. या करारांतर्गत शहरात स्वच्छ हवा मिळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पावले उचलण्यात येतील.

औरंगाबाद : केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय स्वच्छ वायू’ योजना सुरू केली असून, या योजनेत ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा समावेश करण्यात आला आहे. वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने ८७ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यासंबंधीच्या करारावर मंगळवारी प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सही केली.

मुंबई येथे केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे मंगळवारी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेस गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि राज्यातील मोठ्या शहरांच्या मनपा आयुक्तांनी भाग घेतला. पाण्डेय यांनी औरंगाबादने आतापर्यंत राबविलेल्या विविध पर्यावरणीय उपक्रमांची माहिती दिली. शहरातील वायूप्रदूषण कमी करण्यासाठी राबविण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गंत कचऱ्यावर कशा पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते, हे सांगितले. सार्वजनिक शहर बसद्वारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशा पद्धतीने मजबूत केली, वैयक्तिक वाहनांद्वारे होणारे प्रदूषण टाळणे, सायकल ट्रॅकची निर्मिती, करणे, व्हर्टिकल गार्डन उभारणे, रस्त्यावरील धूळ साफ करण्यासाठी स्वीपिंग मशीन, खाम नदीचे पुनरुज्जीवन इ. उपक्रमांची माहिती दिली.

महानगरपालिकेने कार्यशाळेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारसोबत एक करार केला. या करारांतर्गत शहरात स्वच्छ हवा मिळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पावले उचलण्यात येतील. १५ व्या वित्त आयोगअंतर्गत हा करार आहे. या करारानुसार महानगरपालिकेला पाच वर्षात ८७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पाच वर्षात हा निधी महापालिकेला मिळेल. कार्यशाळेस पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयाचे प्रमुख मंत्रालयाचे प्रमुख भूपेंदर यादव, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र शासनाचे संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCentral Governmentकेंद्र सरकार