शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

औरंगाबादमध्ये प्रक्रियेच्या आडून कचरा पुरणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:08 IST

जुन्या शहरात साचलेला कचरा उचलून जिथे जागा मिळेल तेथे नेऊन पुरण्याचे प्रमाण मागील आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केल्यास मनपा अधिकारी व शासन नियुक्त अधिकारी चक्क नागरिकांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यास नागरिकांना विरोध नाही, पण प्रक्रिया करण्याच्या नावाखाली खड्डे करून अक्षरश: कचरा पुरण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जुन्या शहरात साचलेला कचरा उचलून जिथे जागा मिळेल तेथे नेऊन पुरण्याचे प्रमाण मागील आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केल्यास मनपा अधिकारी व शासन नियुक्त अधिकारी चक्क नागरिकांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यास नागरिकांना विरोध नाही, पण प्रक्रिया करण्याच्या नावाखाली खड्डे करून अक्षरश: कचरा पुरण्यात येत आहे.मागील ३८ दिवसांपासून शहरात कचºयाची समस्या निर्माण झाली आहे. १३०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार करणाºया, ‘क’प्रवर्गातील महापालिकेला हा प्रश्न अद्याप सोडविता आलेला नाही. शासनाने विशेष बाब म्हणून या प्रश्नात लक्ष घातले. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील नऊपेक्षा अधिक अधिकारी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेला देण्यात आले. त्यानंतरही प्रश्न जशास तसा आहे. ज्या ठिकाणी कचºयाचे मोठ-मोठे डोंगर साचले आहेत, तेथे केमिकल फवारणी करण्यात येत आहे. जिथे कचरा कमी आहे, तेथील कचरा उचलून शासकीय, निमशासकीय जागेवर नेऊन पुरण्यात येत आहे. ओला व सुका कचरा एकत्र, त्यात कॅरिबॅग, प्लास्टिक, लोखंड आदी सर्वच साहित्य आहे. रविवारी कडा आॅफिस शेजारी खड्डा करून अक्षरश: कचरा पुरण्याचे काम सुरू होते. परिसरातील नागरिकांनी या अशास्त्रोक्त पद्धतीला विरोध दर्शविला. मनपा आणि शासकीय अधिकाºयांनी चक्क नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. महापालिकेच्या या प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये असंतोष अधिक वाढू लागला आहे.अजून एकदाही आंदोलन नाहीकचरा प्रश्नावर अद्याप औरंगाबादकर मौन बाळगून आहेत. नागरिकांनी अजून लोकशाही मार्ग अवलंबला नाही. आज नाही तर उद्या हा प्रश्न मिटेल, अशी आशा बाळगून नागरिक आहेत. मागील एक महिन्यापासून मनपा प्रशासन कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा खरेदी करण्याची निव्वळ घोषणा करीत आहे. अंमलबजावणी मात्र शून्य आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी न लागल्यास नागरिक रस्त्यावर हे निश्चित.वर्गीकरणास नगरसेवकांचा पाठिंबा नाहीजुन्या शहरातील मनपाचे झोन १,२ आणि ३ मध्ये परिस्थिती अत्यंत विदारक आहे. येथील नगरसेवक ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी मनपाला अजिबात सहकार्य करीत नसल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. नगरसेवकांनी मनावर घेतले तर आठ दिवसांत जुन्या शहरातही शंभर टक्के कचºयाचे वर्गीकरण सहज शक्य आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपो