शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये प्रक्रियेच्या आडून कचरा पुरणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:08 IST

जुन्या शहरात साचलेला कचरा उचलून जिथे जागा मिळेल तेथे नेऊन पुरण्याचे प्रमाण मागील आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केल्यास मनपा अधिकारी व शासन नियुक्त अधिकारी चक्क नागरिकांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यास नागरिकांना विरोध नाही, पण प्रक्रिया करण्याच्या नावाखाली खड्डे करून अक्षरश: कचरा पुरण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जुन्या शहरात साचलेला कचरा उचलून जिथे जागा मिळेल तेथे नेऊन पुरण्याचे प्रमाण मागील आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केल्यास मनपा अधिकारी व शासन नियुक्त अधिकारी चक्क नागरिकांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यास नागरिकांना विरोध नाही, पण प्रक्रिया करण्याच्या नावाखाली खड्डे करून अक्षरश: कचरा पुरण्यात येत आहे.मागील ३८ दिवसांपासून शहरात कचºयाची समस्या निर्माण झाली आहे. १३०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार करणाºया, ‘क’प्रवर्गातील महापालिकेला हा प्रश्न अद्याप सोडविता आलेला नाही. शासनाने विशेष बाब म्हणून या प्रश्नात लक्ष घातले. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील नऊपेक्षा अधिक अधिकारी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेला देण्यात आले. त्यानंतरही प्रश्न जशास तसा आहे. ज्या ठिकाणी कचºयाचे मोठ-मोठे डोंगर साचले आहेत, तेथे केमिकल फवारणी करण्यात येत आहे. जिथे कचरा कमी आहे, तेथील कचरा उचलून शासकीय, निमशासकीय जागेवर नेऊन पुरण्यात येत आहे. ओला व सुका कचरा एकत्र, त्यात कॅरिबॅग, प्लास्टिक, लोखंड आदी सर्वच साहित्य आहे. रविवारी कडा आॅफिस शेजारी खड्डा करून अक्षरश: कचरा पुरण्याचे काम सुरू होते. परिसरातील नागरिकांनी या अशास्त्रोक्त पद्धतीला विरोध दर्शविला. मनपा आणि शासकीय अधिकाºयांनी चक्क नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. महापालिकेच्या या प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये असंतोष अधिक वाढू लागला आहे.अजून एकदाही आंदोलन नाहीकचरा प्रश्नावर अद्याप औरंगाबादकर मौन बाळगून आहेत. नागरिकांनी अजून लोकशाही मार्ग अवलंबला नाही. आज नाही तर उद्या हा प्रश्न मिटेल, अशी आशा बाळगून नागरिक आहेत. मागील एक महिन्यापासून मनपा प्रशासन कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा खरेदी करण्याची निव्वळ घोषणा करीत आहे. अंमलबजावणी मात्र शून्य आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी न लागल्यास नागरिक रस्त्यावर हे निश्चित.वर्गीकरणास नगरसेवकांचा पाठिंबा नाहीजुन्या शहरातील मनपाचे झोन १,२ आणि ३ मध्ये परिस्थिती अत्यंत विदारक आहे. येथील नगरसेवक ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी मनपाला अजिबात सहकार्य करीत नसल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. नगरसेवकांनी मनावर घेतले तर आठ दिवसांत जुन्या शहरातही शंभर टक्के कचºयाचे वर्गीकरण सहज शक्य आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपो