शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

औरंगाबादमध्ये प्रक्रियेच्या आडून कचरा पुरणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:08 IST

जुन्या शहरात साचलेला कचरा उचलून जिथे जागा मिळेल तेथे नेऊन पुरण्याचे प्रमाण मागील आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केल्यास मनपा अधिकारी व शासन नियुक्त अधिकारी चक्क नागरिकांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यास नागरिकांना विरोध नाही, पण प्रक्रिया करण्याच्या नावाखाली खड्डे करून अक्षरश: कचरा पुरण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जुन्या शहरात साचलेला कचरा उचलून जिथे जागा मिळेल तेथे नेऊन पुरण्याचे प्रमाण मागील आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केल्यास मनपा अधिकारी व शासन नियुक्त अधिकारी चक्क नागरिकांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यास नागरिकांना विरोध नाही, पण प्रक्रिया करण्याच्या नावाखाली खड्डे करून अक्षरश: कचरा पुरण्यात येत आहे.मागील ३८ दिवसांपासून शहरात कचºयाची समस्या निर्माण झाली आहे. १३०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार करणाºया, ‘क’प्रवर्गातील महापालिकेला हा प्रश्न अद्याप सोडविता आलेला नाही. शासनाने विशेष बाब म्हणून या प्रश्नात लक्ष घातले. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील नऊपेक्षा अधिक अधिकारी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेला देण्यात आले. त्यानंतरही प्रश्न जशास तसा आहे. ज्या ठिकाणी कचºयाचे मोठ-मोठे डोंगर साचले आहेत, तेथे केमिकल फवारणी करण्यात येत आहे. जिथे कचरा कमी आहे, तेथील कचरा उचलून शासकीय, निमशासकीय जागेवर नेऊन पुरण्यात येत आहे. ओला व सुका कचरा एकत्र, त्यात कॅरिबॅग, प्लास्टिक, लोखंड आदी सर्वच साहित्य आहे. रविवारी कडा आॅफिस शेजारी खड्डा करून अक्षरश: कचरा पुरण्याचे काम सुरू होते. परिसरातील नागरिकांनी या अशास्त्रोक्त पद्धतीला विरोध दर्शविला. मनपा आणि शासकीय अधिकाºयांनी चक्क नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. महापालिकेच्या या प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये असंतोष अधिक वाढू लागला आहे.अजून एकदाही आंदोलन नाहीकचरा प्रश्नावर अद्याप औरंगाबादकर मौन बाळगून आहेत. नागरिकांनी अजून लोकशाही मार्ग अवलंबला नाही. आज नाही तर उद्या हा प्रश्न मिटेल, अशी आशा बाळगून नागरिक आहेत. मागील एक महिन्यापासून मनपा प्रशासन कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा खरेदी करण्याची निव्वळ घोषणा करीत आहे. अंमलबजावणी मात्र शून्य आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी न लागल्यास नागरिक रस्त्यावर हे निश्चित.वर्गीकरणास नगरसेवकांचा पाठिंबा नाहीजुन्या शहरातील मनपाचे झोन १,२ आणि ३ मध्ये परिस्थिती अत्यंत विदारक आहे. येथील नगरसेवक ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी मनपाला अजिबात सहकार्य करीत नसल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. नगरसेवकांनी मनावर घेतले तर आठ दिवसांत जुन्या शहरातही शंभर टक्के कचºयाचे वर्गीकरण सहज शक्य आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपो