शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

औरंगाबादला पावसाने जोरदार धुतले; १२५ मि.मी. पावसाची विक्रमी नोंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:32 IST

तब्बल अठरा तासांपेक्षा अधिक काळ सतत कोसळलेल्या श्रावणसरींनी गुरुवारी (दि. १६) औरंगाबाद शहरातसह संपूर्ण जिल्हा चिंब भिजून निघाला.  

औरंगाबाद : तब्बल अठरा तासांपेक्षा अधिक काळ सतत कोसळलेल्या श्रावणसरींनी गुरुवारी (दि. १६) औरंगाबाद शहरातसह संपूर्ण जिल्हा चिंब भिजून निघाला.  पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत असले तरी या काळात अत्यल्प पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. अनेकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले तरी पावसाचे आगमन मात्र झाले नाही. 

सोमवारपासून श्रावण मास सुरू झाला आणि वातावरणात झपाट्याने बदल होत गेले. शहरासह जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासूनच संततधार सुरू झाली. अधूनमधून मुसळधार पाऊसही कोसळत राहिल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले होते. जिल्हा दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकण्याची चिन्हे दिसत असतानाच संततधार व अधूनमधून कोसळलेल्या जोरदार सरींनी पिकांना जीवदान मिळाल्याचे बोलले जात आहे. मागील काही वर्षांत पहिल्यांदाच श्रावणात एका दिवसांत १२५ मि.मी. पावसाची नोंद झाली. १६ आॅगस्ट रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत १०३ मि.मी. पावसाची दमदार नोंद झाल्यानंतर रात्री ११.३० वाजेपर्यंतच्या तीन तासांत अंदाजे २२ मि.मी.हून अधिक पाऊस बरसल्याचे चिकलठाणा वेधशाळेकडून सांगण्यात आले. 

शासकीय आकडेवारीनुसार ६५ मि.मी.च्या पुढे पावसाची नोंद झाल्यास अतिवृष्टी ग्राह्य धरण्यात येते. शहर व परिसरात १२५ मि.मी. पावसाची नोंद झाल्यामुळे अतिवृष्टीच्या पुढे पाऊस गेल्याने दिवसभर नागरिकांची तारांबळ उडाली. जनजीवनावर पावसामुळे मोठा परिणाम झाला. रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी होते. शाळा, महाविद्यालयांच्या उपस्थितीवरदेखील पावसाने परिणाम केला. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही, पावसाच्या दमदार सरींमुळे शहरातील बहुतांश भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. नाले दुथडी भरून वाहिले, तर काही भागातील घरांमध्ये पाणी शिरले. 

शहरात १७ जुलै रोजी ४९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर १६ आॅगस्ट रोजी म्हणजेच तब्बल महिनाभरानंतर दमदार पावसाच्या सरी बसरल्या आहेत. मागील काही वर्षांत आॅगस्ट महिन्यांत आजच्याप्रमाणे पावसाच्या सरी बरसल्या नव्हत्या. शहर व ग्रामीण मिळून ६७५ मि.मी. पावसाची वार्षिक सरासरी आहे. त्यापैकी १८२ मि.मी. इतका पाऊस झाला असून ते २७ टक्के प्रमाण आहे. ३८५ मि.मी. एवढा पाऊस होणे अपेक्षित होते. ५० टक्के पावसाचा खंड पडला असून, गुरुवारच्या पावसामुळे किती प्रमाणात सरासरी वाढली हे शुक्रवारी सकाळच्या नोंदीनुसार समोर येईल. 

तीन ठिकाणी झाडे पडलीटाऊन सेंटर एन-१, एन-४ एमआयटी हॉस्पिटल, एन-१३ येथे पावसामुळे झाडे उन्मळून पडली, तर रोपळेकर चौकातील दुकानात पाणी शिरले. घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद अग्निशमन विभागाकडे नव्हती. जयभवानीनगर, किराडपुरा, भवानीनगर, पुंडलिकनगर, ईटखेडा, उल्कानगरी, कटकटगेट, एन-३, एन-४, स्वप्ननगरी, फाजलपुरा, हर्षनगर या परिसरातील नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.

बाजारपेठ ठप्प पावसामुळे बाजारपेठेत अनेक दुकानांचे शटर उघडलेच नाही. जी दुकाने उघडली तेथे ग्राहकी नसल्याचे दिसून आले. मोंढ्यातही हीच परिस्थिती होती. ग्राहकी नसल्याने व्यापारीवर्ग टीव्हीवर बातम्या बघताना दिसून आले. मोंढ्यात काही हमाल, लोडिंग रिक्षावाले आले होते; पण पावसामुळे ग्राहकच येत नसल्याने त्यांनी दुपारनंतर घर गाठले. 

जालना रोड उखडलाशहराचा मुख्य रस्ता जालना रोड दिवसभराच्या पावसामुळे अनेक ठिकाणी उखडला. सेव्हन हिल ते सिडको उड्डाणपुलालगत रस्त्यावर खड्डे पडले. तसेच मोंढानाका पुलालगतचा भागही चिखलमय झाला. क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले. 

आठवडी बाजारात भाज्या विक्रीविना पडूनसंततधारेमुळे जाधववाडीत गुरुवारी  शेतकऱ्यांनी शेतीमाल कमी आणला. त्यात  ग्राहकांनीही पाठ फिरविल्याने बहुतांश भाजीपाला विक्रीविना पडून राहिला. अडत व्यापारी इसाखान यांनी सांगितले की, पालेभाज्या कमी प्रमाणात आल्या होत्या; पण पावसामुळे ग्राहकच आले नाहीत. दुकाने उघडी होती; पण शुकशुकाट होता. अडत व्यापारी मुजीबसेठ म्हणाले की, सिल्लोड परिसरातून मोठ्या प्रमाणात लवंगी मिरचीची आवक होते. मात्र, पावसामुळे शेतकरी, मजूर शेतात मिरची तोडण्यासाठी गेलेच नाही. तसेच अन्य फळभाज्या, पालेभाज्यांची हीच परिस्थिती होती. परिणामी, नेहमीपेक्षा अवघ्या २० ते ३० टक्केच आवक झाली. ग्राहकी नसल्याने माल पडून राहिला.  शुक्रवारी अडत बाजाराला साप्ताहिक सुटी असते. असेच दोन ते तीन दिवस संततधार पाऊस राहिला तर भाज्यांचे भाव वाढतील.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका