शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

Aurangabad Violence : 'त्या' परिसरात दरवळला अत्तराचा सुगंध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:58 PM

शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिराच्या बाजूच्या इमारतीमध्ये अत्तर, अगरबत्तीची दुकाने होती. दंगलीत ही इमारतच पेटवून देण्यात आली.

औरंगाबाद : शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिराच्या बाजूच्या इमारतीमध्ये अत्तर, अगरबत्तीची दुकाने होती. दंगलीत ही इमारतच पेटवून देण्यात आली. या इमारतीतून आगीचे निखारे सतत फुलत होते. यातही वाऱ्याची झुळक येताच सुगंधाची लहर येत होती. ही लहर येताच येणारे-जाणारे हळहळ व्यक्त करीत पुढे निघून जात होते.

कोणत्याही दंगलीला जात, धर्म नसतो. दंगलखोरी ही प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीच्या तडाख्यातून विरोधकांसह स्वकीयही सुटत नसतात. हा नियम आहे. याच नियमाप्रमाणे राजाबाजारातील शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिराशेजारी १०० वर्षे जुनी इमारत होती. ही इमारत शहरातील अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रांतील मोठ्या घटनांची साक्षीदार आहे. याच इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर माजी नगराध्यक्ष कै. बजरंगलाल शर्मा यांचे कुटुंब राहत होते, तर तळमजल्यात म्हैसूर सुगंध भांडार, माय चॉईस अगरबत्ती ही दुकाने होती. या दोन्ही दुकानांत सुंगध देणाऱ्या वास्तूंची विक्री होत असे. यातील म्हैसूर सुगंध भांडारमधील अत्तर शहरात प्रसिद्ध होते. 

अत्तराचे अनेक शौकीन नागरिक या ठिकाणाहून वेगवेगळ्या सुगंधी अत्तराची खरेदी करीत असत, तर माय चॉईस अगरबत्तीच्या दुकानातही वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधी अगरबत्ती ठेवण्यात आलेल्या होत्या. दंगलखोरांनी ही इमारतच शुक्रवारी मध्यरात्री पेटवून दिली. या इमारतीचा बहुतांश भाग हा सागवान लाकडाचा असल्यामुळे आगीत तात्काळ कोसळला, तर अग्निशामक दलाच्या जवानांना पेटलेली लाकडे विझविण्यात यश आले होते. मात्र, इमारत कोसळल्यामुळे अत्तर, अगरबत्तीचे दुकान उद्ध्वस्त झाले. 

शुक्रवारच्या मध्यरात्री पेटवलेल्या या इमारतीमधून रविवारीही वाऱ्याची झुळूक येताच निखारे उडत होते. या जळत्या निखाऱ्यातूनही सुगंधी लहर येत होती. रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांना हा सुगंध सुखावत होता. मात्र, या दुकानाकडे पाहताच उद्ध्वस्त झालेल्या इमारतीची जळालेली लाकडे, पत्रे दिसत होती.

गुण्यागोविंदाने नांदत होतो...हिंदू-मुस्लिम असा दंगलीला धार्मिक रंग देण्यात येत आहे. माझ्या इमारतीमध्ये हिंदू, मुसलमान, शीख अशा सर्व धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आपला व्यापार भला अन् आपण. सर्वजण एकमेकांच्या ताटात जेवण करतात. आमच्यात कधीही वाद झाले नाहीत. मात्र, दंगलीत हिंदू, मुस्लिम, शिखांची दुकाने पेटवली. या दंगलखोरांना कोणतीही जात, धर्म नव्हता, अशी भावनिक प्रतिक्रिया शहागंज कॉर्नरवर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या इमारतीमधील रहिवासी सतीश चव्हाण यांनी दिली. 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसshahaganjशहागंज