शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

औरंगाबाद विद्यापीठाच्या प्रकुलगुरूचा निर्णय जाहीर होईना, दिड महिना उलटला तरीही नावाची घोषणा नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 5:22 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरू पदासाठी  राजभवनात मुलाखती घेण्यात आल्या आहेत. या मुलाखतींना दिड महिना उलटला, तरीही प्रकुलगुरूंच्या नावाची घोषणा झालेली नाही.

ठळक मुद्देनव्या कायद्यानुसार बीसीयूडी संचालक हे पद रद्द करून त्याचे सर्व अधिकार प्रकुलगुरूकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. राजभवनातील मुलाखतींना दिड महिना उलटला, तरीही प्रकुलगुरूंच्या नावाची घोषणा झालेली नाही.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरू पदासाठी  राजभवनात मुलाखती घेण्यात आल्या आहेत. या मुलाखतींना दिड महिना उलटला, तरीही प्रकुलगुरूंच्या नावाची घोषणा झालेली नाही. याचा परिणाम विद्यापीठाच्या प्रशासकीय यंत्रणा, संशोधनावर होत आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा-२०१६ मंजूर केला आहे. या कायद्यानुसार बीसीयूडी संचालक हे पद रद्द करून त्याचे सर्व अधिकार प्रकुलगुरूकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. नविन विद्यापीठ कायदा १ मार्च २०१७ रोजी अस्तित्वात आला. तेव्हापासून आतापर्यंत राज्यातील बहुतांश अकृषी विद्यापीठांना प्रकुलगुरू मिळाले आहेत. यातच बीसीयूडी संचालक हे पद अस्तित्वात नसल्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी विशेष कार्य अधिका-यांची नेमणूक केली आहे. विद्यापीठात मागील आठ महिन्यांपासून ओएसडीच काम पाहत आहेत. नविन कायद्यानुसार परीक्षा विभाग, शैक्षणिक विभाग, संशोधन, महाविद्यालयांबाबत निर्णयाचे अधिकार प्रकुलगुरूंना प्रदान केलेले आहेत. प्रकुलगुरू नसल्यामुळे या विभागातील गोंधळाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आडचणी येत आहेत. पीएचडी प्रवेशासाठी पेट-४ परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला तीन महिने उलटल्यानंतर  बुधवारपासून गुणपत्रिकांचे वाटप सुरू आहे. तर शैक्षणिक कॅलेंडर तब्बल दोन वेळा बदलल्यामुळे परीक्षा महिनाभर उशिराने सुरू होणार आहेत. याचा परिणाम पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेवर होण्याची शक्यता आहे.

या सर्व यंत्रणेचा प्रमुख या नात्याने प्रकुलगुरूंची नेमणूक आवश्यक आहे. कुलगुरू डॉ. चोपडे यांनी पाठविलेल्या पैकी तीघांच्या मुलाखती राजभवनात कुलपती सी. विद्यासागर राव यांनी १६ सप्टेंबर २०१७ रोजी घेतल्या. कुलपतींनी मुलाखती घेतल्यानंतर जास्तीत जास्त दोन दिवसात निवड जाहीर करण्याची परंपरा आहे. मात्र या मुलाखतींना दिड महिला उलटत असताना अद्यापही निवड जाहीर केलेली नाही. मुलाखती देणारांमध्ये लातुरच्या दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोंगिदरसिंग बिसेन,औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगर्भतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर आणि विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.सी.जे. हिवरे यांचा समावेश आहे.

विद्यापीठात सर्वत्र अनागोंदी परिस्थितीविद्यापीठातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमाडलेली आहे. संवैधानिक अधिकारी महिना उलटत नाही तोच राजीनामा देतात. संशोधन दोन वर्षांपासून ठप्प आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी स्थानिक संदर्भांची माहिती आणि प्रशासन हाताळण्याचे कौशल्य असणाºया प्रकुलगुरूंची नितांत गरज आहे. मात्र प्रकुलगुरूंची नेमणूक कोणत्या कारणांमुळे रखडली, याचे उत्तर कोणाकडेच शोधुन सापडत नाही. हे विशेष.