शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

औरंगाबाद : पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 22:42 IST

त्यावेळी परिसरात कोणीच नसल्यानं मिळू शकली नाही मदत.

ठळक मुद्देत्यावेळी परिसरात कोणीच नसल्यानं मिळू शकली नाही मदत.

औरंगाबाद: दोन दिवसापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यात साचलेले पाणी पाहtन पोहायला गेलेल्या दोन तरुण मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास झाल्टा गायरान शिवारात झाली. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

अनिल किसन मगरे (२६, वर्षे, रा. सुकनानगर झोपडपट्टी, सुंदरवाडी) आणि शेख शाहरुख शेख चांद (२०, रा. इंदिरानगर, गारखेडा) अशी दोघांची नावे आहेत. सुंदरवाडीतील सुकनानगर झोपडपट्टी येथील रहिवासी अनिल आणि शहारुख हे दोघे चांगले मित्र होते. मिळेल ते काम करून ते उपजीविका भागवत. लॉकडाउनपासून काम नसल्यामुळे ते सध्या बेरोजगार होते. शाहरुख  दुपारी अनिल यास भेटायला गेला होता. यानंतर दोघे जण झाल्टा फाटा परिसरात फिरायला गेले. फिरत असताना गायरान मधील नाल्यात पावसाचे पाणी साचल्याचे त्यांना दिसले. हे पाणी पाहुन त्यांना पोहण्याचा मोह झाला. यानंतर दोघांनी आपआपले कपडे काढून नाल्याच्या काठावर ठेवले आणि पाण्यात उड्या घेतल्या. या नाल्यात खूप खड्डे होते. या खड्ड्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने पोहता पोहता ते पाण्यात बुडाले. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी कोणीही जवळ नव्हते. यामुळे त्यांना मदत मिळू शकली नाही. 

काही वेळाने परिसरातील तरुणाना नाल्याच्या काठावर दोन जणांचे कपडे आणि चप्पल बुट दिसले. शिवाय दोन तरुण नाल्याच्या दिशेने गेल्याचे त्यांनी पाहिले होते. ते तेथे दिसत नसल्याने त्याना संशय आल्याने त्यांनी या घटनेची चिकलठाणा पोलिसांना कळविली. सहाय्यक निरीक्षक विश्वास पाटील, फौजदार प्रदिप ठुबे , बिट अंमलदार लहू थोटे, थोरे, सचिन रत्नपारखे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तेथील लोकांचे मदतीने त्यांना बेशुद्धावस्थेत पाण्यातून बाहेर काढले. पोलिसांनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता. तेथील डॉक्टरांनी अनिल आणि शहारुख यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस