शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

औरंगाबादेत कचऱ्याला ७८४ वेळेस लागली आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 20:38 IST

शहरात मागील १५ महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देशहरातील कचरा आग लावून होतो नष्ट सफाई कर्मचारीच कचऱ्याला लावतात आग 

औरंगाबाद : शहरात मागील १५ महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. अग्निशमन विभागाला दररोज दोन ते तीन ठिकाणी कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी जावे लागते. मागील दहा महिन्यांत अग्निशमन विभागाने तब्बल ७८४ ठिकाणी आग विझविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

१६ फेब्रुवारीपासून २०१८ पासून नारेगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कचरा डेपोसमोर आंदोलन केले. महापालिकेची वाहने अडवून धरली. नंतर त्यांनी नारेगाव येथे कचरा टाकणे बंद करेपर्यंत माघार घेतली नाही. ग्रामस्थांची ही लढाई न्यायालयापर्यंत गेली. शेवटी न्यायालयानेही पालिकेला नारेगाव येथे कचरा टाकण्यास बंदी घातली. त्यामुळे शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. त्यानंतर शहरात कचऱ्याचे हजारो डोंगर तयार झाले होते. या कचऱ्याला मनपा कर्मचारीच आग लावत होते. पोलीस बंदोबस्तात मिटमिटा भागात कचरा टाकण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांनी दंगल घडवून आणली. या घटनेत अग्निशमन विभागाचे नवीन वाहन जळून खाक झाले. येथील जाळपोळीची घटना घडल्यानंतर राज्यभरात औरंगाबादचा कचरा प्रश्न पोहोचला. 

विधानसभेतही याचे पडसाद उमटल्यानंतर विभागीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. समितीने हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव व कांचनवाडी या चार ठिकाणी कचरा टाकण्यास मनपाला मुभा दिली. तसेच या ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचेही बजावले. मात्र, वर्ष उलटले तरी पालिकेने अद्याप प्रक्रिया केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे शहरातील कचराकोंडी आजही कायम आहे. शहरात जागोजागी कचरा साचत असल्याने नागरिकांकडून त्यास आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. मध्यंतरी तर कचरा कमी करण्यासाठी पालिकेचे सफाई कर्मचारीच कचऱ्याच्या ढिगारांना आग लावत असत्याचे समोर आले होते. मागील दहा महिन्यांत अशाप्रकारे शहरात ७८४ ठिकाणी कचऱ्याला आग लावण्यात आल्याचे अग्निशमन विभागाने दिलेल्या अहवालातून समोर आले आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfireआग