शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत कचऱ्याला ७८४ वेळेस लागली आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 20:38 IST

शहरात मागील १५ महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देशहरातील कचरा आग लावून होतो नष्ट सफाई कर्मचारीच कचऱ्याला लावतात आग 

औरंगाबाद : शहरात मागील १५ महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. अग्निशमन विभागाला दररोज दोन ते तीन ठिकाणी कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी जावे लागते. मागील दहा महिन्यांत अग्निशमन विभागाने तब्बल ७८४ ठिकाणी आग विझविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

१६ फेब्रुवारीपासून २०१८ पासून नारेगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कचरा डेपोसमोर आंदोलन केले. महापालिकेची वाहने अडवून धरली. नंतर त्यांनी नारेगाव येथे कचरा टाकणे बंद करेपर्यंत माघार घेतली नाही. ग्रामस्थांची ही लढाई न्यायालयापर्यंत गेली. शेवटी न्यायालयानेही पालिकेला नारेगाव येथे कचरा टाकण्यास बंदी घातली. त्यामुळे शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. त्यानंतर शहरात कचऱ्याचे हजारो डोंगर तयार झाले होते. या कचऱ्याला मनपा कर्मचारीच आग लावत होते. पोलीस बंदोबस्तात मिटमिटा भागात कचरा टाकण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांनी दंगल घडवून आणली. या घटनेत अग्निशमन विभागाचे नवीन वाहन जळून खाक झाले. येथील जाळपोळीची घटना घडल्यानंतर राज्यभरात औरंगाबादचा कचरा प्रश्न पोहोचला. 

विधानसभेतही याचे पडसाद उमटल्यानंतर विभागीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. समितीने हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव व कांचनवाडी या चार ठिकाणी कचरा टाकण्यास मनपाला मुभा दिली. तसेच या ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचेही बजावले. मात्र, वर्ष उलटले तरी पालिकेने अद्याप प्रक्रिया केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे शहरातील कचराकोंडी आजही कायम आहे. शहरात जागोजागी कचरा साचत असल्याने नागरिकांकडून त्यास आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. मध्यंतरी तर कचरा कमी करण्यासाठी पालिकेचे सफाई कर्मचारीच कचऱ्याच्या ढिगारांना आग लावत असत्याचे समोर आले होते. मागील दहा महिन्यांत अशाप्रकारे शहरात ७८४ ठिकाणी कचऱ्याला आग लावण्यात आल्याचे अग्निशमन विभागाने दिलेल्या अहवालातून समोर आले आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfireआग