शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

औरंगाबादची २४ बोगींची पीटलाइन लागणार मार्गी, मालधक्का दौलताबादला नेण्यास सहमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 14:31 IST

रेल्वे प्रशासन लागले कामाला : मालवाहतूकदारांशी केली चर्चा, दौलताबादसह करमाड, लासूर, पोटूळचाही पर्याय

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर प्रस्तावित पीटलाइन १६ऐवजी २४ बोगींची करण्यासाठी मालधक्का स्थलांतरास अखेर दक्षिण मध्य रेल्वेची यंत्रणा कामाला लागली आहे. मालधक्का येथे गुरुवारी रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यापारी, मालवाहतूकदार प्रतिनिधींशी चर्चा केली. मालधक्का इतरत्र हलविल्यास काय परिणाम होतील, याबाबत चर्चा करण्यात आली. मालधक्क्यासाठी दौलताबाद, करमाड, पोटुळ आणि लासूर येथील पर्याय ठेवण्यात आले. यात दौलताबादलाच बहुतांश जणांनी होकार दिला.

औरंगाबादेत १६ बोगींची पीटलाइन मंजूर झाली, मात्र ऐन पीटलाइनच्या पायाभरणीच्या समारंभात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २४ बोगींच्या पीटलाइनसाठी स्टेशनवरील मालधक्का स्थलांतरित करावा की ठेवावा, यासंदर्भात उद्योग, व्यापाऱ्यांशी चर्चा करून १० दिवसांत प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (डीआरएम) केली. त्यानंतर अखेर गुरुवारी ‘दमरे’च्या नांदेडचे विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक नागेंद्र प्रसाद; तसेच विभागीय वाहतूक व्यवस्थापक जय पाटील यांनी रेल्वे मालधक्क्यांशी संबंधित संघटना सदस्य, वाहतूकदार यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून मालधक्का स्थलांतरास सर्वांनी सहमती दर्शविली. दौलताबादेत मालधक्का स्थलांतरित केल्यास, व्यापाऱ्यांवर किंवा उद्योजकांनाही त्याचा लाभ मिळेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

स्टेशन येथील रेल्वे मालधक्का हलविण्याबाबतच्या मागणीबाबात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे स्थानकप्रमुख एल. के. जाखडे यांच्याशी लोकप्रतिनिधीसमोरच चर्चा केली. त्यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण जैन यांचीही उपस्थिती होती. यावेळी रेल्वे मालधक्का स्थलांतराचा मुद्दा उपस्थित झाला होता.

या प्रश्नांकडे वेधले लक्षमालधक्का इतरत्र स्थलांतरित केल्यास इंधनाचा खर्च वाढेल. शिवाय ये-जा करण्यासाठी अधिक वेळही जाईल. मालधक्का येथे मालाची चढ-उतार करणारे बहुतांश हमाल हे स्टेशन परिसरातच राहतात. मालधक्का स्थलांतरित झाला, तर त्यांच्या रोजगाराचाही प्रश्न उद्भवू शकतो. यासह विविध मुद्दे मालवाहतूकदार आणि प्रतिनिधींनी मांडले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन