शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादची २४ बोगींची पीटलाइन लागणार मार्गी, मालधक्का दौलताबादला नेण्यास सहमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 14:31 IST

रेल्वे प्रशासन लागले कामाला : मालवाहतूकदारांशी केली चर्चा, दौलताबादसह करमाड, लासूर, पोटूळचाही पर्याय

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर प्रस्तावित पीटलाइन १६ऐवजी २४ बोगींची करण्यासाठी मालधक्का स्थलांतरास अखेर दक्षिण मध्य रेल्वेची यंत्रणा कामाला लागली आहे. मालधक्का येथे गुरुवारी रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यापारी, मालवाहतूकदार प्रतिनिधींशी चर्चा केली. मालधक्का इतरत्र हलविल्यास काय परिणाम होतील, याबाबत चर्चा करण्यात आली. मालधक्क्यासाठी दौलताबाद, करमाड, पोटुळ आणि लासूर येथील पर्याय ठेवण्यात आले. यात दौलताबादलाच बहुतांश जणांनी होकार दिला.

औरंगाबादेत १६ बोगींची पीटलाइन मंजूर झाली, मात्र ऐन पीटलाइनच्या पायाभरणीच्या समारंभात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २४ बोगींच्या पीटलाइनसाठी स्टेशनवरील मालधक्का स्थलांतरित करावा की ठेवावा, यासंदर्भात उद्योग, व्यापाऱ्यांशी चर्चा करून १० दिवसांत प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (डीआरएम) केली. त्यानंतर अखेर गुरुवारी ‘दमरे’च्या नांदेडचे विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक नागेंद्र प्रसाद; तसेच विभागीय वाहतूक व्यवस्थापक जय पाटील यांनी रेल्वे मालधक्क्यांशी संबंधित संघटना सदस्य, वाहतूकदार यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून मालधक्का स्थलांतरास सर्वांनी सहमती दर्शविली. दौलताबादेत मालधक्का स्थलांतरित केल्यास, व्यापाऱ्यांवर किंवा उद्योजकांनाही त्याचा लाभ मिळेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

स्टेशन येथील रेल्वे मालधक्का हलविण्याबाबतच्या मागणीबाबात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे स्थानकप्रमुख एल. के. जाखडे यांच्याशी लोकप्रतिनिधीसमोरच चर्चा केली. त्यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण जैन यांचीही उपस्थिती होती. यावेळी रेल्वे मालधक्का स्थलांतराचा मुद्दा उपस्थित झाला होता.

या प्रश्नांकडे वेधले लक्षमालधक्का इतरत्र स्थलांतरित केल्यास इंधनाचा खर्च वाढेल. शिवाय ये-जा करण्यासाठी अधिक वेळही जाईल. मालधक्का येथे मालाची चढ-उतार करणारे बहुतांश हमाल हे स्टेशन परिसरातच राहतात. मालधक्का स्थलांतरित झाला, तर त्यांच्या रोजगाराचाही प्रश्न उद्भवू शकतो. यासह विविध मुद्दे मालवाहतूकदार आणि प्रतिनिधींनी मांडले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन