शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये गतिमंदांनी केलेल्या उत्पादनांची कॉर्पोरेट जगताला लागली गोडी, रोजगारातून मिळाले स्वावलंबन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 19:45 IST

समाजाने गतीमंद ठरविले असले गतीमंदाचे उत्पादने आता विक्रीत गती घेऊ लागले आहेत. स्पेशल पार्ट्या, खास  समारंभ व कॉर्पोरेट सेक्टरला यांच्या उत्पादनाने मोहीनी घातली आहे. त्यातून आर्थिक व सामाजिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी यातून मोठा आधार मिळत आहे.

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद: समाजाने गतीमंद ठरविले असले या गतीमंदाचे उत्पादने आता विक्रीत गती घेऊ लागले आहेत. स्पेशल पार्ट्या, खास  समारंभ व कॉर्पोरेट सेक्टरला यांच्या उत्पादनाने यातील गुणवत्तेमुळे मोहीनी घातली आहे. त्यातून आर्थिक व सामाजिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी यातून मोठा आधार मिळत आहे.

चिकलठाणा एमआयडीसीतील नवजीवन मतीमंद शाळेत मुलांच्या बौद्धीकतेत वाढ करण्याच्या उद्देशाने एक कार्यशाळा घेण्यात येते. यातून त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो.   यात शारीरिकदृष्ट्या वाढ झालेल्या या मुलांची बौद्धीकता वाढवणे व त्यांच्या हाताला चांगले वळण देणे यावर भर दिला जातो. यातून ही गतीमंद मुलं आता कौशल्याने ‘कँडी व चॉकलेट’ बनविण्यात तरबेज झाली आहे. या मुलांची दिनचर्या ठरलेली असून, त्यांना सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत मार्गदर्शन केले जाते. त्यांची बौद्धीक क्षमता वाढविण्यासाठी त्यांय ाहाताला व बुद्धीला वळण देण्याचे काम विविध स्तरातील समविचारी जानकारांनी मिळून ही संस्था तयार केली आहे. ती अविरत या मुलांच्या विकासासाठी कार्यरत असून, मुलांना कुणी घरात बोज आहे, असे हिनविणार नाही, याविषयीचा आत्मविश्वास या मुलांत भरविला जातो. 

गतीमंदाची गती वाढविणारे शिल्पकार.शाळेतील मुलांनी तयार केलेले उत्पादने विक्रीसाठी जेव्हा कॉरपोरेट सेक्टरच्या काही अधिका-यांनी पाहिले तर त्यांनी दरवर्षी या मुलांच्या वर्कशॉपमधूनच उत्पादने घेण्याचे ठरविले आहे. या मुलांचे कौशल्य विकसीत करून त्यांच्या हाताला व बुद्धीला वळण देण्याचे काम चित्रा सुरडकर, शिला तुमराम, त्र्यंबक कुलकर्णी, प्रशांत सराफ, अभिजीत जोशी सातत्याने करीत आहेत.  

गुणवत्तेमुळे गोडी वाढली

या मुलांची उत्पादने एका ठराविक काळात तयार केले जातात, त्याची गोडी कॉरपोरेट सेक्टर आणि उच्चभ्रु  सोसायटीत अधिक वाढली आहे. उत्पादनाचे कार्य अगदी टिमवर्क असून सततच्या कामामुळे त्यांच्या बुद्धीमतेत देखील भर पडल्याचे जाणवते. पाककृती ही निदेशकाच्या देखरेखीखाली अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने केली जाते. बुद्यांकानुसार या मुलाचीही वर्गवारी केली जाते. अधुनिक पद्धतीने बनविलेल्या या चॉकलेच्या सजावटीपासून पार्सल पोहोचविण्यापर्यंत ही मुलं अगदी तरबेज व्यक्तीप्रमाणे काम करतात. घरातही आईबाबा किंवा इतर भावंडांना नको वाटणारी किंवा बोज वाटणारी मुलं आता गोडी निर्माण करीत आहेत. कारण आईला घरात भाजी निवडणे, कांदा लसून, मिरची, धुणं, झाडू तसेच किरकोळ कामं देखील प्रमुख्याने करीत असल्याने त्यांचा घरातील वावर देखील वाढलेला आहे. 

कार्यशाळेतून मिळाला रोजगारआपण घरातील नातेवाईक व आप्तेसंबंधावर विसंबून राहिलेलो नसल्याचा भास या मुलांना देखील वाटू लागला आहे. कागदी पिशव्या, कारखाने व कार्यालयात लागणा-या स्टेशनरी देखील या मुलांकडून पुरविल्या जात आहेत.कॉरपोरेट सेक्टरची काही कारखाने या मुलांकडून चॉकलेट, कॅन्डी समारंभासाठी तसेच कार्यालयासाठी स्टेशनरीची सतत मागणी करीत आहे.

ताठमानेने जगण्यासाठी धडपडसामाजिक व आर्थिक स्थैर्य या मुलांत निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न केला जात असून, बौद्धीक क्षमता वाढीसाठी हि कार्यशाळा आहे. होमसायन्स, शिवनकला, आर्ट डिझाईन अशा विविध कलागुणांना वाव देऊन त्यांच्यात कौशल्ये जागृत केले आहे. असे डॉ. रामदास अंबुलगेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsocial workerसमाजसेवक