शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

स्वच्छ भारत अभियानच्या पथकाकडून सोमवारी होणार औरंगाबादची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 5:07 PM

शहरात २८०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचर्‍यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. संपूर्ण महापालिका कचरा कोंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाचे पथक सोमवारी शहरात पाहणी दौर्‍यासाठी दाखल होणार आहे.

ठळक मुद्दे२६ ते २७ फेब्रुवारीला केंद्रीय पथक शहरात स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे.मात्र, शहरात अचानक कचरा कोंडी निर्माण झाली आहे. मागील ७ दिवसांपासून मनपाला शहरातील कचरा उचलता आलेला नाही.

औरंगाबाद : शहरात २८०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचर्‍यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. संपूर्ण महापालिका कचरा कोंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाचे पथक सोमवारी शहरात पाहणी दौर्‍यासाठी दाखल होणार आहे. शहराची ही बकाल अवस्था पाहता सर्वेक्षणात महापालिका ‘नापास’होण्याची दाट शक्यता आहे.

२६ ते २७ फेब्रुवारीला केंद्रीय पथक शहरात स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. यंदा स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत ४ हजार गुणांची स्पर्धा आहे. स्पर्धेत देशभरातील सुमारे ४ हजार ४१ शहरे सहभागी होत आहेत. राज्यातील नगर परिषदा, महापालिका मिळून २६५ शहरे स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी झाली आहेत. केंद्र शासनाने नेमलेल्या कार्वी नामक एजन्सी यंदा सर्वेक्षणाचे काम करीत आहे. या एजन्सीचे किमान तीन अधिकार्‍यांचे पथक दोन दिवस शहरात स्वच्छतेच्या कामांची व विविध उपक्रमांची पाहणी करणार आहे. मनपाने सर्वेक्षणाशी संबंधित सर्व तयारी केली आहे. कागदोपत्री अहवाल तयार केलेला आहे. मात्र, शहरात अचानक कचरा कोंडी निर्माण झाली आहे. मागील ७ दिवसांपासून मनपाला शहरातील कचरा उचलता आलेला नाही. अनेक वसाहतींमध्ये कचर्‍याचे डोंगर साचले आहेत. 

आज पालकमंत्री कचरा प्रश्नावर तोडगा काढणार आहेत. कचरा कोंडी फुटली नाही तर मनपाच्या सर्वेक्षणावर याचा परिणाम होणार आहे. मागील वर्षी औरंगाबाद शहराचा २९९ वा क्रमांक आला होता. २०१६ मध्ये औरंगाबाद शहर ५६ व्या क्रमांकावर होते. स्वच्छ  सर्वेक्षणातील प्रमुख भाग असलेल्या स्वच्छता अ‍ॅपचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेला तीन वेळा मुदतवाढ मिळाली आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका