शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
4
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
5
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
6
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
7
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
8
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
9
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
10
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
11
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
12
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
13
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
14
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
15
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
16
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
17
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
18
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
19
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
20
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : औरंगाबाद दंगलीची आठ दिवसांपूर्वी पडली ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 10:42 IST

शहागंज चमनजवळील टपऱ्या, हातगाड्या हटविण्याच्या मुद्यावरून आठ दिवसांपूर्वीच शिवसेना विरुद्ध एमआयएम असा वाद विकोपाला गेला होता. दोन्ही गट सोयीनुसार महापालिकेच्या यंत्रणेचा वापर करीत होते. शहरात दीड लाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. मोतीकारंजा या वादग्रस्त भागातच महापालिकेने कारवाईचे ठिकाण का निवडले...? दोन राजकीय पक्षांच्या वादाचा भडका कोणत्याही क्षणी होऊ शकतो हे माहीत असतानाही पोलिसांनी डोळे मिटले होते. त्यामुळे औरंगाबादकरांना जातीय दंगल पाहावी लागली. दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

औरंगाबाद : शहागंज चमनजवळील टपऱ्या, हातगाड्या हटविण्याच्या मुद्यावरून आठ दिवसांपूर्वीच शिवसेना विरुद्ध एमआयएम असा वाद विकोपाला गेला होता. दोन्ही गट सोयीनुसार महापालिकेच्या यंत्रणेचा वापर करीत होते. शहरात दीड लाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. मोतीकारंजा या वादग्रस्त भागातच महापालिकेने कारवाईचे ठिकाण का निवडले...? दोन राजकीय पक्षांच्या वादाचा भडका कोणत्याही क्षणी होऊ शकतो हे माहीत असतानाही पोलिसांनी डोळे मिटले होते. त्यामुळे औरंगाबादकरांना जातीय दंगल पाहावी लागली. दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.शहागंज चमनच्या चारही बाजूने अतिक्रमणे अनेक वर्षांपासून आहेत. येथे हातगाड्या लावणाºयांचे साहित्य फेकून देणे, त्यांना मारहाण करण्याचे काम शिवसेनेच्या लच्छू पहेलवान यांनी केले. प्रतिउत्तरात एमआयएमने कडाडून विरोध दर्शवित सिटीचौैक पोलीस ठाण्यात पहेलवान यांच्यावर कारवाई करावी म्हणून ठिय्या आंदोलनही केले. शहागंज चमनमधील टपºया उठविण्याची मागणी लच्छू पहेलवान यांनी केली. मनपाचे अतिक्रमण हटाव पथक तेथे पोहोचल्यावर विरोधी पक्षनेता फिरोज खान, नगरसेवक नासेर सिद्दीकी यांनी कडाडून विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापालिकेने अनधिकृत नळ कापण्याची मोहीम हाती घेतली. यासाठी महापालिकेने वादग्रस्त मोतीकारंजा या परिसराची निवड केली. येथील मेन लाईनवरील ४० नळ कापण्यात आले. शुक्रवारी रात्री दहा नळ कनेक्शन कापले. एका मंदिराचे नळ कापण्याच्या मुद्यावरून रात्री ९ वाजता वाद उकरून काढण्यात आला. दोन गट आमने सामने आले. पाहता पाहता जाळपोळ सुरू झाली. यानंतर रात्री उशिरा शिवसेना आणि एमआयएम समोरासमोर आले. रात्री बारा वाजता तर शहागंज, मोतीकारंजा, राजाबाजार, शहागंज चमन, गुलमंडी आदी भागात जाळपोळ, दगफडेक सत्र सुरू झाले.पोलीस यंत्रणा अपयशीशहागंज येथील अतिक्रमणावरून दोन गटांत वारंवार तेढ निर्माण होत असतानाही पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही. या ठिणगीचा कोणत्याही क्षणी भडका होऊ शकतो, याची जाणीव पोलिसांना नव्हती का? पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेलाही याचा थांगपत्ता लागू नये म्हणजे आश्चर्य म्हणावे लागेल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार