शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

Aurangabad Violence : औरंगाबाद दंगलीची आठ दिवसांपूर्वी पडली ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 10:42 IST

शहागंज चमनजवळील टपऱ्या, हातगाड्या हटविण्याच्या मुद्यावरून आठ दिवसांपूर्वीच शिवसेना विरुद्ध एमआयएम असा वाद विकोपाला गेला होता. दोन्ही गट सोयीनुसार महापालिकेच्या यंत्रणेचा वापर करीत होते. शहरात दीड लाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. मोतीकारंजा या वादग्रस्त भागातच महापालिकेने कारवाईचे ठिकाण का निवडले...? दोन राजकीय पक्षांच्या वादाचा भडका कोणत्याही क्षणी होऊ शकतो हे माहीत असतानाही पोलिसांनी डोळे मिटले होते. त्यामुळे औरंगाबादकरांना जातीय दंगल पाहावी लागली. दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

औरंगाबाद : शहागंज चमनजवळील टपऱ्या, हातगाड्या हटविण्याच्या मुद्यावरून आठ दिवसांपूर्वीच शिवसेना विरुद्ध एमआयएम असा वाद विकोपाला गेला होता. दोन्ही गट सोयीनुसार महापालिकेच्या यंत्रणेचा वापर करीत होते. शहरात दीड लाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. मोतीकारंजा या वादग्रस्त भागातच महापालिकेने कारवाईचे ठिकाण का निवडले...? दोन राजकीय पक्षांच्या वादाचा भडका कोणत्याही क्षणी होऊ शकतो हे माहीत असतानाही पोलिसांनी डोळे मिटले होते. त्यामुळे औरंगाबादकरांना जातीय दंगल पाहावी लागली. दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.शहागंज चमनच्या चारही बाजूने अतिक्रमणे अनेक वर्षांपासून आहेत. येथे हातगाड्या लावणाºयांचे साहित्य फेकून देणे, त्यांना मारहाण करण्याचे काम शिवसेनेच्या लच्छू पहेलवान यांनी केले. प्रतिउत्तरात एमआयएमने कडाडून विरोध दर्शवित सिटीचौैक पोलीस ठाण्यात पहेलवान यांच्यावर कारवाई करावी म्हणून ठिय्या आंदोलनही केले. शहागंज चमनमधील टपºया उठविण्याची मागणी लच्छू पहेलवान यांनी केली. मनपाचे अतिक्रमण हटाव पथक तेथे पोहोचल्यावर विरोधी पक्षनेता फिरोज खान, नगरसेवक नासेर सिद्दीकी यांनी कडाडून विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापालिकेने अनधिकृत नळ कापण्याची मोहीम हाती घेतली. यासाठी महापालिकेने वादग्रस्त मोतीकारंजा या परिसराची निवड केली. येथील मेन लाईनवरील ४० नळ कापण्यात आले. शुक्रवारी रात्री दहा नळ कनेक्शन कापले. एका मंदिराचे नळ कापण्याच्या मुद्यावरून रात्री ९ वाजता वाद उकरून काढण्यात आला. दोन गट आमने सामने आले. पाहता पाहता जाळपोळ सुरू झाली. यानंतर रात्री उशिरा शिवसेना आणि एमआयएम समोरासमोर आले. रात्री बारा वाजता तर शहागंज, मोतीकारंजा, राजाबाजार, शहागंज चमन, गुलमंडी आदी भागात जाळपोळ, दगफडेक सत्र सुरू झाले.पोलीस यंत्रणा अपयशीशहागंज येथील अतिक्रमणावरून दोन गटांत वारंवार तेढ निर्माण होत असतानाही पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही. या ठिणगीचा कोणत्याही क्षणी भडका होऊ शकतो, याची जाणीव पोलिसांना नव्हती का? पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेलाही याचा थांगपत्ता लागू नये म्हणजे आश्चर्य म्हणावे लागेल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार