शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

‘सुपर संभाजीनगर’ फलक लावला कोणी ? स्मार्ट सिटी प्रशासनाकडूनच नामांतराचे बीजारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 13:14 IST

Aurangabad renaming dispute : मागील महिन्यात टी.व्ही. सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ‘सुपर संभाजीनगर’ नावाचा बोर्ड लावण्यात आला आणि हा बोर्ड सोशल मीडियावर झळकताच राजकारण ढवळून निघाले.

ठळक मुद्देकेंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून पालिकेने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. शहरातील प्रत्येक चौकात या ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन सुंदर आर्ट इन्टॉलेशन बोर्ड लावण्याचे काम सुरू

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात ठिकठिकाणी अत्याधुनिक फलक लावण्यात आले आहेत. ‘सुपर संभाजीनगर’ या बोर्डवरून राज्यभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी औरंगाबाद शहराच्या नामांतरात उडी घेतली आहे. नामांतराच्या विषयाचे बीजारोपण स्मार्ट सिटी प्रशासनाकडून करण्यात आले. या पेटलेल्या प्रश्नावर महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ‘नो कमेंट’ एवढीच प्रतिक्रिया नोंदवली.

स्मार्ट सिटीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून टी.व्ही. सेंटर चौकात ‘सुपर संभाजीनगर’ नावाचा फलक लावला आहे. यामुळे राज्यभरात संभाजीनगरच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला. सुपर संभाजीनगरचा फलक लावण्यास पालिकेने परवानगी कशी काय दिली? असा प्रश्‍न प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पाण्डेय यांना प्रसारमाध्यमांनी मंगळवारी विचारला. तेव्हा त्यांनी ‘नो कमेंट’ म्हणत या मुद्यावर मौन बाळगले. मात्र, यावेळी आयुक्‍तांनी दिलेले स्मितहास्य काही वेगळेच सांगून गेले. स्मार्ट सिटीने हा बोर्ड लावलाच नसल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून पालिकेने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. शहरातील प्रत्येक चौकात या शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन सुंदर आर्ट इन्टॉलेशन बोर्ड लावण्याचे काम सुरू आहे. याअंतर्गत आजवर एन-१ सिडको येथे ‘लव्ह औरंगाबाद’ नावाचा बोर्ड लावण्यात आला. याचे विमोचन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. जालना रोडवरही अशाच पद्धतीचे बोर्ड अनेक ठिकाणी लावलेले आहेत. खडकेश्‍वर भागात शहराचा इतिहास सांगणारा ‘लव्ह खडकी’ या नावाने बोर्ड लावलेला आहे.

दरम्यान, या उपक्रमांतर्गतच मागील महिन्यात टी.व्ही. सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ‘सुपर संभाजीनगर’ नावाचा बोर्ड लावण्यात आला आणि हा बोर्ड सोशल मीडियावर झळकताच राजकारण ढवळून निघाले. राजकीय नेत्यांपासून ते विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून औरंगाबाद पालिकेने लावलेल्या या बोर्डवर टीका केली. काही जण पालिकेच्या या कृतीचे समर्थन करत आहेत, तर काहींकडून विरोध होत असल्याने शहरातील वातावरण तापलेले आहे. या बोर्डमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा अहवाल पोलिसांनी वरिष्ठांना दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका