शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

औरंगाबादच राहिले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:26 IST

मराठा क्रांती मोर्चाची स्थापना आणि ‘एक मराठा, लाख मराठा’ ऐतिहासिक घोषणा औरंगाबादेतच झाली

ठळक मुद्देपहिल्याच मराठा क्रांती मूकमोर्चाने दिली राज्याला दिशा ३४ महिन्यांनंतर समाजाच्या लढ्याला कायदेशीर यश

औरंगाबाद : कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेनंतर १ ते ९ आॅगस्ट २०१६ पर्यंत जगाला शिस्तीचे दर्शन घडविणाऱ्या आणि समाजाची एकजूट करणाऱ्या ‘मराठा क्रांती मूकमोर्चा’ची बीजे औरंगाबाद शहरात रोवली गेली. तब्बल ३४ महिन्यांनंतर समाजाच्या आक्रोशाला, लढ्याला यश मिळाले असून, खऱ्या अर्थाने समाजाच्या एकजुटीचा हा विजय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कोपर्डीतील घटनेचा निषेध, समाजाचा आक्रोश आणि न्याय्य मागण्यांसाठी एकवटलेल्या मराठा समाजाचा पहिला मोर्चा क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयावर ९ आॅगस्ट २०१६ रोजी धडकला. त्यानंतर राज्यभरात विविध जिल्ह्यांतून ५८ शिस्तप्रिय मोर्चे निघाले. मुंबईतील महामोर्चाने समाजाची खरी शक्ती दाखवून दिली. औरंगाबादमधील पहिल्याच मोर्चाने राज्याला दिशा दिली, शिवाय मोर्चातील गर्दी आणि शिस्त जगभर नावाजली गेली.

९ आॅगस्ट २०१६ रोजी सोशल मीडिया, कॉर्नर बैठका आणि विविध समाज संघटनांच्या बैठकींतून जिल्ह्यातून लाखो बांधवांनी या मोर्चाला लावलेली हजेरी आणि समाजाने घडविलेले शिस्तीचे दर्शन ‘भूतो न भविष्यती’ ठरले. ‘एक मराठा लाख मराठा’ ही ऐतिहासिक घोषणादेखील याच शहराने संपूर्ण राज्याला दिली. आकाशवाणी चौकात मराठा क्रांती मोर्चाचे पहिले कार्यालय सुरू झाले. समाजातील सर्व स्तरांतील बांधवांनी या कार्यालयात पहिली बैठक घेऊन मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे आॅगस्ट २०१६ च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व पक्षांतील मराठा समाजाचे नेते, पदाधिकाऱ्यांनी पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवला. उद्योजक, व्यापारी, अधिकारी, डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, गृहिणी फक्त ‘मराठा’ समाज म्हणून एकवटले. 

मराठा क्रांती मोर्चाची स्थापना आणि ‘एक मराठा, लाख मराठा’ ऐतिहासिक घोषणा ९ आॅगस्ट २०१६ म्हणजेच आॅगस्ट क्रांतिदिनी ‘मराठा क्रांती मोर्चा’ या मराठा समाजाच्या संघटनेच्या स्थापनेची घोषणा पहिल्या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आली. ‘एक मराठा, लाख मराठा’ ही ऐतिहासिक घोषणा याच शहराने दिली. समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी याच नावाने मोर्चे, आंदोलने झाली. समाजाच्या सर्व संघटना, नेते राजकीय विचार बाजूला ठेवून एकत्रितपणे आरक्षणाच्या मागणीसाठी लढले. कीर्ती जाधव, ज्योती भोंडेकर, कन्या दहीभाते, प्रियंका शिंदे, अश्विनी पडुळे, सुनीता औराळे, राजश्री मोकासे या बिगर राजकीय युवतींनी विभागीय आयुक्तांना पहिल्या मोर्चाचे निवेदन दिले होते.४हीच परंपरा मराठा आरक्षणाच्या लढ्यात प्रत्येक जिल्ह्यातील मोर्चात कायम राहिली. बिगर राजकीय युवतींनीच निवेदन आणि समाजमनाचा आक्रोश प्रत्येक मोर्चात मांडला.

९ आॅगस्ट २०१६ ते २७ जून २०१९ पर्यंत आरक्षण लढा९ आॅगस्ट २०१६ पासून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाजाने आरक्षणासाठी राज्यव्यापी लढा दिला. २७ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षण वैध ठरविण्याचा निकाल दिल्यानंतर ३४ महिन्यांत समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकाने आपापल्या परीने मोर्चामध्ये योगदान दिले. ९ आॅगस्ट २०१८ रोजी महाराष्ट्र बंददरम्यान समाज रस्त्यावर उतरला. औरंगाबाद येथेच समाजाच्या आंदोलनासाठी राज्यव्यापी बैठका झाल्या. ४२ समाजबांधवांना आरक्षणासाठी हौतात्म्य आले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबाद