शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

औरंगाबादच राहिले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:26 IST

मराठा क्रांती मोर्चाची स्थापना आणि ‘एक मराठा, लाख मराठा’ ऐतिहासिक घोषणा औरंगाबादेतच झाली

ठळक मुद्देपहिल्याच मराठा क्रांती मूकमोर्चाने दिली राज्याला दिशा ३४ महिन्यांनंतर समाजाच्या लढ्याला कायदेशीर यश

औरंगाबाद : कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेनंतर १ ते ९ आॅगस्ट २०१६ पर्यंत जगाला शिस्तीचे दर्शन घडविणाऱ्या आणि समाजाची एकजूट करणाऱ्या ‘मराठा क्रांती मूकमोर्चा’ची बीजे औरंगाबाद शहरात रोवली गेली. तब्बल ३४ महिन्यांनंतर समाजाच्या आक्रोशाला, लढ्याला यश मिळाले असून, खऱ्या अर्थाने समाजाच्या एकजुटीचा हा विजय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कोपर्डीतील घटनेचा निषेध, समाजाचा आक्रोश आणि न्याय्य मागण्यांसाठी एकवटलेल्या मराठा समाजाचा पहिला मोर्चा क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयावर ९ आॅगस्ट २०१६ रोजी धडकला. त्यानंतर राज्यभरात विविध जिल्ह्यांतून ५८ शिस्तप्रिय मोर्चे निघाले. मुंबईतील महामोर्चाने समाजाची खरी शक्ती दाखवून दिली. औरंगाबादमधील पहिल्याच मोर्चाने राज्याला दिशा दिली, शिवाय मोर्चातील गर्दी आणि शिस्त जगभर नावाजली गेली.

९ आॅगस्ट २०१६ रोजी सोशल मीडिया, कॉर्नर बैठका आणि विविध समाज संघटनांच्या बैठकींतून जिल्ह्यातून लाखो बांधवांनी या मोर्चाला लावलेली हजेरी आणि समाजाने घडविलेले शिस्तीचे दर्शन ‘भूतो न भविष्यती’ ठरले. ‘एक मराठा लाख मराठा’ ही ऐतिहासिक घोषणादेखील याच शहराने संपूर्ण राज्याला दिली. आकाशवाणी चौकात मराठा क्रांती मोर्चाचे पहिले कार्यालय सुरू झाले. समाजातील सर्व स्तरांतील बांधवांनी या कार्यालयात पहिली बैठक घेऊन मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे आॅगस्ट २०१६ च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व पक्षांतील मराठा समाजाचे नेते, पदाधिकाऱ्यांनी पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवला. उद्योजक, व्यापारी, अधिकारी, डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, गृहिणी फक्त ‘मराठा’ समाज म्हणून एकवटले. 

मराठा क्रांती मोर्चाची स्थापना आणि ‘एक मराठा, लाख मराठा’ ऐतिहासिक घोषणा ९ आॅगस्ट २०१६ म्हणजेच आॅगस्ट क्रांतिदिनी ‘मराठा क्रांती मोर्चा’ या मराठा समाजाच्या संघटनेच्या स्थापनेची घोषणा पहिल्या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आली. ‘एक मराठा, लाख मराठा’ ही ऐतिहासिक घोषणा याच शहराने दिली. समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी याच नावाने मोर्चे, आंदोलने झाली. समाजाच्या सर्व संघटना, नेते राजकीय विचार बाजूला ठेवून एकत्रितपणे आरक्षणाच्या मागणीसाठी लढले. कीर्ती जाधव, ज्योती भोंडेकर, कन्या दहीभाते, प्रियंका शिंदे, अश्विनी पडुळे, सुनीता औराळे, राजश्री मोकासे या बिगर राजकीय युवतींनी विभागीय आयुक्तांना पहिल्या मोर्चाचे निवेदन दिले होते.४हीच परंपरा मराठा आरक्षणाच्या लढ्यात प्रत्येक जिल्ह्यातील मोर्चात कायम राहिली. बिगर राजकीय युवतींनीच निवेदन आणि समाजमनाचा आक्रोश प्रत्येक मोर्चात मांडला.

९ आॅगस्ट २०१६ ते २७ जून २०१९ पर्यंत आरक्षण लढा९ आॅगस्ट २०१६ पासून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाजाने आरक्षणासाठी राज्यव्यापी लढा दिला. २७ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षण वैध ठरविण्याचा निकाल दिल्यानंतर ३४ महिन्यांत समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकाने आपापल्या परीने मोर्चामध्ये योगदान दिले. ९ आॅगस्ट २०१८ रोजी महाराष्ट्र बंददरम्यान समाज रस्त्यावर उतरला. औरंगाबाद येथेच समाजाच्या आंदोलनासाठी राज्यव्यापी बैठका झाल्या. ४२ समाजबांधवांना आरक्षणासाठी हौतात्म्य आले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबाद