शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच राहिले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:26 IST

मराठा क्रांती मोर्चाची स्थापना आणि ‘एक मराठा, लाख मराठा’ ऐतिहासिक घोषणा औरंगाबादेतच झाली

ठळक मुद्देपहिल्याच मराठा क्रांती मूकमोर्चाने दिली राज्याला दिशा ३४ महिन्यांनंतर समाजाच्या लढ्याला कायदेशीर यश

औरंगाबाद : कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेनंतर १ ते ९ आॅगस्ट २०१६ पर्यंत जगाला शिस्तीचे दर्शन घडविणाऱ्या आणि समाजाची एकजूट करणाऱ्या ‘मराठा क्रांती मूकमोर्चा’ची बीजे औरंगाबाद शहरात रोवली गेली. तब्बल ३४ महिन्यांनंतर समाजाच्या आक्रोशाला, लढ्याला यश मिळाले असून, खऱ्या अर्थाने समाजाच्या एकजुटीचा हा विजय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कोपर्डीतील घटनेचा निषेध, समाजाचा आक्रोश आणि न्याय्य मागण्यांसाठी एकवटलेल्या मराठा समाजाचा पहिला मोर्चा क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयावर ९ आॅगस्ट २०१६ रोजी धडकला. त्यानंतर राज्यभरात विविध जिल्ह्यांतून ५८ शिस्तप्रिय मोर्चे निघाले. मुंबईतील महामोर्चाने समाजाची खरी शक्ती दाखवून दिली. औरंगाबादमधील पहिल्याच मोर्चाने राज्याला दिशा दिली, शिवाय मोर्चातील गर्दी आणि शिस्त जगभर नावाजली गेली.

९ आॅगस्ट २०१६ रोजी सोशल मीडिया, कॉर्नर बैठका आणि विविध समाज संघटनांच्या बैठकींतून जिल्ह्यातून लाखो बांधवांनी या मोर्चाला लावलेली हजेरी आणि समाजाने घडविलेले शिस्तीचे दर्शन ‘भूतो न भविष्यती’ ठरले. ‘एक मराठा लाख मराठा’ ही ऐतिहासिक घोषणादेखील याच शहराने संपूर्ण राज्याला दिली. आकाशवाणी चौकात मराठा क्रांती मोर्चाचे पहिले कार्यालय सुरू झाले. समाजातील सर्व स्तरांतील बांधवांनी या कार्यालयात पहिली बैठक घेऊन मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे आॅगस्ट २०१६ च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व पक्षांतील मराठा समाजाचे नेते, पदाधिकाऱ्यांनी पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवला. उद्योजक, व्यापारी, अधिकारी, डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, गृहिणी फक्त ‘मराठा’ समाज म्हणून एकवटले. 

मराठा क्रांती मोर्चाची स्थापना आणि ‘एक मराठा, लाख मराठा’ ऐतिहासिक घोषणा ९ आॅगस्ट २०१६ म्हणजेच आॅगस्ट क्रांतिदिनी ‘मराठा क्रांती मोर्चा’ या मराठा समाजाच्या संघटनेच्या स्थापनेची घोषणा पहिल्या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आली. ‘एक मराठा, लाख मराठा’ ही ऐतिहासिक घोषणा याच शहराने दिली. समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी याच नावाने मोर्चे, आंदोलने झाली. समाजाच्या सर्व संघटना, नेते राजकीय विचार बाजूला ठेवून एकत्रितपणे आरक्षणाच्या मागणीसाठी लढले. कीर्ती जाधव, ज्योती भोंडेकर, कन्या दहीभाते, प्रियंका शिंदे, अश्विनी पडुळे, सुनीता औराळे, राजश्री मोकासे या बिगर राजकीय युवतींनी विभागीय आयुक्तांना पहिल्या मोर्चाचे निवेदन दिले होते.४हीच परंपरा मराठा आरक्षणाच्या लढ्यात प्रत्येक जिल्ह्यातील मोर्चात कायम राहिली. बिगर राजकीय युवतींनीच निवेदन आणि समाजमनाचा आक्रोश प्रत्येक मोर्चात मांडला.

९ आॅगस्ट २०१६ ते २७ जून २०१९ पर्यंत आरक्षण लढा९ आॅगस्ट २०१६ पासून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाजाने आरक्षणासाठी राज्यव्यापी लढा दिला. २७ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षण वैध ठरविण्याचा निकाल दिल्यानंतर ३४ महिन्यांत समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकाने आपापल्या परीने मोर्चामध्ये योगदान दिले. ९ आॅगस्ट २०१८ रोजी महाराष्ट्र बंददरम्यान समाज रस्त्यावर उतरला. औरंगाबाद येथेच समाजाच्या आंदोलनासाठी राज्यव्यापी बैठका झाल्या. ४२ समाजबांधवांना आरक्षणासाठी हौतात्म्य आले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबाद