शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची रजा पूर्ण; कचरा प्रश्न ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 7:27 PM

आयुक्तांच्या सक्तीच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी पूर्ण होत असला तरी शहरातील कचऱ्याचा प्रश्न आजही ‘जैसे थे’ आहे.

औरंगाबाद : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यावरून मिटमिटा येथे झालेल्या दंगलीची घटना व्यवस्थित न हाताळल्याच्या कारणावरून शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना मुख्यमंत्र्यांनी एक महिन्यासाठी सक्तीच्या रजेवर पाठविले. आयुक्तांच्या सक्तीच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी पूर्ण होत असला तरी शहरातील कचऱ्याचा प्रश्न आजही ‘जैसे थे’ आहे.

नारेगाव येथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकू देण्यास विरोध करून परिसरातील नागरिकांनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर उच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शहरातील कचऱ्याची विल्हेवाट कशी आणि कोठे लावावी, असा प्रश्न मनपासमोर निर्माण झाला. शहरातील कचऱ्याची समस्या निर्माण होऊन ५७ दिवस उलटले. छुप्या मार्गाने आणि पोलीस बंदोबस्तात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा मनपाचा प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडला. ७ फेब्रुवारी रोजी मिटमिटा येथे कचरा टाकण्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि तेथे दंगल झाली. आंदोलनकर्त्या नागरिकांच्या घराची दारे तोडून पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. एवढेच नव्हे तर आंदोलनकर्त्यांप्रमाणे पोलिसांनी दगडफेक केली. नागरिकांच्या घरासमोरील वाहनांची तोडफोड केली.

याबाबतची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विविध लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न विधानसभेत उचलून धरला. यावेळी शहरातील आमदारांनी आणि अन्य विधानसभा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्यामार्फत करण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे ही चौकशी निष्पक्षपाती व्हावी, यासाठी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविले. पोलीस आयुक्त १६ मार्च रोजी रजेवर गेले. आयुक्तांच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी पूर्ण होत आहे. आयुक्तांच्या रजेचा कालावधी समाप्त होत असला तरी शहरातील कचऱ्याचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. 

यादव यांच्या परतण्याविषयी संभ्रमपोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सक्तीच्या रजेवर जाताना पुन्हा परत येण्याची इच्छा नसल्याचे पत्रकारांना सांगितले होते. शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे एक महिन्यापासून कामकाज पाहत आहेत. रजेच्या कालावधीत भारंबे यांनी आयुक्त यादव यांनी नेमलेले गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांची तडकाफडकी बदली केली. शिवाय शहरातील वाहतूक व्यवस्थेवर चर्चासत्र घेतले. यामुळे भारंबे यांना आयुक्तपदी नियमित केले जाते अथवा नवा अधिकारी मिळतो किंवा यादवच राहतात, याबाबत आयुक्त ालयात संभ्रम आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादTransferबदली