शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी घेतली विशेष शाखेची ‘खबर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 12:20 IST

शहरात कुठे काय शिजत आहे, याचा कानोसा घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात या विशेष शाखेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या शाखेतील अधिकारी व कर्मचारी निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत.

औरंगाबाद : ‘पोलिसांचा तिसरा डोळा’ अशी कधी काळी ओळख असलेल्या विशेष शाखेला अनेक घटनांची कुणकुणच लागत नाही. शहरात कुठे काय शिजत आहे, याचा कानोसा घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात या विशेष शाखेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या शाखेतील अधिकारी व कर्मचारी निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत. प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी या शाखेची चांगलीच ‘खबर’ घेतली.

पत्रकारांसोबत दुपारी गप्पा मारताना मिलिंद भारंबे यांनी नमूद केले की, शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी विशेष शाखा आणि सुरक्षा शाखेची भूमिका खूप महत्त्वाची आहे. शहरात कुठे हिंसात्मक घटना घडेत आहेत, याची सर्वात अगोदर माहिती याच विभागांना असायला हवी. कोरेगाव-भीमा आणि मिटमिटा येथील घटनांवरून या दोन्ही शाखा अपयशी असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या निष्क्रियतेचे परिणाम शहराला भोगावे लागत आहेत. या विभागांनीच सर्वप्रथम आम्हाला माहिती देणे अपेक्षित असते. पोलिसांकडून ज्या पद्धतीने सतर्कता बाळगायला हवी तशी बाळगण्यात आलेली नाही. शहरात कचराकोंडीमुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत आहे. राजकीय मंडळींच्या हालचालींवर कडक नजर ठेवायला हवी. पोलीस कर्मचारी फक्त कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत. 

पैठण रोडवर कांचनवाडी येथे दगडफेक, मिटमिटा येथील दंगलीची अगोदर माहिती पोलिसांना हवी होती. विशेष शाखा आणि सुरक्षा शाखेला आपली मरगळ दूर झटकून पुन्हा जोमाने कामाला लागा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे कोणतीही माहिती आमच्याकडे नाही, असे होता कामा नये, अशा सूचनाही देण्यात आल्याचे भारंबे यांनी नमूद केले.

टॅग्स :Milind Bharambeमिलिंद भारंबेCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादAurangabadऔरंगाबाद