शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी घेतली विशेष शाखेची ‘खबर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 12:20 IST

शहरात कुठे काय शिजत आहे, याचा कानोसा घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात या विशेष शाखेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या शाखेतील अधिकारी व कर्मचारी निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत.

औरंगाबाद : ‘पोलिसांचा तिसरा डोळा’ अशी कधी काळी ओळख असलेल्या विशेष शाखेला अनेक घटनांची कुणकुणच लागत नाही. शहरात कुठे काय शिजत आहे, याचा कानोसा घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात या विशेष शाखेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या शाखेतील अधिकारी व कर्मचारी निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत. प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी या शाखेची चांगलीच ‘खबर’ घेतली.

पत्रकारांसोबत दुपारी गप्पा मारताना मिलिंद भारंबे यांनी नमूद केले की, शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी विशेष शाखा आणि सुरक्षा शाखेची भूमिका खूप महत्त्वाची आहे. शहरात कुठे हिंसात्मक घटना घडेत आहेत, याची सर्वात अगोदर माहिती याच विभागांना असायला हवी. कोरेगाव-भीमा आणि मिटमिटा येथील घटनांवरून या दोन्ही शाखा अपयशी असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या निष्क्रियतेचे परिणाम शहराला भोगावे लागत आहेत. या विभागांनीच सर्वप्रथम आम्हाला माहिती देणे अपेक्षित असते. पोलिसांकडून ज्या पद्धतीने सतर्कता बाळगायला हवी तशी बाळगण्यात आलेली नाही. शहरात कचराकोंडीमुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत आहे. राजकीय मंडळींच्या हालचालींवर कडक नजर ठेवायला हवी. पोलीस कर्मचारी फक्त कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत. 

पैठण रोडवर कांचनवाडी येथे दगडफेक, मिटमिटा येथील दंगलीची अगोदर माहिती पोलिसांना हवी होती. विशेष शाखा आणि सुरक्षा शाखेला आपली मरगळ दूर झटकून पुन्हा जोमाने कामाला लागा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे कोणतीही माहिती आमच्याकडे नाही, असे होता कामा नये, अशा सूचनाही देण्यात आल्याचे भारंबे यांनी नमूद केले.

टॅग्स :Milind Bharambeमिलिंद भारंबेCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादAurangabadऔरंगाबाद