शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी घेतली विशेष शाखेची ‘खबर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 12:20 IST

शहरात कुठे काय शिजत आहे, याचा कानोसा घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात या विशेष शाखेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या शाखेतील अधिकारी व कर्मचारी निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत.

औरंगाबाद : ‘पोलिसांचा तिसरा डोळा’ अशी कधी काळी ओळख असलेल्या विशेष शाखेला अनेक घटनांची कुणकुणच लागत नाही. शहरात कुठे काय शिजत आहे, याचा कानोसा घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात या विशेष शाखेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या शाखेतील अधिकारी व कर्मचारी निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत. प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी या शाखेची चांगलीच ‘खबर’ घेतली.

पत्रकारांसोबत दुपारी गप्पा मारताना मिलिंद भारंबे यांनी नमूद केले की, शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी विशेष शाखा आणि सुरक्षा शाखेची भूमिका खूप महत्त्वाची आहे. शहरात कुठे हिंसात्मक घटना घडेत आहेत, याची सर्वात अगोदर माहिती याच विभागांना असायला हवी. कोरेगाव-भीमा आणि मिटमिटा येथील घटनांवरून या दोन्ही शाखा अपयशी असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या निष्क्रियतेचे परिणाम शहराला भोगावे लागत आहेत. या विभागांनीच सर्वप्रथम आम्हाला माहिती देणे अपेक्षित असते. पोलिसांकडून ज्या पद्धतीने सतर्कता बाळगायला हवी तशी बाळगण्यात आलेली नाही. शहरात कचराकोंडीमुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत आहे. राजकीय मंडळींच्या हालचालींवर कडक नजर ठेवायला हवी. पोलीस कर्मचारी फक्त कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत. 

पैठण रोडवर कांचनवाडी येथे दगडफेक, मिटमिटा येथील दंगलीची अगोदर माहिती पोलिसांना हवी होती. विशेष शाखा आणि सुरक्षा शाखेला आपली मरगळ दूर झटकून पुन्हा जोमाने कामाला लागा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे कोणतीही माहिती आमच्याकडे नाही, असे होता कामा नये, अशा सूचनाही देण्यात आल्याचे भारंबे यांनी नमूद केले.

टॅग्स :Milind Bharambeमिलिंद भारंबेCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादAurangabadऔरंगाबाद