शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या पावसाने औरंगाबाद मनपाचे पितळ उघडे; जिकडेतिकडे पडले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 14:04 IST

गुरुवारी औरंगाबाद शहरात झालेल्या संततधार पावसाने महापालिकेचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.

ठळक मुद्दे१३ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी महापालिका शहरात पॅचवर्कचे काम हाती घेणार आहे. औरंगाबादकरांना आणखी एक महिनाभर खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.

औरंगाबाद : गुरुवारी औरंगाबाद शहरात झालेल्या संततधार पावसाने महापालिकेचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी महापालिका शहरात पॅचवर्कचे काम हाती घेणार आहे. औरंगाबादकरांना आणखी एक महिनाभर खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.

यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून मोठा पाऊसच झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. गुरुवारी सकाळपासून औरंगाबादेत संततधार पावसाला सुरुवात झाली. मागील दोन महिन्यांपासून औरंगाबादकर पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. पाऊस यावा म्हणून विशेष प्रार्थना घेण्यात आली होती. गुरुवारी सकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. सखल भागात पाणी शिरू नये म्हणून महापौर नंदकुमार घोडेले, महापालिकेचे अधिकारी उशिरापर्यंत शहरात गस्त घालत होते. ठिकठिकाणी झाड पडल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. टाऊन हॉल उड्डाणपुलावर बरेच पाणी साचले होते. पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाण्यामुळे वाहनधारकांन खड्डे अजिबात दिसत नाहीत. पुलावर सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत पाच ते सहा अपघात झाले. रात्री उशिरा अग्निशमन दलाने पुलावरील पाण्याला वाट मोकळी करून दिली. एलईडीचे दिवेही खाजगी कंपनीने सुरू केले.

शहरातील संततधार पावसामुळे प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. जालना रोडवर मुकुंदवाडी येथे मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सेव्हन हिल उड्डाणपुलावरील खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. व्हीआयपी रोड म्हटल्या जाणाऱ्या मिलकॉर्नर, ज्युबिलीपार्क, आमखास, किलेअर्क, दिल्लीगेट येथे मोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो, हे विशेष.

पॅचवर्कची जुनी निविदा मागील वर्षीही शहरात खड्ड्यांमुळे प्रचंड ओरड होत होती. महापौरांनी पावसाळा अखेरीस झोननिहाय निविदा काढण्याचे आदेश दिले होते. काही वॉर्डांमध्ये पॅचवर्क करण्यात आले. काही वॉर्डांमध्ये निविदा प्रक्रिया उशिराने राबविण्यात आली. त्यामुळे हे काम तसेच शिल्लक आहे. संबंधित कंत्राटदाराकडून मनपाला हे काम करून घ्यावे लागणार आहे. गणेशोत्सवापूर्वी हे काम सुरू होणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाRainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा