शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

औरंगाबादमध्ये थर्माकोल, कचऱ्याने बुजतेय मोठ्या नाल्याचे पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 18:22 IST

महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा बळी शहरातील हा मुख्य नाला ठरतो आहे.

ठळक मुद्देशहरातील मुख्य नाल्याचे अस्तित्वच धोक्यातपावसाळ्यात लगतच्या वसाहतीला पुराचा धोका 

औरंगाबाद : सिटीचौक ते किलेअर्क रोहिलागल्लीदरम्यानच्या मोठ्या नाल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. येथील पुलाच्या एका बाजूने थर्माकोलच्या कचऱ्याने पूर्ण नाला भरून गेला आहे, तर दुसऱ्या बाजूने शहरातील कचरा मोठ्या प्रमाणात आणून टाकल्याने अर्धा नाला बुजला आहे, अशीच परिस्थिती राहिली तर पावसाळ्यात आसपासच्या वसाहतीत नाल्याचे पाणी शिरण्याचा धोका आहे. 

महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा बळी शहरातील हा मुख्य नाला ठरतो आहे. या नाल्यावरील पुलावरून रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. शहराच्या उत्तर बाजूचा सर्वात मोठा नाला म्हणून या नाल्याची ओळख आहे. सर्व मलमूत्र वाहून नेणाऱ्या या नाल्याचे अस्तित्व कचऱ्यामुळे धोक्यात आले आहे. पुलाच्या पूर्व बाजूस हजारो टन थर्माकोल साठले आहे. यामुळे पुलाखालून पाणी जाण्यास अडसर होऊन तेथे तुंबले आहे. पश्चिमेकडील बाजूस महानगरपालिकेने शहरातील सर्व कचरा आणून टाकणे सुरू केले आहे.

मागील वर्षभरात येथे एवढा कचरा साठला आहे की, आता नाल्याचे अर्धे पात्र कचऱ्याने व्यापले आहे. गेल्या मोसमात शहरात चार महिन्यांत २२ दिवसच पाऊस पडला. यामुळे नाला भरून वाहिला नाही, नसता पावसाळ्यातच आसपासच्या परिसरात नाल्यातील पुराचे पाणी शिरले असते. हा नाला बुजला तर शहरातील उत्तर भागातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी दुसरा नाला नाही.

यामुळे सर्व नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी आसपासच्या रहिवाशांच्या घरात घुसू शकते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. हा भविष्यातील मोठा धोका आहे; परंतु महापालिकाच शहरातील कचरा नाल्यात आणून टाकत आहे. दररोज तो कचरा जाळला जात आहे. यामुळे आसपास राहणाऱ्या लोकांचे आरोग्य बिघडू लागल्याची माहिती येथील रहिवासी शेख खलील यांनी दिली. थर्माकोल व कचरा दोन्ही लवकर उचलून नाला मोकळा करावा, अशी मागणी अख्तरभाई, सलीम खान, युसूफ बागवान आदींनी केली आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद