शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेचा सुस्त कारभार; मंदगतीने रस्त्यांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 16:45 IST

आठ महिन्यांत ४० टक्केही कामे पूर्ण नाहीत

ठळक मुद्देमहानगरपालिकेचे नियोजनच नाही पुण्याला गुणवत्ता तपासणी, बिले देण्यास विलंब

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने दिलेल्या १०० कोटींच्या निधीतून शहरातील १९ रस्त्यांची कामे सुरू आहेत. आठ महिने उलटले तरी ४० टक्केही कामे पूर्ण झालेली नाहीत. याला फक्त मनपा प्रशासन कारणीभूत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासणी पुण्याला ठेवली आहे. कंत्राटदाराने जेवढे काम केले त्याचे बिल देण्यास तब्बल एक महिन्याचा विलंब प्रशासनाकडून लावण्यात येतो. त्यामुळे कामे मंदगतीने सुरू आहेत.

१०० कोटी रुपयांमध्ये शहरातील ३० रस्ते सिमेंट पद्धतीने गुळगुळीत करण्यात येणार आहेत. डिसेंबर २०१९ पर्यंत सर्व कामे संपायला हवीत. सप्टेंबर महिना उद्यापासून सुरू होत आहे. तरीही १९ रस्त्यांचीच कामे सुरू आहेत. ही कामेही अर्धवट अवस्थेत आहेत. एकाही रस्त्याचे काम सरसकट सुरू नाही. अनेक तुकड्यांमध्ये ही कामे करण्यात येत आहेत. कंत्राटदाराच्या मनात येईल तेथे काम सुरू आहे. प्रशासन म्हणून या कामांवर कुठेच अंकुश दिसून येत नाही. सिडको एन-५ ते बळीराम पाटील हा रस्ता एका बाजूने खडबडीत करून वाहतुकीसाठी बंद केला आहे. काम अजिबात सुरू नाही. टीव्ही सेंटर ते सेव्हन हिल, आझाद चौक ते बजरंग चौक, निराला बाजार ते महापालिका आदी रस्त्यांची कामे आता औरंगाबादकरांसाठी डोके दुखी ठरत आहेत. नेमके या कामांना विलंब कशासाठी होत आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला असता काही विदारक बाबी समोर आल्या.

गुणवत्ता तपासणी पुण्यालाशहरात सध्या १९ रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी नियुक्त चार कंत्राटदार असून, ते थोडेही काम केले की बिल सादर करतात. कामाची गुणवत्ता पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील आणि   त्यांच्याच प्रयोगशाळेमार्फत करण्यात येते. पुण्याहून तज्ज्ञ आपल्या सोयीनुसार शहरात येतात. त्यांच्या पाहणीनंतर अहवाल येण्यास किमान एक महिन्याचा विलंब होतो. बिल अदा करण्यासाठी मनपा अधिकारी एक महिना लावतात.

एक महिन्यात सर्व कामे शक्य  मनपा प्रशासनाने गुणवत्ता तपासणी, बिल दाखल होताच दुसऱ्या दिवशी पैसे अदा केल्यास एका महिन्यात संपूर्ण कामे होऊ शकतात, असा दावा कंत्राटदारांमार्फत करण्यात आला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ७५ टक्के कामे शक्य आहेत. फक्त मनपा प्रशासनाची इच्छाशक्ती हवी. शंभर कोटींतील १५ कोटी रुपये मनपाने आतापर्यंत खर्च केले आहेत. सध्या मनपाकडे १० कोटींपेक्षा अधिकची बिले प्रलंबित आहेत.

दररोज दहा लाख खर्च एका कंत्राटदाराकडे किमान सहा ते आठ रस्त्यांची कामे दिली आहेत. एका कंत्राटदाराला दररोज १० लाख रुपये खर्च येतो. कंत्राटदार खिशातील पदरमोड करून कामे करण्यास तयार नाहीत. जेवढे काम झाले त्याचे पैसे घेऊनच पुढील कामे करीत आहेत. ही बाबही कामे मंदगतीने होण्यास कारणीभूत ठरत आहे.

पीएमसी, जीएसटीचा वाद३ जानेवारी रोजी टीव्ही सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३० रस्त्यांचे एकत्रित भूमिपूजन झाले. यानंतर सुरुवातीचे तीन ते  चार महिने मनपाने नेमलेली पीएमसीच गायब झाली होती. त्यासोबत या कामांच्या जीएसटीची रक्कम नेमकी कोणी भरावी या मुद्यावरून कामे रेंगाळली होती. ज्या रस्त्यात ड्रेनेज लाईन, पाण्याच्या लाईन येत आहेत, त्या बाजूला करण्याचे काम मनपाचे होते. या कामांसाठी मनपा प्रशासनानेच विलंब लावला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबाद