शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा धाडसी निर्णय; निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तब्बल ८० कोटींची कामे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 18:03 IST

स्थायी व सर्वसाधारण सभेकडे नगरसेवकांचे लक्ष

ठळक मुद्देशहरातील ११५ वॉर्डांतील विविध कामे रद्द निविदा प्रक्रियेनंतर वर्क आॅर्डर झालेली नाही.

औरंगाबाद : शहरातील ११५ वॉर्डांतील तब्बल ८० कोटी रुपयांची कामे मनपा प्रशासनाने रद्द केली आहेत. या कामांसाठी निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आलेली आहे. वर्क आॅर्डर देण्यात आलेली नाही. रद्द करण्यात आलेली कामे पुन्हा स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत टाकण्यासाठी नगरसेवकांचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने हा धाडसी निर्णय घेतला आहे.

मागील वर्षी मनपा प्रशासनाने स्थायी समितीला १२०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने या अर्थसंकल्पात ६६३ कोटी रुपयांची वाढ केली होती. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये अनावश्यक कामांचा डोंगरच रचला होता. ही सर्व कामे अर्थसंकल्पात आलेली असल्याने नगरसेवकांनी दबाव टाकून अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अंदाजपत्रक तयार करून घेतले. निविदा प्रक्रियाही पूर्ण करून घेतली. यातील अनेक कामे तर स्वत: काही नगरसेवकांनीच आपल्या नातेवाईकांच्या नावावर घेतली आहेत. काही कामांमध्ये भागीदारी करून ठेवली आहे. निविदा प्रक्रियेनंतर वर्क आॅर्डर झालेली नाही. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मनपाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मागील वर्षी न झालेली कामे स्पीलमध्ये घेतली. त्यातही मोठ्याप्रमाणात कात्री लावली. वर्क आॅर्डर झालेलीच कामे स्पीलमध्ये घेण्यात आली आहेत. प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डात किमान चार ते पाच कामे वर्क आॅर्डर होऊन काम सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कंत्राटदारांना पैसे मिळत नसल्याचे कंत्राटदार काम करण्यास तयार नाहीत.मनपा प्रशासनाने रद्द केलेली कामे स्पीलमध्ये घ्यावीत यासाठी काही नगरसेवकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन या मुद्यावर अजिबात सहमत नाही. रद्द केलेली कामे परत कोणत्याही परिस्थितीत घेण्यात येणार नाहीत, अशी भूमिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घेतली आहेत. मागील वर्षभरापासून मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे. २३० कोटी रुपयांची बिले लेखा विभागात प्रलंबित आहेत. हा निधी मिळविण्यासाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी लागेल, असा प्रश्न कंत्राटदार उपस्थित करीत आहेत.

नगरसेवकांना निवडणुकांची भीतीलवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यानंतर लगेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. या दोन्ही निवडणुका संपताच मनपा निवडणुकीचे रणसंग्राम सुरू होणार आहे. चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात विकासकामांचा समावेश करून काहीच उपयोग होणार नाही. मनपा प्रशासनाने रद्द केलेली कामे पुन्हा अर्थसंकल्पात घेऊन विकासकामे करण्याचा विचार नगरसेवकांनी सुरू केला आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबाद