शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

मनपाचा धाडसी निर्णय; निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तब्बल ८० कोटींची कामे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 18:03 IST

स्थायी व सर्वसाधारण सभेकडे नगरसेवकांचे लक्ष

ठळक मुद्देशहरातील ११५ वॉर्डांतील विविध कामे रद्द निविदा प्रक्रियेनंतर वर्क आॅर्डर झालेली नाही.

औरंगाबाद : शहरातील ११५ वॉर्डांतील तब्बल ८० कोटी रुपयांची कामे मनपा प्रशासनाने रद्द केली आहेत. या कामांसाठी निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आलेली आहे. वर्क आॅर्डर देण्यात आलेली नाही. रद्द करण्यात आलेली कामे पुन्हा स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत टाकण्यासाठी नगरसेवकांचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने हा धाडसी निर्णय घेतला आहे.

मागील वर्षी मनपा प्रशासनाने स्थायी समितीला १२०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने या अर्थसंकल्पात ६६३ कोटी रुपयांची वाढ केली होती. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये अनावश्यक कामांचा डोंगरच रचला होता. ही सर्व कामे अर्थसंकल्पात आलेली असल्याने नगरसेवकांनी दबाव टाकून अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अंदाजपत्रक तयार करून घेतले. निविदा प्रक्रियाही पूर्ण करून घेतली. यातील अनेक कामे तर स्वत: काही नगरसेवकांनीच आपल्या नातेवाईकांच्या नावावर घेतली आहेत. काही कामांमध्ये भागीदारी करून ठेवली आहे. निविदा प्रक्रियेनंतर वर्क आॅर्डर झालेली नाही. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मनपाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मागील वर्षी न झालेली कामे स्पीलमध्ये घेतली. त्यातही मोठ्याप्रमाणात कात्री लावली. वर्क आॅर्डर झालेलीच कामे स्पीलमध्ये घेण्यात आली आहेत. प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डात किमान चार ते पाच कामे वर्क आॅर्डर होऊन काम सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कंत्राटदारांना पैसे मिळत नसल्याचे कंत्राटदार काम करण्यास तयार नाहीत.मनपा प्रशासनाने रद्द केलेली कामे स्पीलमध्ये घ्यावीत यासाठी काही नगरसेवकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन या मुद्यावर अजिबात सहमत नाही. रद्द केलेली कामे परत कोणत्याही परिस्थितीत घेण्यात येणार नाहीत, अशी भूमिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घेतली आहेत. मागील वर्षभरापासून मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे. २३० कोटी रुपयांची बिले लेखा विभागात प्रलंबित आहेत. हा निधी मिळविण्यासाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी लागेल, असा प्रश्न कंत्राटदार उपस्थित करीत आहेत.

नगरसेवकांना निवडणुकांची भीतीलवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यानंतर लगेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. या दोन्ही निवडणुका संपताच मनपा निवडणुकीचे रणसंग्राम सुरू होणार आहे. चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात विकासकामांचा समावेश करून काहीच उपयोग होणार नाही. मनपा प्रशासनाने रद्द केलेली कामे पुन्हा अर्थसंकल्पात घेऊन विकासकामे करण्याचा विचार नगरसेवकांनी सुरू केला आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबाद