शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

मनपाचा धाडसी निर्णय; निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तब्बल ८० कोटींची कामे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 18:03 IST

स्थायी व सर्वसाधारण सभेकडे नगरसेवकांचे लक्ष

ठळक मुद्देशहरातील ११५ वॉर्डांतील विविध कामे रद्द निविदा प्रक्रियेनंतर वर्क आॅर्डर झालेली नाही.

औरंगाबाद : शहरातील ११५ वॉर्डांतील तब्बल ८० कोटी रुपयांची कामे मनपा प्रशासनाने रद्द केली आहेत. या कामांसाठी निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आलेली आहे. वर्क आॅर्डर देण्यात आलेली नाही. रद्द करण्यात आलेली कामे पुन्हा स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत टाकण्यासाठी नगरसेवकांचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने हा धाडसी निर्णय घेतला आहे.

मागील वर्षी मनपा प्रशासनाने स्थायी समितीला १२०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने या अर्थसंकल्पात ६६३ कोटी रुपयांची वाढ केली होती. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये अनावश्यक कामांचा डोंगरच रचला होता. ही सर्व कामे अर्थसंकल्पात आलेली असल्याने नगरसेवकांनी दबाव टाकून अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अंदाजपत्रक तयार करून घेतले. निविदा प्रक्रियाही पूर्ण करून घेतली. यातील अनेक कामे तर स्वत: काही नगरसेवकांनीच आपल्या नातेवाईकांच्या नावावर घेतली आहेत. काही कामांमध्ये भागीदारी करून ठेवली आहे. निविदा प्रक्रियेनंतर वर्क आॅर्डर झालेली नाही. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मनपाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मागील वर्षी न झालेली कामे स्पीलमध्ये घेतली. त्यातही मोठ्याप्रमाणात कात्री लावली. वर्क आॅर्डर झालेलीच कामे स्पीलमध्ये घेण्यात आली आहेत. प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डात किमान चार ते पाच कामे वर्क आॅर्डर होऊन काम सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कंत्राटदारांना पैसे मिळत नसल्याचे कंत्राटदार काम करण्यास तयार नाहीत.मनपा प्रशासनाने रद्द केलेली कामे स्पीलमध्ये घ्यावीत यासाठी काही नगरसेवकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन या मुद्यावर अजिबात सहमत नाही. रद्द केलेली कामे परत कोणत्याही परिस्थितीत घेण्यात येणार नाहीत, अशी भूमिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घेतली आहेत. मागील वर्षभरापासून मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे. २३० कोटी रुपयांची बिले लेखा विभागात प्रलंबित आहेत. हा निधी मिळविण्यासाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी लागेल, असा प्रश्न कंत्राटदार उपस्थित करीत आहेत.

नगरसेवकांना निवडणुकांची भीतीलवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यानंतर लगेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. या दोन्ही निवडणुका संपताच मनपा निवडणुकीचे रणसंग्राम सुरू होणार आहे. चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात विकासकामांचा समावेश करून काहीच उपयोग होणार नाही. मनपा प्रशासनाने रद्द केलेली कामे पुन्हा अर्थसंकल्पात घेऊन विकासकामे करण्याचा विचार नगरसेवकांनी सुरू केला आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबाद