शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपा शाळा गुणवत्तेत ‘नापास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 19:42 IST

महापालिका शाळांना लागूनच खाजगी शाळांचे पेव फुटले आहे. खाजगी शाळांच्या स्पर्धेत मनपाच्या शाळा आता तग धरायला तयार नाहीत. चार शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी असल्याने त्या बंद करण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : महापालिका शाळांना लागूनच खाजगी शाळांचे पेव फुटले आहे. खाजगी शाळांच्या स्पर्धेत मनपाच्या शाळा आता तग धरायला तयार नाहीत. चार शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी असल्याने त्या बंद करण्यात येणार आहेत. उस्मानपुरा, विष्णूनगर, हनुमाननगर, एन-७ येथील चार शाळांचा यामध्ये समावेश आहे. 

मागील काही वर्षांपासून महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. विद्यार्थी संख्या कशी वाढेल यादृष्टीने प्रशासन, सत्ताधाºयांकडून कधीच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. शहरातील अनेक खाजगी शाळा आजही विविध वसाहतींमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचा शोध घेतात. आमच्याच शाळेत प्रवेश घ्यावा म्हणून पालकांना साकडे घालतात. महापालिकेचे शिक्षक कधीच असे प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे शहरातील चार शाळा बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. 

शहरात मनपाच्या ७१ शाळा आहेत. मनपा शाळांमधील असुविधा, गुणवत्ता यामुळे अनेक पालक प्रवेश घेण्यास नकार देतात. खाजगी शाळांच्या स्पर्धेत मनपा शाळा अजिबात तग धरायला तयार नाहीत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात तर काही शाळांमधील संख्या पन्नासच्याही आत आली आहे. यात उस्मानपुरा, विष्णूनगर, हनुमाननगर आणि सिडको एन-७ या शाळांचा समावेश  आहे. 

या शाळा बंद करण्याचा विचार मनपाच्या शिक्षण विभागाकडून सुरू आहे. या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना मनपाच्या दुसºया शाळांमध्ये सामावून घ्यावे, असा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून बनविण्यात येत आहे. या निर्णयास अजून पदाधिकारी आणि आयुक्तांनी मंजुरी दिलेली नाही. सिडको एन-७ येथील शाळेची इमारत एका खाजगी संस्थेला शाळाच चालविण्यासाठी देण्याचा पराक्रमही मनपाने केला आहे, हे विशेष. 

घटती विद्यार्थी संख्या दहा वर्षांपूर्वी मनपाच्या शाळांमध्ये २५ हजारांहून अधिक विद्यार्थी होते. दरवर्षी विद्यार्थी संख्येला मोठ्या प्रमाणात गळती लागत आहे. या गळतीकडे प्रशासन अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. सध्या ७१ शाळांमध्ये फक्त १७ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नारेगाव, किराडपुरा, प्रियदर्शिनीनगर, मिटमिटा येथील मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या आवश्यकतेपेक्षाही जास्त आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा