शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

किराणा चावडी, राजाबाजारचा कौल नेहमीच सेनेला तरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 19:04 IST

१९८८ मध्ये झालेल्या पहिल्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेने देदीप्यमान यश मिळविले.

ठळक मुद्देनिवडणुकीत वॉर्डाचे चार तुकडे करण्यात आले आहेत.भाजपला शह देण्यासाठी सत्ताधाऱ्यांची खेळी

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : शिवसेना वाढीसाठी जुन्या शहरात बळ देणारा वॉर्ड म्हणजे किराणा चावडी-धावणी मोहल्ला होय. या वॉर्डाने नेहमीच शिवसेनेला भरभरून दिले. आतापर्यंत झालेल्या सहा निवडणुकांमध्ये पाच वेळेस मतदारांनी सेनेला पसंती दिली. त्यातही येथील सिद्ध कुटुंबियांनी तीन वेळेस निवडणूक जिंकली. आता सिद्ध कुटुंबियांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीत वॉर्डाचे चार तुकडे करण्यात आले आहेत. सेनेची ही खेळी सेना नेत्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. 

१९८८ मध्ये झालेल्या पहिल्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेने देदीप्यमान यश मिळविले. या यशामध्ये किराणा चावडी, राजाबाजार, धावणी मोहल्ला या वसाहतींचे मोठे योगदान होते. शिवसेनेच्या गगनभरारीला पंख देण्याचे काम या भागातील शिवसैनिकांनी केले. गुलमंडी, धावणी मोहल्ला हा शिवसेनेचा गडच समजला जात होता. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात या भागाची दहशतही तेवढीच होती. मनपाच्या पहिल्या निवडणुकीपासून २०१० पर्यंत येथील मतदारांनी शिवसेनेच्याच उमेदवाराला निवडून दिले. १९८८ ते २००० पर्यंत या वॉर्डाला किराणा चावडी असे संबोधण्यात येत होते. नंतर या वॉर्डाला राजाबाजार असे नाव देण्यात आले. 

२०१५ मध्ये अपक्ष उमेदवार यशश्री बाखरिया निवडून आल्या. वॉर्ड ओबीसी महिलांसाठी राखीव होता. भाजपतर्फे रीना देवीलाल सिद्ध निवडणूक रिंगणात होत्या. बाखरिया यांना २,५८४ तर सिद्ध यांना १,९८२ मते पडली. एमआयएमचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांच्या पत्नी जरिना कुरैशी यांना ८१८ मते मिळाली होती. या वॉर्डाचे वैशिष्ट्ये म्हणजे सिद्ध कुटुंबियांना तीन वेळेस मतदारांनी पसंती दिली. तब्बल १५ वर्षे या कुटुंबियांकडे वॉर्डाची सत्ता होती. सेनेतील अंतर्गत मतभेदांमुळे माजी आ. किशनचंद तनवाणी यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्यासोबत सिद्ध कुटुंबियांनीही सेनेला जय महाराष्टÑ केला. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सिद्ध कुटुंबियांना पराभूत करण्यासाठी सेनेला चांगलीच कंबर कसावी लागली होती.

एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध कुटुंबीय भाजपकडून नशीब अजमावणार हे निश्चित. त्यापूर्वी मनपातील सत्ताधाऱ्यांनी वॉर्ड रचनेत राजाबाजारचे चार भागांत विभाजन केल्याचे बोलले जात आहे. फक्त सिद्ध कुटुंबियांसाठी सेनेने ही खेळी केल्याचा आरोप होत आहे. हा निर्णय सेनेलाच अंगलट येणार आहे. विभाजन केल्याचा फायदा सेनेलाही होणार नाही. वॉर्डाची रचना आणि आरक्षण लक्षात घेऊन संभाव्य उमेदवार आपले पत्ते ओपन करणार आहेत.

किराणा चावडी-राजाबाजारचे आजपर्यंतचे नगरसेवक१९८८ - रमेश छापरवाल (शिवसेना)१९९५ - पुष्पा गंगवाल (शिवसेना)२००० - जगदीश सिद्ध (शिवसेना)२००५ - वीणा गजेंद्र सिद्ध (शिवसेना)२०१० - जगदीश सिद्ध (शिवसेना)२०१५ - यशश्री बाखरिया................................. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक