शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

औरंगाबाद मनपा प्रशासनाचा करवाढीचा प्रस्ताव रद्द; स्थायी समितीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 2:02 PM

ज्या मालमत्तांना कर लावला आहे, त्यांच्याकडून प्रशासन वसुलीच करीत नाही. प्रशासनाने वसुलीचा आलेख वाढवा, अशी सूचना देऊन सभापती गजानन बारवाल यांनी करवाढीचा प्रस्ताव रद्द केला.

ठळक मुद्देशहरातील नवीन मालमत्तांना कर लावताना २५ टक्केदरवाढ करावी, असा प्रस्ताव मनपा प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केलाबुधवारी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला.

औरंगाबाद : शहरातील नवीन मालमत्तांना कर लावताना २५ टक्केदरवाढ करावी, असा प्रस्ताव मनपा प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केला होता. बुधवारी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला. प्रामाणिकपणे नवीन मालमत्तांना कर लावून घेणार्‍या नागरिकांवर हा अनावश्यक बोजा आहे. ज्या मालमत्तांना कर लावला आहे, त्यांच्याकडून प्रशासन वसुलीच करीत नाही. प्रशासनाने वसुलीचा आलेख वाढवा, अशी सूचना देऊन सभापती गजानन बारवाल यांनी करवाढीचा प्रस्ताव रद्द केला.

२० फेब्रुवारीपूर्वी महापालिका प्रशासनाला मालमत्ता कराचे दर निश्चित करावे लागतात. त्यामुळे यंदा प्रशासनाने ज्या मालमत्तांना कर लावला आहे, त्यांच्याऐवजी नवीन मालमत्तांना कर लावताना २५ टक्के दरवाढ करावी, असा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला विरोध होणार हेसुद्धा प्रशासनाला अपेक्षित होते. बुधवारी सकाळी स्थायी समितीची बैठक सुरू होताच नगरसेवक राजू वैद्य, राज वानखेडे, राखी देसरडा, मनीषा मुंढे, सीताराम सुरे, साजेदा फारुकी यांनी करवाढीच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला.

मालमत्ता कराची वसुली का होत नाही, नवीन मालमत्तांना कर लावण्यात दिरंगाई का होते, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. करमूल्य निर्धारण अधिकारी वसंत निकम यांनी खुलासा केला की, सातारा-देवळाईसह सहा हजार नवीन मालमत्तांना कर लावला आहे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मनपाचे कायमस्वरुपी फक्त ३५ कर्मचारी आहेत. ६८ सफाई मजुरांच्या मदतीने आणि आऊटसोर्सिंगच्या १३५ कर्मचार्‍यांकडून वसुली सुरू आहे. २३८ कर्मचारी वसुलीचे काम करीत आहेत. वॉर्डांमध्ये कॅम्प लावणे, रिक्षा फिरविणे आदी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

शासनाकडून अडथळेजीआयएस मॅपिंग पद्धतीद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी निविदा काढल्या, पण ते काम पूर्ण होऊ शकले नाही. सर्वसाधारण सभेने १०० आऊटसोर्सिंगचे कर्मचारी नेमून वसुली करावी, असे आदेश दिले. त्यानुसार काम सुरू आहे. वसुली होत नसल्याने व्याज माफीचा ठराव सर्वसाधारण सभेने घेतला. यामुळे महापालिकेचे नुकसान होत होते. प्रशासनाने तो ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवून दिला. यानंतर शासनाने जीआयएस मॅपिंगसाठी स्वत: एजन्सी नेमणार असल्याचे कळविले. नोव्हेंबर २०१७ मध्ये व्याजासह सक्तीने वसुली करा, असा अध्यादेश काढल्याची माहिती वसंत निकम यांनी सभागृहाला दिली.

पाणीपट्टी वसुली करणारनगरसेवकांनी मालमत्ता कराचा आढावा घेतला. आतापर्यंत फक्त ६० कोटी रुपये वसूल झाले. मार्चपर्यंत आणखी वसुली होईल. पाणीपट्टी वसुली फक्त ११ कोटी झाली आहे. मालमत्ता करासोबतच पाणीपट्टीही वसूल करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद