शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

औरंगाबाद बाजारपेठेत जुनी तूर डाळ मंदीत; करडी तेल तेजीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 12:17 IST

बाजारगप्पा : आजघडीला साठेबाज व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जुन्या तूर डाळीचा साठा शिल्लक आहे.

- प्रशांत तेलवाडकर ( औरंगाबाद )

वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात औरंगाबाद बाजारपेठेत तूर डाळीच्या भावात मंदी आली होती, तर करडी तेलात आणखी भाववाढ झाली. अन्य डाळी, धान्याचे भाव स्थिर होते. 

मागील आठवडा थंडीने गाजवला. किराणा सामानाच्या तेजी-मंदीपेक्षा आज तापमान किती अंश सेल्सिअसने कमी झाले याचीच चर्चा अधिक होती. बाजारपेठेत नवीन तुरीची आवक वाढू लागताच जुन्या तूर डाळीच्या भावात मंदीला सुरुवात झाली. कारण, आजघडीला साठेबाज व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जुन्या तूर डाळीचा साठा शिल्लक आहे. मागील वर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. मोठ्या प्रमाणात तूर शासनाने खरेदी केली होती. ५ ते ६ महिन्यांपूर्वी नाफेडने जुन्या तूर डाळीचे खुल्या बाजारासाठी विक्रीचे टेंडर काढले होते. यात ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटलने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळ खरेदी केली होती.

यंदा खरीप हंगामात तुरीचे उत्पादन घटल्याने तूर डाळीचे भाव ८० ते १०० रुपये किलोपर्यंत जातील, अशी अपेक्षा साठेबाजांना होती; मात्र नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, ४८०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल तुरीला भाव मिळत आहे. त्यात जुना साठा मोठ्या प्रमाणात असल्याने साठेबाजांनी बाजारात जुनी तूर डाळ विक्रीला आणली. ६८०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणाऱ्या तूर डाळीचे भाव गडगडले व शनिवारपर्यंत ५९०० ते ६४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली येऊन थांबले. क्विंटलमागे हळूहळू ६०० ते ९०० रुपयांनी भाव घसरले. साठेबाज व्यापारी येत्या काळात नवीन तूर डाळीत जुनी डाळ मिसळून ती बाजारात विक्रीला आणतील, याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा तुरीचे उत्पादन कमी असल्याने आणखी मंदी येण्याची शक्यता कमी असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

मागील आठवड्यात  करडी तेलाचा भाव आणखी ५०० रुपयांनी वधारून १५५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचला आहे. यामुळे किरकोळमध्ये ५ रुपयांनी महागून करडी तेल १४५ ते १५० रुपये प्रतिलिटर विक्री होत आहे. नवीन करडी येण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. वसंतपंचमीला नवीन करडी बाजारात येईल, तोपर्यंत किती भाववाढ होते, हे सांगणे सध्या कठीण आहे. थंडीमुळे पामतेल घट्ट होत असल्याने मागणी घटली होती. बाकीच्या खाद्यतेलाचे भाव स्थिर होते. 

केंद्र सरकारने जानेवारी महिन्यासाठी १८.५० लाख मेट्रिक टन साखर कोटा जाहीर केला आहे.  शनिवारी याची घोषणा करण्यात आली. डिसेंबर महिन्यासाठी १९.५० लाख मे. टन साखर कोटा देण्यात आला होता. त्यापेक्षा नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात १ लाख टनने कोटा कमी देण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचा विचार करता दररोज २००० ते २२०० क्विंटल साखर विक्री होते. कोटा जाहीर झाला तेव्हा साखर एस (बारीक) ३१५० रुपये, सुपर एस (मध्यम) ३२०० रुपये, तर एम (जाड) ३२५० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी