शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

औरंगाबाद बाजारपेठेत जुनी तूर डाळ मंदीत; करडी तेल तेजीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 12:17 IST

बाजारगप्पा : आजघडीला साठेबाज व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जुन्या तूर डाळीचा साठा शिल्लक आहे.

- प्रशांत तेलवाडकर ( औरंगाबाद )

वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात औरंगाबाद बाजारपेठेत तूर डाळीच्या भावात मंदी आली होती, तर करडी तेलात आणखी भाववाढ झाली. अन्य डाळी, धान्याचे भाव स्थिर होते. 

मागील आठवडा थंडीने गाजवला. किराणा सामानाच्या तेजी-मंदीपेक्षा आज तापमान किती अंश सेल्सिअसने कमी झाले याचीच चर्चा अधिक होती. बाजारपेठेत नवीन तुरीची आवक वाढू लागताच जुन्या तूर डाळीच्या भावात मंदीला सुरुवात झाली. कारण, आजघडीला साठेबाज व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जुन्या तूर डाळीचा साठा शिल्लक आहे. मागील वर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. मोठ्या प्रमाणात तूर शासनाने खरेदी केली होती. ५ ते ६ महिन्यांपूर्वी नाफेडने जुन्या तूर डाळीचे खुल्या बाजारासाठी विक्रीचे टेंडर काढले होते. यात ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटलने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळ खरेदी केली होती.

यंदा खरीप हंगामात तुरीचे उत्पादन घटल्याने तूर डाळीचे भाव ८० ते १०० रुपये किलोपर्यंत जातील, अशी अपेक्षा साठेबाजांना होती; मात्र नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, ४८०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल तुरीला भाव मिळत आहे. त्यात जुना साठा मोठ्या प्रमाणात असल्याने साठेबाजांनी बाजारात जुनी तूर डाळ विक्रीला आणली. ६८०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणाऱ्या तूर डाळीचे भाव गडगडले व शनिवारपर्यंत ५९०० ते ६४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली येऊन थांबले. क्विंटलमागे हळूहळू ६०० ते ९०० रुपयांनी भाव घसरले. साठेबाज व्यापारी येत्या काळात नवीन तूर डाळीत जुनी डाळ मिसळून ती बाजारात विक्रीला आणतील, याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा तुरीचे उत्पादन कमी असल्याने आणखी मंदी येण्याची शक्यता कमी असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

मागील आठवड्यात  करडी तेलाचा भाव आणखी ५०० रुपयांनी वधारून १५५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचला आहे. यामुळे किरकोळमध्ये ५ रुपयांनी महागून करडी तेल १४५ ते १५० रुपये प्रतिलिटर विक्री होत आहे. नवीन करडी येण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. वसंतपंचमीला नवीन करडी बाजारात येईल, तोपर्यंत किती भाववाढ होते, हे सांगणे सध्या कठीण आहे. थंडीमुळे पामतेल घट्ट होत असल्याने मागणी घटली होती. बाकीच्या खाद्यतेलाचे भाव स्थिर होते. 

केंद्र सरकारने जानेवारी महिन्यासाठी १८.५० लाख मेट्रिक टन साखर कोटा जाहीर केला आहे.  शनिवारी याची घोषणा करण्यात आली. डिसेंबर महिन्यासाठी १९.५० लाख मे. टन साखर कोटा देण्यात आला होता. त्यापेक्षा नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात १ लाख टनने कोटा कमी देण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचा विचार करता दररोज २००० ते २२०० क्विंटल साखर विक्री होते. कोटा जाहीर झाला तेव्हा साखर एस (बारीक) ३१५० रुपये, सुपर एस (मध्यम) ३२०० रुपये, तर एम (जाड) ३२५० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी