शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

औरंगाबाद मनपात बांधकाम परवानगीच्या तब्बल ८०० संचिका प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 12:49 IST

महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानगीसाठी तब्बल ८०० संचिकांचा डोंगर साचला आहे.

ठळक मुद्देनगररचना विभागात बांधकाम परवानगीसाठी तब्बल ८०० संचिकांचा डोंगर साचला आहे. संबंधित प्रकल्पांची किंमत जवळपास १५०० कोटी रुपयांपर्यंतची आहे.  येणाऱ्या काही दिवसांमध्ये तब्बल २० कोटी रुपयांवर पाणी फेरावे लागणार आहे.

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने सोमवारपासून बांधकाम परवानगी देणे १०० टक्के बंद केले आहे. महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानगीसाठी तब्बल ८०० संचिकांचा डोंगर साचला आहे. या संचिकांशी संबंधित प्रकल्पांची किंमत जवळपास १५०० कोटी रुपयांपर्यंतची आहे.  येणाऱ्या काही दिवसांमध्ये तब्बल २० कोटी रुपयांवर पाणी फेरावे लागणार आहे. राज्य शासनाचे आदेश येईपर्यंत बांधकाम परवानगी देणे सुरू ठेवा, अशी मागणी बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी एका पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांनी मात्र  बांधकाम बंदीच्या संचिकांवर अद्याप सही केलेली नाही.

घनकचरा व्यवस्थापनात महाराष्ट्र शासनाला अपयश आल्याचा ठपका ठेवत शुक्रवार, ३१ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व बांधकामे बंद करावीत, असे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागाने राज्यातील महापालिकांना बांधकाम परवानगी देणे थांबवा, असे आदेश अद्याप जारी केलेले नाहीत; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने स्वत:हून सोमवार, ३ सप्टेंबरपासून बांधकाम परवानगी देणे बंद केले आहे. मागील तीन दिवसांमध्ये महापालिकेने बांधकाम परवानगीसाठी येणाऱ्या संचिका इनवर्ड करून घेणे सुरू ठेवले; मात्र एकही नवीन बांधकाम परवानगी दिलेली नाही. काही बांधकाम परवानगीच्या संचिका मंजूर करून ठेवण्यात आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानगीसाठी मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या फायलींची संख्या जळपास ८०० पेक्षा अधिक आहे. यामध्ये १००० चौरस फुटांपासून १० हजार चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांचा समावेश आहे. प्रत्येक फाईलनुसार स्थळ पाहणी, कागदपत्रांची बारकाईने छाननी, आदी कामांमुळे बराच वेळ लागतो. एक फाईल मंजूर होण्यासाठी किमान दोन ते तीन महिने सहजपणे लागतात. १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट २०१८ पर्यंत नगररचना विभागाने ६२४ फायली मंजूर केलेल्या आहेत. आणखी ८०० फायलींवर अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत.

आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्षबुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिका आयुक्तांना एक पत्र दिले. या पत्रात त्यांनी नमूद केले की, सर्वोच्च न्यायालयाचा आदर करीत प्रशासनाने सोमवारपासून बांधकाम परवानगी देणे बंद केले आहे. यासंदर्भात राज्य शासनाने महापालिकेला कोणतेच आदेश दिलेले नाहीत. राज्य शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत तरी बांधकाम परवानगी देणे सुरू ठेवावे. महापौरांच्या मागणीनंतर आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय