शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

औरंगाबाद कृउबा, अडत्यांच्या वादात शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:08 IST

ई-नाम योजना अंमलबजावणी विरोधात अडत्यांनी पुकारलेला बेमुदत बंदच्या दुस-या दिवशी कोणताही तोडगा निघाला नाही. कृउबा व अडत्यांच्या वादात मात्र, शेतकरी भरडला जात आहे. शेतमालाची हर्राशी होत नसल्याने आणलेला माल कुठे विकावा, या चिंतेत शेतकरी दिसून आले.

ठळक मुद्देबंद सुरूच : बाजार समिती आज अडत्यांना बजावणार नोटीस; उद्यापासून कृउबातर्फे ई-लिलाव

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ई-नाम योजना अंमलबजावणी विरोधात अडत्यांनी पुकारलेला बेमुदत बंदच्या दुस-या दिवशी कोणताही तोडगा निघाला नाही. कृउबा व अडत्यांच्या वादात मात्र, शेतकरी भरडला जात आहे. शेतमालाची हर्राशी होत नसल्याने आणलेला माल कुठे विकावा, या चिंतेत शेतकरी दिसून आले. बाजार समितीच्या वतीने गुरुवारपासून अडत्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. शिवाय शुक्रवारपासून कृउबाच्या वतीनेच ई-लिलाव करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.राज्यात एकाच वेळी सर्वत्र ई-नाम योजना सुरूकरण्यात यावी, अशी मागणी करीत जाधववाडी येथील अडत्यांनी शेतकºयांचा शेतीमाल खरेदी करणे बंद केले आहे. यामुळे मागील दोन दिवस फक्त परपेठेतून आलेले धान्य, कडधान्याचेच व्यवहार होताना दिसून आले. यासंदर्भात अडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैयालाल जैैस्वाल यांनी सांगितले की, ई-नामची अंमलबजावणी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात कृउबा अपयशी ठरली आहे. फक्त जाधववाडीतच ई-नाम सुरूआहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम योजना सुरू नाही. यामुळे शेतकरीही जाधववाडीऐवजी अन्य बाजार समितीमध्ये शेतीमाल घेऊन जात आहेत. यामुळे येथील उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. जोपर्यंत सर्वत्र ई-नाम लागू होत नाही तोपर्यंत आम्ही जाधववाडीत ही योजना लागू करूदेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ यांनी सांगितले की, खरेदीदार असो वा अडत्या सर्वांना ई-नामनुसारच काम करावे लागणार आहे. जे अडते व खरेदीदार सहभागी होत नाही त्यांना गुरुवारपासून कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी शुक्रवारपासून सेल हॉल क्र. २ येथे ई-लिलाव सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.आज पाच ते सहा टेम्पो भरून गहू, ज्वारी शेतकºयांनी आणले होते. मात्र, अडते शेतमाल उतरून घेण्यास तयार नव्हते. बाजार समितीने माल उतरून घेण्यासाठी शेतकरी भवनची जागा दिली; पण शेतकºयांना भरोसा नसल्याने त्यांनी धान्य परत नेले. यामुळे शेतकºयांनी आपला संताप व्यक्त केला.हमाल संतापलेजाधववाडीत ई-नाम योजना सुरू झाल्यापासून हमालांना किती हमाली मिळाली, माथाडी मंडळात किती हमाली जमा झाली याची काहीच माहिती नसल्याने आज धान्य बाजारातील हमाल एकत्र आले होते. त्यांनी बाजार समिती कार्यालयासमोर जमून सचिव विजय शिरसाठ यांना जाब विचारला.यावेळी शाब्दिक वादावादी झाली. सर्व हमालांची यादी तयार असून त्यावर हमाली किती मिळाली याची माहिती देण्यात आल्याचे शिरसाठ यांनी निदर्शनात आणून दिले. तसेच हमाली, वराईबद्दल काहीच तरतूद ई-नाम मध्ये करण्यात आली नाही. ही गंभीर बाब राज्य शासनाच्या ते निदर्शनात आणून द्यावे लागेल, असे संचालक देवीदास कीर्तिशाही यांनी सांगितले..

टॅग्स :StrikeसंपAurangabadऔरंगाबादMarket Yardमार्केट यार्ड