शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद कृउबा, अडत्यांच्या वादात शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:08 IST

ई-नाम योजना अंमलबजावणी विरोधात अडत्यांनी पुकारलेला बेमुदत बंदच्या दुस-या दिवशी कोणताही तोडगा निघाला नाही. कृउबा व अडत्यांच्या वादात मात्र, शेतकरी भरडला जात आहे. शेतमालाची हर्राशी होत नसल्याने आणलेला माल कुठे विकावा, या चिंतेत शेतकरी दिसून आले.

ठळक मुद्देबंद सुरूच : बाजार समिती आज अडत्यांना बजावणार नोटीस; उद्यापासून कृउबातर्फे ई-लिलाव

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ई-नाम योजना अंमलबजावणी विरोधात अडत्यांनी पुकारलेला बेमुदत बंदच्या दुस-या दिवशी कोणताही तोडगा निघाला नाही. कृउबा व अडत्यांच्या वादात मात्र, शेतकरी भरडला जात आहे. शेतमालाची हर्राशी होत नसल्याने आणलेला माल कुठे विकावा, या चिंतेत शेतकरी दिसून आले. बाजार समितीच्या वतीने गुरुवारपासून अडत्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. शिवाय शुक्रवारपासून कृउबाच्या वतीनेच ई-लिलाव करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.राज्यात एकाच वेळी सर्वत्र ई-नाम योजना सुरूकरण्यात यावी, अशी मागणी करीत जाधववाडी येथील अडत्यांनी शेतकºयांचा शेतीमाल खरेदी करणे बंद केले आहे. यामुळे मागील दोन दिवस फक्त परपेठेतून आलेले धान्य, कडधान्याचेच व्यवहार होताना दिसून आले. यासंदर्भात अडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैयालाल जैैस्वाल यांनी सांगितले की, ई-नामची अंमलबजावणी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात कृउबा अपयशी ठरली आहे. फक्त जाधववाडीतच ई-नाम सुरूआहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम योजना सुरू नाही. यामुळे शेतकरीही जाधववाडीऐवजी अन्य बाजार समितीमध्ये शेतीमाल घेऊन जात आहेत. यामुळे येथील उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. जोपर्यंत सर्वत्र ई-नाम लागू होत नाही तोपर्यंत आम्ही जाधववाडीत ही योजना लागू करूदेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ यांनी सांगितले की, खरेदीदार असो वा अडत्या सर्वांना ई-नामनुसारच काम करावे लागणार आहे. जे अडते व खरेदीदार सहभागी होत नाही त्यांना गुरुवारपासून कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी शुक्रवारपासून सेल हॉल क्र. २ येथे ई-लिलाव सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.आज पाच ते सहा टेम्पो भरून गहू, ज्वारी शेतकºयांनी आणले होते. मात्र, अडते शेतमाल उतरून घेण्यास तयार नव्हते. बाजार समितीने माल उतरून घेण्यासाठी शेतकरी भवनची जागा दिली; पण शेतकºयांना भरोसा नसल्याने त्यांनी धान्य परत नेले. यामुळे शेतकºयांनी आपला संताप व्यक्त केला.हमाल संतापलेजाधववाडीत ई-नाम योजना सुरू झाल्यापासून हमालांना किती हमाली मिळाली, माथाडी मंडळात किती हमाली जमा झाली याची काहीच माहिती नसल्याने आज धान्य बाजारातील हमाल एकत्र आले होते. त्यांनी बाजार समिती कार्यालयासमोर जमून सचिव विजय शिरसाठ यांना जाब विचारला.यावेळी शाब्दिक वादावादी झाली. सर्व हमालांची यादी तयार असून त्यावर हमाली किती मिळाली याची माहिती देण्यात आल्याचे शिरसाठ यांनी निदर्शनात आणून दिले. तसेच हमाली, वराईबद्दल काहीच तरतूद ई-नाम मध्ये करण्यात आली नाही. ही गंभीर बाब राज्य शासनाच्या ते निदर्शनात आणून द्यावे लागेल, असे संचालक देवीदास कीर्तिशाही यांनी सांगितले..

टॅग्स :StrikeसंपAurangabadऔरंगाबादMarket Yardमार्केट यार्ड