शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांचा ‘टक्का’ वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 4:30 PM

इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरु

ठळक मुद्देयुतीचा आकडा वजनदारएकूण ६१६ मतदार

- विकास राऊत 

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांची संख्या वाढली असून, या मतदारसंघाच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आॅगस्ट महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजप युती झाल्यास त्यांच्याकडील नगरसेवक सदस्यांचा आकडा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत वजनदार आहे. युतीकडे २९८, आघाडीकडे २५०, एमआयएम व अपक्ष मिळून एकूण ६१६ मतदार आहेत. मागील निवडणुकीत ४८० च्या आसपास मतदार होते. येणाऱ्या निवडणुकीत सेना-भाजप युती आणि काँगे्रस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सध्या काँगे्रसकडे हा मतदारसंघ असून, आ. सुभाष झांबड त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यात मनपा, नपा, जि.प.मधील ३६१ मतदार आहेत, तर जालना जिल्ह्यात जि.प., न.प. मिळून २५५ मतदार आहेत. एकूण ६१६ मतदारांची संख्या आहे. ६८ मतदार इतर अपक्ष व इतर पक्षांचे आहेत. नव्याने झालेल्या नगरपालिका आणि नगर पंचायतींमुळे १२० च्या आसपास सदस्य संख्या वाढली आहे, तर औरंगाबाद पालिकेतही १६ मतदार सदस्य वाढले आहेत. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी होणारी निवडणूक उमेदवारांना बजेटच्या आवाक्याबाहेर घेऊन जाणारी ठरण्याची चिन्हे आहेत. पक्ष म्हणून विचार केला, तर १६७ सदस्य कॉँग्रेसकडे आहेत. त्याखालोखाल भाजपकडे १५९, तर शिवसेनेकडे १३९ मतदार सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ८३, तर एमआयएमकडे २७ च्या आसपास मतदार सदस्य असल्याचा आकडा इच्छुकांकडे नोंद आहे. ४१ मतदार इतर पक्षांचे व अपक्षांचे आहेत. 

उमेदवारीसाठी सर्वांचे प्रयत्न हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, त्यामुळे सेनेकडून कुणाला उमेदवारी मिळते. याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. ज्याचे जास्त सदस्य त्याच्याकडे मतदारसंघ या आधारावर भाजपही मतदारसंघावर दावा करण्याच्या विचारात आहे. बाहेरून उमेदवार मिळण्याबाबत चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत पसंतीनुसार मतदान होत असते.४ पहिल्या पसंतीची मते सेना-भाजप युतीकडे जास्त आहेत. सध्या राष्ट्रवादी पक्षात नावापुरते कार्यरत असलेले शिवसेना-भाजपकडून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीतील काहींनी कामदेखील सुरू केले असून, शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत स्नेहभोजन सुरू केले आहे, तसेच दुष्काळी मदतीसाठी हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. ४भाजप आणि शिवसेनेकडून प्रत्येकी दोन जण इच्छुक असून, त्यांनी आकडेमोड सुरू केली आहे. शिवसेना आणि भाजप असे मिळून पहिल्या पसंतीच्या मतांची गोळाबेरीज होत असली तरी तगडे अर्थकारण करणारा उमेदवार या निवडणुकीत बाजी मारील. राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये येण्याची काही जणांनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादJalanaजालना