शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

विशेष रेल्वेंच्या यादीतून औरंगाबाद गायबच; उन्हाळी सुट्यांत गर्दीतूनच करावा लागणार प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 20:20 IST

तिरुपती आणि रेल्वेच्या परीक्षार्थींसाठी जबलपूरपुरतीच विशेष रेल्वे

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या विविध विभागांतून उन्हाळी सुट्यांत विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. मात्र, या विशेष रेल्वेच्या यादीतून औरंगाबाद गायब आहे. केवळ तिरुपतीसाठी आठवड्यातून एक दिवस विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. इतर शहरांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत नसल्याने गर्दीतूनच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर ओढवत आहे.

उन्हाळी सुट्यांमुळे अनेकांकडून पर्यटनाचे नियोजन केले जात आहे, तर अनेक जण गावी जात आहेत. रेल्वेला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या अनेक रेल्वेंचे आरक्षण फुल्ल आहे. अशा परिस्थितीत द. म. रेल्वेकडून विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. परंतु औरंगाबादकडे काहीसे दुर्लक्षच होत आहे. मे महिन्यात आठवड्यातून एक दिवस औरंगाबाद-तिरुपती विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. परंतु गोवा, केरळ, राजस्थान, जयपूर, बंगळुरूसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. प्रत्येक उन्हाळ्यात मागणी करूनही विशेष रेल्वे सोडण्याकडे कानाडोळा केला जातो. वाढीव बाेगी आणि एखाद्या विशेष रेल्वेवरच प्रवाशांना समाधान मानावे लागते, अशी ओरड रेल्वे संघटनांतून होत आहे.

जबलपूरसाठी कधी रेल्वे?रेल्वे भरती बोर्ड नाॅन टेक्निकल पाॅप्युलर कॅटेगरीच्या परीक्षार्थींसाठी ७ मे रोजी जबलपूर ते नांदेड आणि ९ मे रोजी नांदेड ते जबलपूर विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. नांदेड-जबलपूर ही रेल्वे ९ मे रोजी नांदेडहून औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर रात्री १.२० वाजता येईल आणि रात्री १.२५ वाजता रवाना होईल.

नेहमीच दुर्लक्षऔरंगाबादहून विशेष रेल्वे सोडण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार मागणी करूनही गोवा, केरळ, राजस्थान, बंगळुरूसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत नाही. इतर शहरांसाठी कधी विशेष रेल्वे देणार, असा प्रश्न आहे.- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वे