शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची औरंगाबाद विमानतळाची क्षमता स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 11:46 IST

शिर्डीतील खराब वातावरणाने विमानांच्या उड्डाणांनी क्षमता झाली स्पष्ट

ठळक मुद्दे नियमित आणि अतिरिक्त अशा २० विमानांची दिवसभरात ये-जा होत होती. भविष्यात विमानसेवा वाढण्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाची दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची क्षमता आहे. स्पाईस जेट आणि इंडिगोच्या विमानांचे शिर्डी विमानतळावरून होणारे उड्डाण खराब वातावरणामुळे काही दिवसांसाठी औरंगाबाद विमानतळावरून झाले.  नियमित आणि अतिरिक्त अशा २० विमानांची दिवसभरात ये-जा होत होती. त्यातून औरंगाबाद विमानतळाची क्षमता स्पष्ट झाली असून, भविष्यात विमानसेवा वाढण्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

स्पाईस जेटने चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरूहून शिर्डीला जाणारी विमाने २२ नोव्हेंबरपासून औरंगाबादहून उड्डाण करीत होते. स्पाईस जेटपाठोपाठ ‘इंडिगो’नेही औरंगाबादहून विमानांचे संचालन करण्याचे नियोजन केले. बुधवारपासून स्पाईस जेटची विमाने पूर्वीप्रमाणे शिर्डीहून झेपावण्यास सुरुवात झाली. तर  इंदूर, हैदराबाद आणि बंगळुरू शहरांसाठी ‘इंडिगो’चे विमान १५ डिसेंबरपर्यंत औरंगाबादहून ये-जा करणार आहे. स्पाईस जेटची अतिरिक्त विमानसेवा कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर वाढलेली गजबज आता कमी झाली आहे. १५ डिसेंबरनंतर विमानतळावर केवळ नियमित विमानांच्या प्रवाशांची गर्दी राहिल. 

चिकलठाणा विमानतळावरून नियमित १० विमानांची ये-जा आहे. यामध्ये उदयपूरचे विमान आठवड्यातून ३ दिवसांसाठी उड्डाण घेत आहे. चिकलठाणा विमानतळाची दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची क्षमता असल्याचे विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी सांगितले. शिर्डी येथील विमाने औरंगाबादला वळविण्यात आल्याने गेली काही दिवस दिवसभरात उड्डाण घेणाºया विमानांची संख्या २० वर गेली होती.  वाढलेल्या विमानांची आणि प्रवासी संख्येची सक्षमपणे हाताळणी केली गेली. त्यातून औरंगाबाद विमानतळ व्यवस्थापनाची क्षमता स्पष्ट होत आहे. याचा भविष्यात विमानसेवा वाढण्याच्या दृष्टीने फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

औरंगाबादमुळे स्लॉट वाचलेशिर्डी येथील खराब वातावरणामुळे तेथील विमानतळावरील विमानांचे उड्डाण ठप्प झाले होते. अधिक दिवस उड्डाण ठप्प राहिल्यास विमानांचे ‘स्लॉट’ (उड्डाणाची वेळ) रद्द होण्याची शक्यता असते. मात्र स्लॉट कायम राहण्याच्या दृष्टीने औरंगाबादहून उड्डाण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळShirdi Airportशिर्डी विमानतळAurangabadऔरंगाबादtourismपर्यटनairplaneविमान