शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले प्लास्टिक मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 14:23 IST

एकदाच वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर थांबला

ठळक मुद्देप्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण सिंगल युज प्लास्टिक फ्री विमानतळ म्हणून विमानतळाला मान मिळाला आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता एकदाच वापरू न फे कून देण्याच्या (सिंगल युज प्लास्टिक ) वस्तूंचा वापर बंद झाला आहे. त्यामुळेच सिंगल युज प्लास्टिकमुक्त विमानतळ म्हणून नावलौकिक मिळविला आहे. प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण मिळवून विमानतळाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला हातभार लागत आहे. यातूनच औरंगाबादचे विमानतळ पर्यावरणपूरक विमानतळ म्हणून पुढे येत आहे. 

विमानतळावर प्रवेश करीत नाही. तोच सध्या एक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फलक म्हणजे ‘हे विमानतळ सिंगल युज प्लास्टिकमुक्त आहे,’ अशी माहिती देणारा आहे. हा फलक वाचून औरंगाबादच्या प्रत्येक नागरिकाला विमानतळाच्या या कामगिरीविषयी कौतुक वाटते. हे कौतुक वाटताना प्लास्टिकचा वापर थांबविण्याची प्रेरणाही प्रवाशांना मिळते. त्यातूनच विमानतळावर प्लास्टिकमुक्तीला आणखी बळकटी मिळत आहे. देशातील २० विमानतळांवर सिंगल युज प्लास्टिकच्या प्रतिबंधाच्या दृष्टीने थर्ड पार्टीकडून मूल्यमापन करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद विमानतळाचाही समावेश होता. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सिंगल युज प्लास्टिकमुक्तीसाठी परिश्रम घेतले. विमानतळाचा प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि पाहता पाहता विमानतळाने अखेर फ क्त एक दाच वापरू न फे कून देण्याच्या (सिंगल युज प्लास्टिक ) प्लास्टिक आणि अशा प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर बंद करण्यात यश मिळविले. त्यामुळे सिंगल युज प्लास्टिक फ्री विमानतळ म्हणून विमानतळाला मान मिळाला आहे.

हा झाला बदलविमानतळावरील रेस्टॉरंटमध्ये पुन्हा पुन्हा वापरण्यात येणाऱ्या क्रॉकरीवर भर दिला जात आहे. प्लास्टिक, थर्माकॉलच्या कप, ग्लासऐवजी काचेचे ग्लास, चिनी मातीचे कप वापरण्यावर भर दिला जात आहे. विमानतळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीऐवजी स्वत:ची वैयक्तिक पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जात आहे. विमानतळावरील इतर स्टॉलवर पेपर बॅग, ज्यूटच्या बॅग दिल्या जात आहेत. कागद, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, फळांच्या साली अशा कचऱ्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण करून संकलन केले जात आहे. या संकलनासाठी बायोडिग्रिबल बॅग वापरल्या जात आहेत.

बॉटल क्रशिंग मशीनरेल्वेस्टेशनवर काही दिवसांपूर्वीच पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक च्या बाटल्या चिरडून टाक णारे यंत्र (बॉटल क्र शिंग मशीन) बसविण्यात आले आहे. अगदी असेच यंत्र विमानतळावर लावण्यात आलेले आहे. त्यातून टाकाऊ बाटल्यांची तुकडे केली जात आहेत.

प्लास्टिकमुक्ती पुढेही कायम ठेवणारविमानतळ सिंगल युज प्लास्टिकमुक्त झालेले आहे. ही बाब यापुढेही कायम राहील, यासाठी प्रयत्न केला जात आहे, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळpollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबाद