शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले प्लास्टिक मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 14:23 IST

एकदाच वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर थांबला

ठळक मुद्देप्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण सिंगल युज प्लास्टिक फ्री विमानतळ म्हणून विमानतळाला मान मिळाला आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता एकदाच वापरू न फे कून देण्याच्या (सिंगल युज प्लास्टिक ) वस्तूंचा वापर बंद झाला आहे. त्यामुळेच सिंगल युज प्लास्टिकमुक्त विमानतळ म्हणून नावलौकिक मिळविला आहे. प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण मिळवून विमानतळाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला हातभार लागत आहे. यातूनच औरंगाबादचे विमानतळ पर्यावरणपूरक विमानतळ म्हणून पुढे येत आहे. 

विमानतळावर प्रवेश करीत नाही. तोच सध्या एक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फलक म्हणजे ‘हे विमानतळ सिंगल युज प्लास्टिकमुक्त आहे,’ अशी माहिती देणारा आहे. हा फलक वाचून औरंगाबादच्या प्रत्येक नागरिकाला विमानतळाच्या या कामगिरीविषयी कौतुक वाटते. हे कौतुक वाटताना प्लास्टिकचा वापर थांबविण्याची प्रेरणाही प्रवाशांना मिळते. त्यातूनच विमानतळावर प्लास्टिकमुक्तीला आणखी बळकटी मिळत आहे. देशातील २० विमानतळांवर सिंगल युज प्लास्टिकच्या प्रतिबंधाच्या दृष्टीने थर्ड पार्टीकडून मूल्यमापन करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद विमानतळाचाही समावेश होता. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सिंगल युज प्लास्टिकमुक्तीसाठी परिश्रम घेतले. विमानतळाचा प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि पाहता पाहता विमानतळाने अखेर फ क्त एक दाच वापरू न फे कून देण्याच्या (सिंगल युज प्लास्टिक ) प्लास्टिक आणि अशा प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर बंद करण्यात यश मिळविले. त्यामुळे सिंगल युज प्लास्टिक फ्री विमानतळ म्हणून विमानतळाला मान मिळाला आहे.

हा झाला बदलविमानतळावरील रेस्टॉरंटमध्ये पुन्हा पुन्हा वापरण्यात येणाऱ्या क्रॉकरीवर भर दिला जात आहे. प्लास्टिक, थर्माकॉलच्या कप, ग्लासऐवजी काचेचे ग्लास, चिनी मातीचे कप वापरण्यावर भर दिला जात आहे. विमानतळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीऐवजी स्वत:ची वैयक्तिक पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जात आहे. विमानतळावरील इतर स्टॉलवर पेपर बॅग, ज्यूटच्या बॅग दिल्या जात आहेत. कागद, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, फळांच्या साली अशा कचऱ्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण करून संकलन केले जात आहे. या संकलनासाठी बायोडिग्रिबल बॅग वापरल्या जात आहेत.

बॉटल क्रशिंग मशीनरेल्वेस्टेशनवर काही दिवसांपूर्वीच पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक च्या बाटल्या चिरडून टाक णारे यंत्र (बॉटल क्र शिंग मशीन) बसविण्यात आले आहे. अगदी असेच यंत्र विमानतळावर लावण्यात आलेले आहे. त्यातून टाकाऊ बाटल्यांची तुकडे केली जात आहेत.

प्लास्टिकमुक्ती पुढेही कायम ठेवणारविमानतळ सिंगल युज प्लास्टिकमुक्त झालेले आहे. ही बाब यापुढेही कायम राहील, यासाठी प्रयत्न केला जात आहे, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळpollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबाद