शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

'पॉवर हाउस' बनलंय औरंगाबाद; केंद्र-राज्यात मिळून तब्बल पाच मंत्री, विरोधी पक्षनेते पदही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 13:09 IST

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला स्वातंत्र्यानंतर प्रथमच तीन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. महाराष्ट्रातील पॉवर हाउस; केंद्रात दोन, राज्यात तीन मंत्री, विधान परिषद विरोधी पक्ष नेताही औरंगाबादचा

औरंगाबाद: जिल्ह्यास मंत्रिपदासाठी अच्छे दिन आले आहेत. दोन केंद्रीय राज्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळात तीन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. तसेच विधानपरिषद विरोधी पक्ष नेतेपद देखील प्रथमच औरंगाबादच्या वाट्याला आले आहेत. पाच मंत्री आणि विरोधी पक्ष नेतेपद अशी 'पॉलिटीकल पॉवर' मिळाल्याने जिल्ह्याच्या विकास वाटा आता मोकळ्या होतील, अशा अवघ्या जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

एरव्ही एखादे मंत्रिपद जिल्ह्यात मिळाले तर भाग्य फळफळल्यासारखे वाटत असे; परंतु केंद्र शासनाचे दोन केंद्रीय राज्यमंत्री आणि आता राज्य सरकारमध्ये तीन कॅबिनेट मंत्री, तसेच म्हाडाचे राज्यमंत्री दर्जाचे सभापतिपद व विधान परिषद विरोधी पक्षनेतादेखील औरंगाबादचाच. अशी वैधानिक पदांची गर्दी औरंगाबादला झाली असून केंद्र व राज्याच्या सत्तापदांमुळे जिल्ह्यातील विकासाची वाट आता तरी सोपी होईल, अशी अपेक्षा आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात औरंगाबादचे स्थानकेंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळात औरंगाबादला स्थान मिळाले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच ही संधी औरंगाबादला डॉ. कराड यांच्या रूपाने मिळाली. औरंगाबाद-जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे हेदेखील केंद्रात रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री आहेत. गेल्या वर्षी विस्तारात त्यांच्याकडे रेल्वे खात्याचे राज्यमंत्रिपद आले आहे. 

राज्य मंत्रिमंडळात तीन कॅबिनेट मंत्रीमहाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार अब्दुल सत्तार हे राज्यमंत्री, तर संदिपान भूमरे हे कॅबिनेट मंत्री होते. हे सरकार गेल्यानंतर आमदार सत्तारांचे ‘प्रमोशन’ झाले असून ते कॅबिनेट मंत्री झाले. भूमरेदेखील कॅबिनेट मंत्री झाले. शिवाय २०१९ साली सहा महिन्यांसाठी उद्योग राज्यमंत्री राहिलेले आ. अतुल सावे यांच्या रूपाने एका कॅबिनेट मंत्र्याची भर पडली आहे. जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्री मिळण्याचा योग स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात पहिल्यांदाच आला आहे. तर संजय केणेकर हे म्हाडाचे सभापती आहेत. राज्यात सत्तेतील होणारी उपेक्षा मागील काही वर्षांपासून संपुष्टात आली आहे.

औरंगाबादला प्रथमच विरोधी पक्षनेते पदशिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या रूपाने जिल्ह्याला प्रथमच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळाले आहे. दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचे राज्याच्या राजपत्रात प्रसिद्ध झाले.जिल्ह्यास कधी नव्हे ती तब्बल पाच मंत्रिपदे मिळाली आहेत. यातून राज्याची पर्यटन राजधानी व मराठवाड्याच्या राजधानीचा चेहरामोहरा बदलावा, अशी स्वप्ने नागरिकांना न पडली तरच नवल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBhagwat Karadडॉ. भागवतraosaheb danveरावसाहेब दानवेAtul Saveअतुल सावेSandeepan Bhoomraसंदीपान भुमरे