शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत नियोजन रोज ४८० मेट्रिक टनाचे; प्रक्रिया केवळ ४८ मेट्रिक टन कचऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 17:16 IST

480 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे शहरातील चार ठिकाणी नियोजन करण्यात आले होते.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : राज्य शासनाने कोट्यवधींचा निधी देऊनही औरंगाबादेतील कचराकोंडी वर्षभर कायम आहे. शहरातील चार ठिकाणी दररोज ४८० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात एकाही प्रकल्पाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. परिणामी, दररोज केवळ ४८ मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे, तर १८० मेट्रिक टन सुका कचरा हा कचरा वेचक आणि कंपन्यांच्या भरवशावर सोडला आहे.

महापालिकेने ३५ वर्षे नारेगाव येथे कचरा टाकला. त्यावर मनपाने काहीच  प्रक्रिया केली नाही. अखेर १६ फेब्रुवारी २०१८ रोजी नारेगावकरांनी कचरा टाकण्यास विरोध केला आणि ऐतिहासिक कचराकोंडी निर्माण झाली. कचऱ्याची गंभीर अवस्था पाहून राज्य शासनाने  हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी, चिकलठाणा येथे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी २ एप्रिल २०१८ रोजी ९१.७९५ कोटी रुपये निधी मंजूर केला. त्यानंतर घनकचरा प्रक्रिया केंद्र स्थापना आणि चिकलठाणा, पडेगाव येथे १५० टन प्रतिदिवस क्षमतेचे प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी यंत्रसामग्री पुरविणे, चाचणी देणे आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी चालविणे, देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. प्रक्रियेअंती अनुक्रमे एन.के. कन्स्ट्रक्शन आणि मायो वेसल्स अ‍ॅण्ड मशिन्स प्रा. लि. यांना काम देण्यात आले. याबरोबरच हर्सूल येथे कचरा प्रक्रिया केंद्र विकसित करणे, कांचनवाडी येथे बायोमिथिनेशन प्रकल्प उभारणे, नारेगाव येथे जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, जनजागृती करणे आदी कामांचा समावेश आहे.  घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे म्हणाले, ४८ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. चारपैकी तीन पूर्ण झाले तरी कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल. पीटद्वारेही कंपोस्टिंग केले जात आहे. 

काय काय केले?- चिकलठाणा येथे प्रक्रिया केंद्राचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. याठिकाणी शेड उभारून ३२ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हर्सूल येथे बांधकामा-संदर्भात वर्कआॅर्डर देण्यात आली आहे. - यंत्रसामग्रीची निविदा अंतिम टप्प्यात आहे. येथेही शेड उभारून छोट्या युनिटद्वारे १६ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे. कांचनवाडी येथे ३० मेट्रिक टन बायोमिथिनेशन प्रकल्पाची वर्कआॅर्डर देण्यात आली आहे. बांधकामासह अन्य कामे सुरू झाली आहेत. यंत्रांची खरेदी करून कार्यान्वित केली जाणार आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. - शहरातील ११५ वॉर्डांमधील कि मान ३ लाखांहून अधिक  मालमत्ताधारक ांक डून दररोज क चरा संक लन क रण्याचे क ाम खाजगी कं पनीला दिले. कंपनीने वाहनांची खरेदी केली. त्यांच्याकडून ९ पैकी ३ झोनमध्ये कचऱ्याचे संकलन सुरूझाले. वर्षभरापूर्वी रस्त्या-रस्त्यांवर कचऱ्याचे डोंगर दिसत होते. हे कचऱ्याचे डोंगर आता दिसत नाहीत.

या गोष्टी झाल्याच नाहीत- 480 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे शहरातील चार ठिकाणी नियोजन करण्यात आले होते. 48 मेट्रिक टन कचऱ्यावर चिकलठाणा आणि हर्सूल या दोन्ही ठिकाणी मिळून प्रक्रिया होत आहे. - 150 मेट्रिक टन कचऱ्यावर चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव येथे प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही.- कांचनवाडी येथेही प्रत्यक्षात कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झालेली नाही. कचराकोंडीनंतर महापालिकेने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी पडेगाव येथील जागेची निवड केली. त्याला मांस विके्रत्यांनी आक्षेप घेऊन न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिलेला असतानाही जागेचा वाद अद्याप मिटलेला नाही. या वादामुळे प्रक्रिया प्रकल्पाचे काम रखडले आहे. - 300 वाहने लावणे कचरा संकलन करणाऱ्या कंपनीला बंधनकारक आहे. तीनच झोनमध्ये काम सुरू आहे. इतर झोनमध्ये मनपाकडून कचरा संकलन केले जात आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद