शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यात सर्वप्रथम लागू करण्याचा मान औरंगाबादला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 19:32 IST

National Pension Scheme : औरंगाबाद महापालिकेतील वर्ग २ ते वर्ग ४ मधील १२०० कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना अखेर लागू झाली.

ठळक मुद्देया निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद  प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांचा पुढाकार

औरंगाबाद : शासकीय सेवेत २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने राष्ट्रीय पेन्शन योजना अंमलात आणली. या योजनेची अंमलबजावणी करणारी औरंगाबाद महापालिका ( Aurangabad Municipality ) राज्यात पहिली ठरली आहे. महापालिकेतील तब्बल १२०० कर्मचाऱ्यांना या नवीन पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अत्यंत क्लीष्ट योजना लागू करण्यामध्ये प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सिंहाचा वाटा उचलला. ( Aurangabad is the first Municipality in the state to implement the National Pension Scheme)

औरंगाबाद महापालिकेतील वर्ग २ ते वर्ग ४ मधील १२०० कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना अखेर लागू झाली. या कर्मचाऱ्यांचे पेन्शन योजनेत १० टक्के अंशदान जमा केले जात असून मनपाकडून १४ टक्के हिस्सा टाकला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० टक्के रक्कम कपात होत आहे. परंतु राष्ट्रीय पेन्शन योजना १ नोव्हेंबर २००५ पासून लागू झाल्यामुळे मागील १६ वर्षांचे हप्ते यामध्ये जमा करावे लागणार आहेत. महापालिकेकडून चालू महिन्याच्या हप्त्यासोबत मागील एक हप्ता पगारातून कपात करण्याचे नियोजन केले जात आहे. कर्मचाऱ्यांनी १६ वर्षांची एकत्रित हप्त्याची रक्कम जमा करण्याची तयारी दर्शवली, तर त्यांना परवानगी दिली जाईल. मनपाला देखील १४ टक्के हिस्सा जमा करावा लागणार असून तसा लिखित करारच महापालिकेने भविष्य निर्वाह निधी कार्यालयासोबत केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर चांगली रक्कम मिळणार आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या रकमेवर टक्केवारीप्रमाणे व्याज जमा होणार नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या नावाने पॅन कार्ड मिळणार असून, त्यामध्ये कर्मचाऱ्याची संपूर्ण माहिती असणार आहे. नगररचना विभागातील उपअभियंता संजय कोंबडे यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेचे पहिले पॅन कार्ड प्राप्त झाले आहे.

राज्यातील एकाही महापालिकेत या योजनेची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही, औरंगाबाद महापालिकेला पहिला मान मिळाला. योजना लागू करण्यासाठी मागील वर्षभरापासून प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय परिश्रम घेत होते. याशिवाय मुख्य लेखाधिकारी डॉ. देविदास हिवाळे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनीही मोलाचा वाटा उचलला.

सेवानिृवत्तीनंतर रक्कम काढूनही पेन्शन मिळेलमहापालिकेतील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यास राष्ट्रीय पेन्शन योजनेत जमा झालेली रक्कम काढायची असेल, तर तो काढू शकतो. तसेच जेवढ्या रकमेची पेन्शन सुरू करायची असेल त्या प्रमाणात तेवढी रक्कम राष्ट्रीय पेन्शन योजनेत ठेवल्यास पेन्शनही घेता येईल.

कुटुंबातील वारसदारास पेन्शनचा लाभमनपा कर्मचाऱ्यास राष्ट्रीय पेन्शन योजना लागू झाल्यामुळे याचा फायदा त्यांच्या कुटुंबातील वारसदारास देखील मिळणार आहे. पेन्शन योजनेच्या अर्जामध्ये नॉमिनी असलेल्या वारसदारास देखील पेन्शनचा लाभ घेता येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPensionनिवृत्ती वेतन