शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यात सर्वप्रथम लागू करण्याचा मान औरंगाबादला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 19:32 IST

National Pension Scheme : औरंगाबाद महापालिकेतील वर्ग २ ते वर्ग ४ मधील १२०० कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना अखेर लागू झाली.

ठळक मुद्देया निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद  प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांचा पुढाकार

औरंगाबाद : शासकीय सेवेत २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने राष्ट्रीय पेन्शन योजना अंमलात आणली. या योजनेची अंमलबजावणी करणारी औरंगाबाद महापालिका ( Aurangabad Municipality ) राज्यात पहिली ठरली आहे. महापालिकेतील तब्बल १२०० कर्मचाऱ्यांना या नवीन पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अत्यंत क्लीष्ट योजना लागू करण्यामध्ये प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सिंहाचा वाटा उचलला. ( Aurangabad is the first Municipality in the state to implement the National Pension Scheme)

औरंगाबाद महापालिकेतील वर्ग २ ते वर्ग ४ मधील १२०० कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना अखेर लागू झाली. या कर्मचाऱ्यांचे पेन्शन योजनेत १० टक्के अंशदान जमा केले जात असून मनपाकडून १४ टक्के हिस्सा टाकला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० टक्के रक्कम कपात होत आहे. परंतु राष्ट्रीय पेन्शन योजना १ नोव्हेंबर २००५ पासून लागू झाल्यामुळे मागील १६ वर्षांचे हप्ते यामध्ये जमा करावे लागणार आहेत. महापालिकेकडून चालू महिन्याच्या हप्त्यासोबत मागील एक हप्ता पगारातून कपात करण्याचे नियोजन केले जात आहे. कर्मचाऱ्यांनी १६ वर्षांची एकत्रित हप्त्याची रक्कम जमा करण्याची तयारी दर्शवली, तर त्यांना परवानगी दिली जाईल. मनपाला देखील १४ टक्के हिस्सा जमा करावा लागणार असून तसा लिखित करारच महापालिकेने भविष्य निर्वाह निधी कार्यालयासोबत केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर चांगली रक्कम मिळणार आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या रकमेवर टक्केवारीप्रमाणे व्याज जमा होणार नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या नावाने पॅन कार्ड मिळणार असून, त्यामध्ये कर्मचाऱ्याची संपूर्ण माहिती असणार आहे. नगररचना विभागातील उपअभियंता संजय कोंबडे यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेचे पहिले पॅन कार्ड प्राप्त झाले आहे.

राज्यातील एकाही महापालिकेत या योजनेची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही, औरंगाबाद महापालिकेला पहिला मान मिळाला. योजना लागू करण्यासाठी मागील वर्षभरापासून प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय परिश्रम घेत होते. याशिवाय मुख्य लेखाधिकारी डॉ. देविदास हिवाळे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनीही मोलाचा वाटा उचलला.

सेवानिृवत्तीनंतर रक्कम काढूनही पेन्शन मिळेलमहापालिकेतील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यास राष्ट्रीय पेन्शन योजनेत जमा झालेली रक्कम काढायची असेल, तर तो काढू शकतो. तसेच जेवढ्या रकमेची पेन्शन सुरू करायची असेल त्या प्रमाणात तेवढी रक्कम राष्ट्रीय पेन्शन योजनेत ठेवल्यास पेन्शनही घेता येईल.

कुटुंबातील वारसदारास पेन्शनचा लाभमनपा कर्मचाऱ्यास राष्ट्रीय पेन्शन योजना लागू झाल्यामुळे याचा फायदा त्यांच्या कुटुंबातील वारसदारास देखील मिळणार आहे. पेन्शन योजनेच्या अर्जामध्ये नॉमिनी असलेल्या वारसदारास देखील पेन्शनचा लाभ घेता येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPensionनिवृत्ती वेतन