शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात बोंडअळीची सर्वाधिक नुकसानभरपाई औरंगाबाद जिल्ह्याला मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 16:54 IST

राज्य सरकारने नुकसानभरपाईची एकूण रक्कम जाहीर केली असून, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ती जमा होणार आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारने कापूस पीक नुकसानभरपाईची आकडेवारी जाहीर केली आहे.मराठवाड्याचा विचार केल्यास सर्वाधिक २९६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई औरंगाबाद जिल्ह्यास देण्यात आली आहे. 

औरंगाबाद : मागील खरीप हंगामात कपाशीवर पडलेल्या बोंडअळीने संपूर्ण मराठवाड्यात हाहाकार उडाला होता. शेतकरी हवालदिल झाले होते. सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी लावून धरली होती. अखेर राज्य सरकारने नुकसानभरपाईची एकूण रक्कम जाहीर केली असून, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ती जमा होणार आहे. यात मराठवाड्याचा विचार केल्यास सर्वाधिक २९६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई औरंगाबाद जिल्ह्यास देण्यात आली आहे. 

राज्य सरकारनेकापूस पीक नुकसानभरपाईची आकडेवारी जाहीर केली आहे. कापसाची नुकसानभरपाई म्हणून ३ हजार २४६ कोटी ७७ लाख ४९ हजार रुपये देण्यात येणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यास ३४९ कोटी १७ लाख ७ हजार एवढी नुकसानभरपाई मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर २९६ कोटी २५ लाख रुपयांची भरपाई औरंगाबाद जिल्ह्यास मिळाली आहे; मात्र मराठवाड्याचा विचार केला तर सर्वाधिक नुकसानभरपाई औरंगाबादला मिळाली आहे.

यात बीड २५६ कोटी ९३ लाख, जालना २७५ कोटी ३७ लाख, नांदेड १७६ कोटी १२ लाख, लातूर ८ कोटी ६० लाख, परभणी १५७ कोटी ९७ लाख, हिंगोली ३६ कोटी ६० लाख, तर उस्मानाबाद १३ कोटी ५१ लाख रुपये. मराठवाड्यासाठी एकूण १२२१ कोटींची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. सर्व रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 

आधार क्रमांक नसेल तरकपाशीच्या नुकसानीपोटी ज्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे, त्या शेतकऱ्याच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये  थेट हस्तांतर पद्धतीने प्रदान करावी; परंतु एखाद्या शेतकऱ्याकडे आधार क्रमांक नसेल, तर तो लाभापासून वंचित राहू नये यासाठी अन्य पर्यायी व व्यवहार्य ओळखपत्राआधारे (उदा. आधार ओळख नोंदणी पावती, निवडणूक आयोगाने दिलेले मतदान ओळखपत्र, आयकर विभागाने दिलेले स्थायी लेखा क्रमांक (पॅन), वाहन परवाना, पारपत्र, बँकेची पुस्तिका) खातरजमा करून प्रदान करण्यात यावेत. 

राज्य सरकारचे आदेश१ - बोंडअळीमुळे कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले त्यांना मिळणार आर्थिक मदत. २ - आर्थिक मदतीची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार. ३ - कोणत्याही बँकेने मदतीच्या रकमेतून कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. ४ - मिळालेल्या नुकसानभरपाईसह लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. ५ - शासनाकडून ३ समान हप्त्यांमध्ये जिल्ह्यांना रक्कम मिळेल; पण शेतकऱ्याला संपूर्ण रक्कम एकाच वेळी देण्यात यावी. 

टॅग्स :FarmerशेतकरीcottonकापूसMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकार