शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

मराठवाड्यात बोंडअळीची सर्वाधिक नुकसानभरपाई औरंगाबाद जिल्ह्याला मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 16:54 IST

राज्य सरकारने नुकसानभरपाईची एकूण रक्कम जाहीर केली असून, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ती जमा होणार आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारने कापूस पीक नुकसानभरपाईची आकडेवारी जाहीर केली आहे.मराठवाड्याचा विचार केल्यास सर्वाधिक २९६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई औरंगाबाद जिल्ह्यास देण्यात आली आहे. 

औरंगाबाद : मागील खरीप हंगामात कपाशीवर पडलेल्या बोंडअळीने संपूर्ण मराठवाड्यात हाहाकार उडाला होता. शेतकरी हवालदिल झाले होते. सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी लावून धरली होती. अखेर राज्य सरकारने नुकसानभरपाईची एकूण रक्कम जाहीर केली असून, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ती जमा होणार आहे. यात मराठवाड्याचा विचार केल्यास सर्वाधिक २९६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई औरंगाबाद जिल्ह्यास देण्यात आली आहे. 

राज्य सरकारनेकापूस पीक नुकसानभरपाईची आकडेवारी जाहीर केली आहे. कापसाची नुकसानभरपाई म्हणून ३ हजार २४६ कोटी ७७ लाख ४९ हजार रुपये देण्यात येणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यास ३४९ कोटी १७ लाख ७ हजार एवढी नुकसानभरपाई मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर २९६ कोटी २५ लाख रुपयांची भरपाई औरंगाबाद जिल्ह्यास मिळाली आहे; मात्र मराठवाड्याचा विचार केला तर सर्वाधिक नुकसानभरपाई औरंगाबादला मिळाली आहे.

यात बीड २५६ कोटी ९३ लाख, जालना २७५ कोटी ३७ लाख, नांदेड १७६ कोटी १२ लाख, लातूर ८ कोटी ६० लाख, परभणी १५७ कोटी ९७ लाख, हिंगोली ३६ कोटी ६० लाख, तर उस्मानाबाद १३ कोटी ५१ लाख रुपये. मराठवाड्यासाठी एकूण १२२१ कोटींची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. सर्व रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 

आधार क्रमांक नसेल तरकपाशीच्या नुकसानीपोटी ज्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे, त्या शेतकऱ्याच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये  थेट हस्तांतर पद्धतीने प्रदान करावी; परंतु एखाद्या शेतकऱ्याकडे आधार क्रमांक नसेल, तर तो लाभापासून वंचित राहू नये यासाठी अन्य पर्यायी व व्यवहार्य ओळखपत्राआधारे (उदा. आधार ओळख नोंदणी पावती, निवडणूक आयोगाने दिलेले मतदान ओळखपत्र, आयकर विभागाने दिलेले स्थायी लेखा क्रमांक (पॅन), वाहन परवाना, पारपत्र, बँकेची पुस्तिका) खातरजमा करून प्रदान करण्यात यावेत. 

राज्य सरकारचे आदेश१ - बोंडअळीमुळे कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले त्यांना मिळणार आर्थिक मदत. २ - आर्थिक मदतीची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार. ३ - कोणत्याही बँकेने मदतीच्या रकमेतून कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. ४ - मिळालेल्या नुकसानभरपाईसह लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. ५ - शासनाकडून ३ समान हप्त्यांमध्ये जिल्ह्यांना रक्कम मिळेल; पण शेतकऱ्याला संपूर्ण रक्कम एकाच वेळी देण्यात यावी. 

टॅग्स :FarmerशेतकरीcottonकापूसMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकार