शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:20 IST

मुंबईसह अन्य ठिकाणी धुवाधार पाऊस कोसळत असताना औरंगाबाद जिल्ह्याला पुन्हा एकदा जोरदार पावसाची वाट पाहावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबईसह अन्य ठिकाणी धुवाधार पाऊस कोसळत असताना औरंगाबाद जिल्ह्याला पुन्हा एकदा जोरदार पावसाची वाट पाहावी लागत आहे. जिल्ह्यात केवळ औरंगाबाद तालुक्यात पावसाने आजपर्यंतची सरासरी ओलांडली आहे. ९ जुलैपर्यंत १८३.१० मि.मी. पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात २०२.१० मि.मी. म्हणजे ११०.३८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील फुलंब्री तालुकाही सरासरीच्या जवळ आहे. अन्य तालुक्यांमध्ये मात्र अद्यापही पावासाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.जूनच्या प्रारंभी आणि मध्यात दमदार हजेरी लावून पाठ फिरविलेल्या पावसाने ५ जुलै रोजी पुन्हा एकदा परतत जोरदार हजेरी लावली. शहराला सुमारे दोन तास अक्षरश: धुऊन काढलेल्या पावसाने शहर चिंब झाले. चिकलठाणा वेधशाळेत ४४.८ मि. मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने औरंगाबाद तालुक्यातील सरासरी ओलांडली आहे; परंतु त्यानंतर पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. ९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील फुलंब्री तालुका १८०.२५(९६.१८ टक्के) , पैठण ८९.०० (५५.८० टक्के) , सिल्लोड ११२.०६ (६१.२० टक्के) , सोयगाव १४९.९९ (७४.५५ टक्के), कन्नड १२२.१८ ( ६०.२२ टक्के), वैजापूर १०६.४० (८२.१० टक्के), गंगापूर ९०.५६ ( ५४.५५), तर खुलताबाद तालुक्यात १००.६५ (४८.१८ टक्के) मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात ५ जुलै रोजी बरसलेल्या दमदार पावसाने बळीराजा कुठेतरी सुखावला होता; मात्र यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली असून, अधूनमधून केवळ रिमझिम पाऊस होत आहे. पुणे हवामान विभागाने १०, ११ जुलै रोजी मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.एमजीएम खगोलशास्त्र विभागाचे संचालक श्रीनिवास औंधक र म्हणाले, औरंगाबाद, जालना जिल्ह्यात सध्या पाऊस नसला तरी १४ ते १७ जुलैदरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये १६ ते १८ जुलैदरम्यान मराठवाड्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद