शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:20 IST

मुंबईसह अन्य ठिकाणी धुवाधार पाऊस कोसळत असताना औरंगाबाद जिल्ह्याला पुन्हा एकदा जोरदार पावसाची वाट पाहावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबईसह अन्य ठिकाणी धुवाधार पाऊस कोसळत असताना औरंगाबाद जिल्ह्याला पुन्हा एकदा जोरदार पावसाची वाट पाहावी लागत आहे. जिल्ह्यात केवळ औरंगाबाद तालुक्यात पावसाने आजपर्यंतची सरासरी ओलांडली आहे. ९ जुलैपर्यंत १८३.१० मि.मी. पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात २०२.१० मि.मी. म्हणजे ११०.३८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील फुलंब्री तालुकाही सरासरीच्या जवळ आहे. अन्य तालुक्यांमध्ये मात्र अद्यापही पावासाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.जूनच्या प्रारंभी आणि मध्यात दमदार हजेरी लावून पाठ फिरविलेल्या पावसाने ५ जुलै रोजी पुन्हा एकदा परतत जोरदार हजेरी लावली. शहराला सुमारे दोन तास अक्षरश: धुऊन काढलेल्या पावसाने शहर चिंब झाले. चिकलठाणा वेधशाळेत ४४.८ मि. मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने औरंगाबाद तालुक्यातील सरासरी ओलांडली आहे; परंतु त्यानंतर पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. ९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील फुलंब्री तालुका १८०.२५(९६.१८ टक्के) , पैठण ८९.०० (५५.८० टक्के) , सिल्लोड ११२.०६ (६१.२० टक्के) , सोयगाव १४९.९९ (७४.५५ टक्के), कन्नड १२२.१८ ( ६०.२२ टक्के), वैजापूर १०६.४० (८२.१० टक्के), गंगापूर ९०.५६ ( ५४.५५), तर खुलताबाद तालुक्यात १००.६५ (४८.१८ टक्के) मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात ५ जुलै रोजी बरसलेल्या दमदार पावसाने बळीराजा कुठेतरी सुखावला होता; मात्र यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली असून, अधूनमधून केवळ रिमझिम पाऊस होत आहे. पुणे हवामान विभागाने १०, ११ जुलै रोजी मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.एमजीएम खगोलशास्त्र विभागाचे संचालक श्रीनिवास औंधक र म्हणाले, औरंगाबाद, जालना जिल्ह्यात सध्या पाऊस नसला तरी १४ ते १७ जुलैदरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये १६ ते १८ जुलैदरम्यान मराठवाड्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद